‘गणवेश’ची कथा
By Admin | Updated: June 17, 2016 01:45 IST2016-06-17T01:45:52+5:302016-06-17T01:45:52+5:30
चित्रपटाची कथा लिहिताना लेखकाला अनेकदा त्या कथेच्या पात्रांमध्ये एकदम परफेक्ट बसणारे कलाकार दिसू लागतात. जसजशी ती कथा पुढे जाते, तसतसे त्या पात्रांचे त्या कथेशी असलेले नाते अधिकच

‘गणवेश’ची कथा
- लिहितानाच रोल झाला फायनल
चित्रपटाची कथा लिहिताना लेखकाला अनेकदा त्या कथेच्या पात्रांमध्ये एकदम परफेक्ट बसणारे कलाकार दिसू लागतात. जसजशी ती कथा पुढे जाते, तसतसे त्या पात्रांचे त्या कथेशी असलेले नाते अधिकच दृढ होत जाते अन् त्यांची नाळ घट्ट होऊन ते कलाकार लेखकाला अगदी हुबेहूब त्या रोलमध्ये दिसू लागतात. आता असेच काही झाले आहे ‘गणवेश’ या सिनेमाविषयी.
या चित्रपटाचे दिग्दर्शक अतुल जगदाळे यांना गणवेशच्या एका भूमिकेसाठी अभिनेते किशोर कदम डोक्यात होते अन् त्यांनी मग या रोलसाठी किशोर कदम यांची निवड केली. सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये या गोष्टीचे गुपित दिग्दर्शकांनी उलगडले अन् सांगितले की ही कथा लिहितानाच यामध्ये मला किशोर कदम दिसत होते. तेव्हाच त्यांचा रोल फायनल झाला होता. आपल्यालाही माहीतच आहे, की किशोर कदम यांचा रांगडा अभिनय प्रेक्षकांना भावतो. त्यांच्या आवाजातील लकब अन् संवादकौशल्य यावर अनेक जण फिदा आहेतच. नटरंग, फॅन्ड्री, परतू या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका कायमच लक्षात राहिल्या आहेत. आता किशोर कदम आपल्याला पुन्हा एकदा ‘गणवेश’मध्ये एका वडिलांची भूमिका करताना दिसणार आहेत. हा रोल त्यांनी कशा प्रकारे साकारला आहे, यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये नक्कीच हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली असेल यात काही शंका नाही.