साम दाम दंड भेदच्या सेटवर या कारणामुळे ऐश्वर्या खरेला झाली इजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 13:05 IST2018-06-21T07:35:41+5:302018-06-21T13:05:41+5:30
साम दाम दंड भेद ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिका अथवा चित्रपट ...

साम दाम दंड भेदच्या सेटवर या कारणामुळे ऐश्वर्या खरेला झाली इजा
स म दाम दंड भेद ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिका अथवा चित्रपट असो चित्रीकरण करण्यात अनेक अडथळे येतात. काही वेळा तर साहसी दृश्यं चित्रीत करताना अनेक कलाकारांना दुखापत देखील होते. अशीच दुखापत नुकतीच ‘साम दाम दंड भेद’ या मालिकेच्या सेटवरच्या एका कलाकाराला झाली.
‘साम दाम दंड भेद’ मध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या ऐश्वर्या खरेला एका दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळेस किरकोळ अपघात झाला. ती चित्रीकरण करत असताना अचानक रस्त्यावर पडली आणि त्यामुळे काही तास मालिकेचे चित्रीकरण थांबवावे लागले. मालिकेत सध्या सुरू असलेल्या ट्रॅकनुसार आलिया या मुलीला बालविवाहापासून वाचवण्याच्या मिशनवर बुलबुल आहे. यासाठी आपल्या सहकलाकारासोबत धावतानाचे दृश्य चित्रीत करताना ऐश्वर्याला दुखापत झाली.
ऐश्वर्या या मालिकेत भानु उदयची पत्नी बुलबुलची भूमिका साकारत आहे. रस्त्यावर या दृश्याचे चित्रीकरण केले जात होते, ज्यात ऐश्वर्या पळत असते. या दृश्याच्या वेळी तिने साडी घातलेली असल्याने तिला पळायला खूपच त्रास होत होता आणि त्यातच तिचा डाव पाय मुरगळला आणि ती पडली. याविषयी ती सांगते, “आम्ही रस्त्यावर चित्रीकरण करत होतो, या दृश्यासाठी मी साडी घातली होती. पण धावत असताना माझा पाय साडीत अडकला आणि मी पडले. त्यावेळी मला खूप लागले आहे असे मला वाटले नाही. पण डॉक्टरांच्या मते मला काही दिवस पूर्ण विश्रांतीची गरज आहे. माझ्या गुडघ्यालाही खरचटले असून मला हालचाल करायला मनाई करण्यात आली आहे."
ऐश्वर्याची ही अवस्था पाहिल्यानंतर प्रॉडक्शन टीमने तिच्याशिवाय चित्रीकरण करण्याचे ठरवले आणि ती पूर्ण बरी झाल्यानंतरच तिने चित्रीकरणासाठी येण्याचा तिला सल्ला दिला. त्यावर ती सांगते, “मला अजिबात हलता येत नाहीये. त्यामुळे टीमने मला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे आणि त्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे. मी काही दिवसांतच चित्रीकरणास पुन्हा रूजू होईन.”
Also Read : ‘साम दाम दंड भेद’ या मालिकेतील या अभिनेत्रींची ऑफस्क्रीन 'याराना'!
‘साम दाम दंड भेद’ मध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या ऐश्वर्या खरेला एका दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळेस किरकोळ अपघात झाला. ती चित्रीकरण करत असताना अचानक रस्त्यावर पडली आणि त्यामुळे काही तास मालिकेचे चित्रीकरण थांबवावे लागले. मालिकेत सध्या सुरू असलेल्या ट्रॅकनुसार आलिया या मुलीला बालविवाहापासून वाचवण्याच्या मिशनवर बुलबुल आहे. यासाठी आपल्या सहकलाकारासोबत धावतानाचे दृश्य चित्रीत करताना ऐश्वर्याला दुखापत झाली.
ऐश्वर्या या मालिकेत भानु उदयची पत्नी बुलबुलची भूमिका साकारत आहे. रस्त्यावर या दृश्याचे चित्रीकरण केले जात होते, ज्यात ऐश्वर्या पळत असते. या दृश्याच्या वेळी तिने साडी घातलेली असल्याने तिला पळायला खूपच त्रास होत होता आणि त्यातच तिचा डाव पाय मुरगळला आणि ती पडली. याविषयी ती सांगते, “आम्ही रस्त्यावर चित्रीकरण करत होतो, या दृश्यासाठी मी साडी घातली होती. पण धावत असताना माझा पाय साडीत अडकला आणि मी पडले. त्यावेळी मला खूप लागले आहे असे मला वाटले नाही. पण डॉक्टरांच्या मते मला काही दिवस पूर्ण विश्रांतीची गरज आहे. माझ्या गुडघ्यालाही खरचटले असून मला हालचाल करायला मनाई करण्यात आली आहे."
ऐश्वर्याची ही अवस्था पाहिल्यानंतर प्रॉडक्शन टीमने तिच्याशिवाय चित्रीकरण करण्याचे ठरवले आणि ती पूर्ण बरी झाल्यानंतरच तिने चित्रीकरणासाठी येण्याचा तिला सल्ला दिला. त्यावर ती सांगते, “मला अजिबात हलता येत नाहीये. त्यामुळे टीमने मला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे आणि त्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे. मी काही दिवसांतच चित्रीकरणास पुन्हा रूजू होईन.”
Also Read : ‘साम दाम दंड भेद’ या मालिकेतील या अभिनेत्रींची ऑफस्क्रीन 'याराना'!