22 फिल्मों के बराबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 17:41 IST2016-10-05T12:11:51+5:302016-10-05T17:41:51+5:30
निखिल अडवाणीची पीओडब्ल्यू-बंदी युद्ध के ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. निखिलने कल हो ना हो, सलामे इश्क ...

22 फिल्मों के बराबर
न खिल अडवाणीची पीओडब्ल्यू-बंदी युद्ध के ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. निखिलने कल हो ना हो, सलामे इश्क यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटानंतर तो आता छोट्या पडद्याकडे वळला आहे. निखिलची पीओडब्ल्यू ही मालिका केवळ 126 भागांची आहे. या मालिकेविषयी निखिल सांगतो, "मालिकेचे चित्रीकरण करत असताना मी 22 चित्रपट बनवत आहे असेच मला वाटत होते. कोणत्याही मालिकेची कथा चांगली असेल तर प्रेक्षक मालिकेला चांगला प्रतिसाद देतात हे आजवर आपण पाहिले आहे. माझ्या मालिकेची कथा तर सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेली असल्याने ती मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे. वेगळे कथानक असलेली मालिका प्रेक्षकांसमोर आणण्याचा मी प्रयत्न करत आहे."