कट्टी बट्टी: लग्न महत्त्वाचे की अभ्यास ? पूर्वाच्या मनाचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 10:18 IST2018-04-14T04:48:42+5:302018-04-14T10:18:42+5:30
एकदा का आपल्या घरातलं लग्न ठरलं की सगळ्यांचीच धांदल उडते. मग साखरपुडा, खरेदी, लग्नाची तारीख ठरवणे, कार्यालय पसंतीच्या तारखेला ...

कट्टी बट्टी: लग्न महत्त्वाचे की अभ्यास ? पूर्वाच्या मनाचा गोंधळ
ए दा का आपल्या घरातलं लग्न ठरलं की सगळ्यांचीच धांदल उडते. मग साखरपुडा, खरेदी, लग्नाची तारीख ठरवणे, कार्यालय पसंतीच्या तारखेला मिळणे, आमंत्रण पत्रिका छापणे, दागिने खरेदी अशा अनेक गोष्टी असतात.आणि या सर्वांच्या धावपळीत अनेक महत्वाच्या गोष्टींना दुय्यम स्थान दिले जाते. आपल्या प्रत्येकाच्या घरातली सगळी माणसे त्याच गडबडीत अडकलेली असतात.असंच काहीतरी झी युवावरील कट्टी बट्टी या मालिकेच्या पूर्वा बोराडेच्या लग्नाबाबत घडताना दिसत आहे.
अहमदनगर सारख्या छोट्या शहरात राहत असलेल्या पूर्वा बोराडे आणि पराग निकम यांच्या मोडलेल्या लग्नाची पण त्याचबरोबर निरागस पणे एकमेकांवर जडलेल्या प्रेमाची ही सुंदर गोष्ट आहे. या मालिकेची नायिका पूर्वा, ही महाराष्ट्रातील असंख्य मुलींचं प्रतिनिधित्व करते.छोट्या शहरांमधील ही पूर्वा आपल्या माणसांची मन सांभाळत, पीएचडी पूर्ण करण्याची तारेवरची कसरत करत आहे आणि प्राध्यापक असेलला पराग साधा जरी असला, तरीही विचार करण्याची त्याची पद्धत त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. एका शहरात राहणाऱ्या या दोन अपरिचित तरुणांचं एकमेकांसोबत ठरलेलं लग्न मोडतं. त्यांनतर त्यांच्यात झालेली मैत्री आणि जडलेलं प्रेम हा प्रवास यात आहे. सध्या या मालिकेत पूर्वाच्या लग्नाची तयारी सुरु आहे . लग्नाची तयारी सुरु झाल्यामुळे पीएचडी करत असलेल्या पूर्वाच्या अभ्यासावर परिणाम होत आहे . लग्नाची बैठक आणि त्याच्या तयारीमुळे पूर्वा वेगवेगळ्या कामात अडकली आहे. त्यामुळे तिचं अभ्यासाकडे दूर्लक्ष होत आहे. मात्र त्यामुळे ती काहीशी अस्वस्थ झाली आहे. त्यातच तीचा पीएचडीचा क्लासही या कारणांमुळे बुडतो आहे.
अहमदनगर शहरात राहत असलेल्या पूर्वा बोराडे आणि पराग निकम यांच्या मोडलेल्या लग्नाची पण त्याचबरोबर निरागसपणे एकमेकांवर जडलेल्या प्रेमाची ही गोष्ट आहे. मालिकेची नायिका पूर्वा, ही महाराष्ट्रातील असंख्य मुलींचे प्रतिनिधित्व करतेय. एका शहरात राहणाऱ्या या दोन अपरिचित तरुणांचे एकमेकांसोबत ठरलेले लग्न मोडते. त्यांनतर त्यांच्यात झालेली मैत्री आणि जडलेले प्रेम हा प्रवास या मालिकेत दाखवण्यात आला आहे. हलक्या फुलक्या विनोदी अंगाने जाणारी ही प्रेमकथा आहे.
अहमदनगर सारख्या छोट्या शहरात राहत असलेल्या पूर्वा बोराडे आणि पराग निकम यांच्या मोडलेल्या लग्नाची पण त्याचबरोबर निरागस पणे एकमेकांवर जडलेल्या प्रेमाची ही सुंदर गोष्ट आहे. या मालिकेची नायिका पूर्वा, ही महाराष्ट्रातील असंख्य मुलींचं प्रतिनिधित्व करते.छोट्या शहरांमधील ही पूर्वा आपल्या माणसांची मन सांभाळत, पीएचडी पूर्ण करण्याची तारेवरची कसरत करत आहे आणि प्राध्यापक असेलला पराग साधा जरी असला, तरीही विचार करण्याची त्याची पद्धत त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. एका शहरात राहणाऱ्या या दोन अपरिचित तरुणांचं एकमेकांसोबत ठरलेलं लग्न मोडतं. त्यांनतर त्यांच्यात झालेली मैत्री आणि जडलेलं प्रेम हा प्रवास यात आहे. सध्या या मालिकेत पूर्वाच्या लग्नाची तयारी सुरु आहे . लग्नाची तयारी सुरु झाल्यामुळे पीएचडी करत असलेल्या पूर्वाच्या अभ्यासावर परिणाम होत आहे . लग्नाची बैठक आणि त्याच्या तयारीमुळे पूर्वा वेगवेगळ्या कामात अडकली आहे. त्यामुळे तिचं अभ्यासाकडे दूर्लक्ष होत आहे. मात्र त्यामुळे ती काहीशी अस्वस्थ झाली आहे. त्यातच तीचा पीएचडीचा क्लासही या कारणांमुळे बुडतो आहे.
अहमदनगर शहरात राहत असलेल्या पूर्वा बोराडे आणि पराग निकम यांच्या मोडलेल्या लग्नाची पण त्याचबरोबर निरागसपणे एकमेकांवर जडलेल्या प्रेमाची ही गोष्ट आहे. मालिकेची नायिका पूर्वा, ही महाराष्ट्रातील असंख्य मुलींचे प्रतिनिधित्व करतेय. एका शहरात राहणाऱ्या या दोन अपरिचित तरुणांचे एकमेकांसोबत ठरलेले लग्न मोडते. त्यांनतर त्यांच्यात झालेली मैत्री आणि जडलेले प्रेम हा प्रवास या मालिकेत दाखवण्यात आला आहे. हलक्या फुलक्या विनोदी अंगाने जाणारी ही प्रेमकथा आहे.