MBA चं शिक्षण अन् धरली अभिनयाची वाट, 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य; फिल्मी आहे अभिनेत्याची कहाणी

By सुजित शिर्के | Updated: June 30, 2025 16:43 IST2025-06-30T16:39:42+5:302025-06-30T16:43:29+5:30

MBA चं शिक्षण अन् धरली अभिनयाची वाट, 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य; फिल्मी आहे अभिनेत्याची कहाणी

marathi actor amit parab talk in interview about her journey in television industry  | MBA चं शिक्षण अन् धरली अभिनयाची वाट, 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य; फिल्मी आहे अभिनेत्याची कहाणी

MBA चं शिक्षण अन् धरली अभिनयाची वाट, 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य; फिल्मी आहे अभिनेत्याची कहाणी

छोट्या पडद्यावरील कलाकारांचा चाहतावर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. एखादी मालिका संपली तरी त्यामध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करुन जातात. असाच एक अभिनेता म्हणजे अमित परब (Amit Parab). 'मन उडू उडू झालं','डॉक्टर डॉन', 'नकळत सारे घडले', 'रंग माझा वेगळा' या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. आता हा अभिनेता लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. नुकताच अमितने 'लोकमत फिल्मी'सोबत संवाद साधला, त्यामध्ये अभिनेत्याने त्याच्या अभिनय प्रवासावर भाष्य केलं.

>>> सुजित शिर्के 


करिअरमध्ये पहिला ब्रेक कसा मिळाला? तो अनुभव कसा होता? 

मी एमबीए करत होतो, २०१५-१७ च्या बॅचला होतो. त्यावेळी एक मित्र नेहमी म्हणायचा, 'तू अ‍ॅक्टर होऊ शकतोस.' त्याच्या मोबाईलमध्ये माझा नंबर ‘हिरो’ नावाने सेव्ह होता. त्यावेळी माझ्या डोक्यात या क्षेत्राविषयी कोणताही विचार नव्हता. एमबीए संपल्यावर त्याच्या सल्ल्याने अ‍ॅक्टिंग क्लासेसला जाऊन बेसिक्स शिकलो. मग ऑडिशन्स सुरू झाली आणि २०१८ मध्ये मला पहिला ब्रेक मिळाला 'नकळत सारे घडले' असं त्या मालिकेचं नाव होतं. तेव्हा मी पहिल्यांदाच कॅमेरा फेस केला. तो अनुभव खूप छान होता. प्रेशर खूप होतं पण हे काहीतरी वेगळंच विश्व आहे असं वाटलं. मग याच क्षेत्रात काम करायचं ठरवलं.

 

एमबीएचं शिक्षण, कॉर्पोरेट जॉब करत असताना तू अभिनयाकडे वळलास, या सगळ्यात घरच्यांची काय प्रतिक्रिया होती?

२०२० मध्ये कोविड आल्यानंतर सगळं बंद होतं. तेव्हा स्वतःवर काम करण्यासाठी खूप वेळ मिळाला. त्यानंतर मी १५० पेक्षा जास्त ऑडिशन्स दिल्या पण काहीच होत नव्हतं. निराश झालो होतो.घरचे म्हणायचे,‘काही होत नाही तर दुसरं बघ. मग एके दिवशी मी क्लीन शेव्ह फोटो सोशल मीडियावर टाकले. ते फोटो पाहून माझ्या एका मित्राने ऑडिशनबद्दल कळवलं.त्यानंतर एका कास्टिंग डिरेक्टरचा कॉल आला. तेव्हा 'मन उडू उडू झालं'मध्ये काम मिळालं. ही मालिका माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. या संधीने माझं आयुष्य बदललं.


'मन उडू उडू झालं'नंतर पुन्हा खलनायकी भूमिकाच का? कधी मेन लीडसाठी ऑफर आली आहे का?

खलनायक साकारताना जबाबदारी मोठी वाटते. नायक आपली कथा सांगतो,पण खलनायक समाजाला काय करायचं नाही हे दाखवतो. मला खलनायकाची पॉवरफुल शेड आकर्षित करते. एकदा सेटवर एक मुलगा हातावर थुंकला, माझं खलनायकी पात्र पाहून त्याने ते केलं. त्याचे बाबा म्हणाले, मालिकेतील तुमचं पात्र पाहून तो राग करतो आणि म्हणून कदाचित त्याने असं केलं असावं. मालिकेत तुम्ही तुमच्या पत्नीला मारता, हे त्याने पाहिलंय. मग मला जाणवलं की हे लोकांचं प्रेम आहे. हिच आपल्या कामाची पोचपावती आहे.


बऱ्याचदा ऑफ कॅमेरा असताना आपल्या मागेही चर्चा असतात, की हा हे काय करतोय वगैरे? त्याकडे तू कसा पाहतोस?

सुरुवातीला लोक विचारायचे, काय करतोस आता? काहीजण खोचक बोलायचे. पण मी माझ्या आवडीचं काम येईपर्यंत थांबायचं ठरवलं होतं. आता जेव्हा नवीन प्रोजेक्टची घोषणा झाली, तेच लोक म्हणतात, आपण तर सुरुवातीपासूनच ओळखत होतो याला. लोकांचं मत सतत बदलतं, आपण फक्त आपलं काम चांगलं करत राहायचं.

 

अभिनय प्रवासातील एक अविस्मरणीय आठवण, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल...

एक वाईट आठवण म्हणू शकतो आणि चांगलीही आहे. आईची ट्रिटमेन्ट चालू होती. त्यावेळी आई लास्ट स्टेजमध्ये होती. पण, एक नर्स मला पाहून सेल्फीसाठी आली.त्या क्षणी एक गोष्ट कळाली की कलाकाराला भावना असल्या तरी, त्याने त्या लपवून समोरच्याला हसून सामोरं जावं लागतं. त्या एका सेल्फीने मला आयुष्यभराचं शिकवण दिली.

 

भविष्यात कोणती भूमिका साकारायला आवडेल ?

मन उडू उडू झालं मालिकेनंतर मी जवळपास तीन वर्षांचा ब्रेक घेतला. तसं बघितलं तर कामासाठी ऑफर्स आल्या संधी होत्या. पण केवळ काम मिळालं म्हणून ते करायचं असं मला करायचं नव्हतं. मला वाटत होतं की एखादी भूमिका माझ्या मनाला भिडणारी, माझ्या अभिनय क्षमतेला खरं आव्हान देणारी असावी. त्यामुळे मी वाट पाहिली आणि मग एक दिवस जयकांत रांगणे पाटीलसारखी भूमिका माझ्यासमोर आली. तेव्हा जाणवलं की आता कमबॅक करण्याची वेळ आली आहे.

Web Title: marathi actor amit parab talk in interview about her journey in television industry 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.