विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:47 IST2025-06-17T14:34:11+5:302025-06-17T14:47:19+5:30

विमान अपघातात बॉलीवुडच्या सुपरस्टारचा जीव थोडक्यात वाचला. पत्नीच्या हट्टामुळे ते त्या फ्लाइटने गेले नव्हते.

अहमदाबादमध्ये विमान अपघातात २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अहमदाबादवरुन लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदामध्ये कोसळले होते.

अहमदाबादमधील या अपघातानंतर याआधी घडलेल्या विमान अपघातांची चर्चा सुरू झाली आहे.

असाच एक अपघात काही वर्षांपूर्वी घडला होता. त्याच विमानातून एक बॉलिवूडचा सुपरस्टार प्रवास करणार होता. पण, बायकोच्या हट्टामुळे अभिनेत्याचं विमान सुटलं होतं आणि जीव थोडक्यात वाचला होता.

तर ते सुपरस्टार म्हणजे जितेंद्र (Jitendras Life Was Saved From A 1976 Plane Crash). बॉलिवूड अभिनेते जितेंद्र हे बायकोच्या हट्टामुळे विमान अपघातामधून थोडक्यात बचावले होते. जितेंद्र यांनी कपिल शर्मा शोमध्ये त्याच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला होता.

जितेंद्र हे १९७६ मध्ये (1976 Plane Crash) ज्या विमानाने प्रवास करणार होते, ते नंतर क्रॅश (Plane Crash) झालं होतं.

जितेंद्र यांनी सांगितलं, की ते विमानतळावर पोहोचले होते. परंतु त्यांना विमान पकडण्यास उशीर झाला होता आणि नशिबाने ते अक्षरशः मृत्यूच्या दारातून परतले.

कपिल शर्मा शोमध्ये हा किस्सा सांगताना जितेंद्र भावूक झाले होते. त्यांनी सांगितलं की, त्या दिवशी करवाचौथ होता. त्यांची पत्नी शोभा चंद्र दिसण्याची वाट पाहत होत्या. त्याचवेळी शोभा यांचा फोन आला आणि त्यांनी जितेंद्र यांना माघारी बोलावलं.

तेव्हा जितेंद्र एअरपोर्टवर पोहोचलेले होते, पण फ्लाइट २ तास उशिरा असल्याचं समल्यानंतर त्यांनी विचार केला की एवढ्या वेळात घरी जाऊन करवाचौथची पूजा करूया आणि ते घरी परतले. पत्नी शोभा यांच्या आग्रहामुळे ते पुन्हा एअरपोर्टवर गेलेच नाही. काही वेळाने, त्यांना बातमी मिळाली की, ज्या विमानातून ते प्रवास करणार होते ते विमान क्रॅश झालं.

जितेंद्र यांनी कबूल केलं की, जर त्यांनी त्या दिवशी त्यांच्या पत्नी शोभा यांचे ऐकले नसते तर कदाचित ते आज नसते. कपिल शर्मा शोमध्ये ते म्हणाले, "त्या दिवशी जाणवले की जर नशीब आणि आपल्या जवळच्या व्यक्तींचे प्रेम तुमच्यासोबत असेल तर मृत्यू देखील आपल्याला शरण जातो".

जितेंद्र यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. वाढत्या वयामुळे त्यांनी गेल्या काही वर्षांपासून चित्रपटात काम करणे थांबवले आहे. जितेंद्र यांना मुलगी एकता आणि मुलगा तुषार ही दोन मुले आहेत. त्यांची दोन्ही मुले बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत.