"जाहिरातीत माझ्या जागी विद्या बालनला रिप्लेस केलं", ऐश्वर्या नारकर म्हणाल्या- "शेवटच्या क्षणी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:05 IST2025-01-17T12:00:26+5:302025-01-17T12:05:36+5:30
जेव्हा रातोरात ऐश्वर्या नारकर यांच्या जागी विद्या बालनला केलं रिप्लेस, अभिनेत्री म्हणाली- "शेवटच्या क्षणी..."

ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अभिनय आणि सौंदर्याने त्यांनी ९०चं दशक गाजवलं.
९०च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या ऐश्वर्या यांना रिजेक्शनचा सामनाही करावा लागला होता.
रातोरात त्यांना एका जाहिरातीत रिप्लेस केलं गेलं होतं. अखेरच्या क्षणी त्यांना काढून विद्या बालनला घेतलं गेलं होतं.
आरपार या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या यांनी हा किस्सा सांगतिला. त्या म्हणाल्या, "मी नेहमी कम्फर्ट झोनमध्ये राहूनच काम केलं. त्यामुळे फार रिजेक्शनचा प्रश्न आला नाही".
"माझ्याकडे काम आलं आणि मी ते करत गेले. पण, मी स्वत:हून फारशी कुणाकडे काम मागायला गेले नाही".
"पण, जाहिरातीबाबत तसं झालं होतं. मला आठवतंय की एका जाहिरातीसाठी मी ऑडिशन दिली होती".
"विद्या बालन आणि मी तेव्हा शॉर्ट लिस्ट झालो होतो. बाहेर जाऊन कुठेतरी ती जाहिरात त्यांना शूट करायची होती".
"क्लाइंटला हवं म्हणून त्यांनी विमानाची तिकीटं वगैरे बूक केली होती. माझ्या हातात तिकिटं होती पण, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही होल्डवर आहात".
"आणि मग आदल्या दिवशी रात्री फोन आला की तुमचं नाही तिचं सिलेक्शन झालं. तेव्हा मग ते मनाला खूप लागलं होतं".
"त्यानंतर मग मी जाहिराती नाही करायचं असं ठरवलं. तुम्ही आधी सांगा की तुमचं सिलेक्शन झालेलं नाही ते चालेल. पण, गृहित धरलेलं मला आवडत नाही".