'लक्ष्मीनिवास' मालिकेत मोठा ट्विस्ट, सिद्धू भरसभेत भावनाशी झालेलं लग्न करणार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:10 IST2025-05-28T14:09:47+5:302025-05-28T14:10:28+5:30
Laxmi Niwas Serial : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं. आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.

'लक्ष्मीनिवास' मालिकेत मोठा ट्विस्ट, सिद्धू भरसभेत भावनाशी झालेलं लग्न करणार जाहीर
'लक्ष्मी निवास' (Laxmi Niwas) मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या मालिकेतील लक्ष्मी, श्रीनिवास, भावना, सिद्धीराज, वेंकी, संतोष, जान्हवी, आनंदी आणि सिंचना अशा सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. अखेर सिद्धू भरसभेत भावनाच्या गळ्यात घातलेल्या मंगळसूत्राबद्दल सांगणार आहे.
मालिकेत संतोष श्रीनिवासचा उपहास करतो, की भावनाच्या गळ्यात एका मुलाने मंगळसूत्र बांधलं आणि तुम्ही काहीच करू शकला नाहीत. श्रीनिवास हतबल आहे आणि आपल्या मुलीसाठी गाडे पाटलांच्या घरी मदत मागण्यासाठी जाण्याचा विचार करतो. तर दुसरीकडे गाडे पाटलांच्या घरी इनकम टॅक्सची धाड पडते. भावना ठामपणे उभी राहते आणि संपूर्ण परिस्थिती हाताळते. सिध्दूचा लॅपटॉप जप्त होतो, आणि पासवर्ड विचारल्यावर, तो गोंधळतो कारण त्या लॅपटॉप पासवर्ड 'भावना' आहे.
संपतराव लग्नाला मान्यता देतात
दुसरीकडे प्रचार सभास्थळी, सिंचना रेणुकाला भावनाच्या गळ्यातील मंगळसूत्राबद्दल सांगते. भावनाचा सभेत अपमान होतो आणि ती सभास्थळातून बाहेर निघून जाते. लक्ष्मी तिची समजूत काढते आणि तिला अभिमानाने, धैर्याने लोकांना सामोरं जाण्याची प्रेरणा देते. वेंकी सिध्दूला इशारा देतो की, हीच तुझी संधी आहे, आता भावनाशी लग्न जाहीर कर. सभा सुरू होते आणि श्रीनिवासच्या भाषणादरम्यान गोंधळ माजतो. पाटलांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित होतो. जनतेला शांत करण्यासाठी सिध्दू मंचावर जाऊन “मी तुमच्या मतदारसंघाचा जावई असल्याचं सांगतो. आणि थेट गर्दीत जाऊन भावनाचा हात धरतो आणि हीच माझी पत्नी असल्याचं जाहीर करतो. स्टेजवर संपतराव लग्नाला मान्यता देतात आणि गुणाजीची सार्वजनिक माफीही मागतात.
सिद्धूचा जावई म्हणून स्वीकार करतील का?
गुणाजीचा पाठिंबा असूनही, संपतरावांच्या मनात भीती आहे की या सर्व प्रकारामुळे त्यांचं राजकारण संपेल. इकडे संतोष गाडे पाटलांच्या कुटुंबाकडून भरपाई मागण्याचा विचारात आहे. सिध्दू लक्ष्मीच्या घराबाहेर उभा राहून आणि ठामपणे म्हणतो “मी इथून जाणार नाही, जोवर भावनाला माझ्यासोबत नेत नाही.” आता सिद्धू, भावनाला आपल्या घरी घेऊन जाऊ शकेल का ? लक्ष्मी- श्रीनिवास, सिद्धूचा जावई म्हणून स्वीकार करतील का? भावनांच्या मनात काय सुरु आहे, हे सिद्धूला कळेल का? यासाठी मालिका पाहावी लागेल.