"आयुष्य हे क्षणभंगुर, त्यामुळे दयाळूपणे..." अहमदाबाद विमान अपघातानंतर रश्मिका झाली भावुक, म्हणाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:54 IST2025-06-16T12:54:13+5:302025-06-16T12:54:31+5:30

अहमदाबाद विमान अपघाताने साऱ्यांचे मन अगदी हेलावून गेलं आहे.

Rashmika Mandanna reacts to Ahmedabad plane crash tragedy | "आयुष्य हे क्षणभंगुर, त्यामुळे दयाळूपणे..." अहमदाबाद विमान अपघातानंतर रश्मिका झाली भावुक, म्हणाली

"आयुष्य हे क्षणभंगुर, त्यामुळे दयाळूपणे..." अहमदाबाद विमान अपघातानंतर रश्मिका झाली भावुक, म्हणाली

Rashmika Mandanna: अहमदाबाद विमानतळावरून १२ जून २०२५ च्या दुपारी लंडनच्या गॅटविक विमानतळावर जाण्यासाठी हवेत झेपावलेलं एअर इंडियाचं विमान एका मिनिटाच्या आतच कोसळलं. या बोईंग ड्रीमलायनर विमानात असलेल्या २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. यातील फक्त एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला. हे विमान अहमदाबाद विमानतळाच्या (Ahmedabad Plane Crash Tragedy) जवळच असणाऱ्या एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलवर कोसळलं होतं. त्यामुळे तिथले लोकही विमान अपघाताचे बळी ठरले. या विमान अपघातातील एकूण मृतांची संख्या २७० वर पोहोचली आहे. या दुःखद अपघाताने साऱ्यांचे मन अगदी हेलावून गेलं आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाने नुकतंच एका कार्यक्रमात या अपघातावर भाष्य केलं.

नुकतंच रश्मिका एका कार्यक्रमात पोहचली होती. तिथं अपघाताबद्दल विचार करताच आत्मा थरथर कापत असल्याचं तिनं म्हटलं. रश्मिका म्हणाली, "अहमदाबाद विमान अपघाताने मला हादरवून टाकलं मी दररोज विमानाने प्रवास करते आणि या अपघाताने मला आपले जीवन किती अप्रत्याशित आहे याची जाणीव करून दिली".

रश्मिका मंदानाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अलीकडेच सलमान खानच्या 'सिकंदर'मध्ये दिसली होती. या चित्रपटात सलमानसोबत दिसली होती. 'सिकंदर'व्यतिरिक्त, रश्मिका आता तिच्या 'कुबेरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. शेखर कम्मुला दिग्दर्शित हा चित्रपट आहे. हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये एकाच वेळी चित्रित करण्यात आला आहे. चित्रपटात रश्मिकासोबत धनुष आणि नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. 

Web Title: Rashmika Mandanna reacts to Ahmedabad plane crash tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.