लिखाणामुळे मोडलं होतं मनोज मुंतशिरचं लग्न; होणाऱ्या बायकोचा भाऊ ठरला व्हिलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 12:45 PM2023-06-27T12:45:02+5:302023-06-27T12:52:36+5:30

Manoj muntashir: मनोजने 'द कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या मोडलेल्या पहिल्या लग्नाविषयी भाष्य केलं.

ओम राऊत याच्या आदिपुरुषमुळे सध्या चर्चेत येत असलेला लेखक म्हणजे मनोज मुंतशिर.

बऱ्याचदा लेखनशैलीमुळे चर्चेत येणारा मनोज सध्या त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आला आहे.

अलिकडेच मनोजने द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या मोडलेल्या पहिल्या लग्नाविषयी भाष्य केलं. विशेष म्हणजे त्याच्या लेखनामुळेच त्याचं लग्न मोडल्याचं त्याने सांगितलं.

"13 मे 1997 रोजी माझं लग्न होणार होतं. लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या. पण, लग्नाच्या एक महिना आधी एप्रिलमध्ये त्या मुलीचा भाऊ मला भेटायला आला. त्याने मला माझ्या करिअर प्लॅनिंगबद्दल विचारलं. त्यावर मला गीतकार व्हायचंय हे मी सांगितलं", असं मनोज म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "माझं प्लॅनिंग ऐकल्यानंतर चांगले विचार आहेत असं तो म्हणाला. पण, परत एकदा पुढे तू तुझ्या करिअरमध्ये काय करणार?" असं विचारलं. यावेळी मला पूर्णवेळ गीतकार व्हायचं आहे असं सांगितलं. त्यानंतर तो घरी गेला आणि मला लग्न मोडल्याची बातमी मिळाली."

"मी त्या मुलीच्या प्रेमात होतो त्यामुळे मला फार वाईट वाटलं.पण, प्रेम किंवा लिखाण मला एकाची निवड करायची होती. आणि, मी लिखाणाची केली."

दरम्यान, पहिलं लग्न मोडल्यानंतर मनोजने निलमसोबत लग्न केलं.

निलमदेखील एक लेखिका आहे. तसंच या दोघांना आरु शुक्ला हा मुलगादेखील आहे.