मल्टिटॅलेंटेड सेलिब्रिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2016 01:48 IST2016-06-17T01:48:52+5:302016-06-17T01:48:52+5:30

बॉलीवूडमध्ये सलमान खान, आलिया भट, श्रद्धा कपूर अशा अनेक कलाकरांनी आपल्या अभिनयाप्रमाणेच आपल्या सुरेख आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सलमानचे ‘मै हूँ हिरो तेरा

Multitelent celebrity | मल्टिटॅलेंटेड सेलिब्रिटी

मल्टिटॅलेंटेड सेलिब्रिटी

बॉलीवूडमध्ये सलमान खान, आलिया भट, श्रद्धा कपूर अशा अनेक कलाकरांनी आपल्या अभिनयाप्रमाणेच आपल्या सुरेख आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सलमानचे ‘मै हूँ हिरो तेरा’, तर आलियाचे ‘मै तेनू संग जावा’ की, तसेच श्रद्धा कपूरच्या ‘आशिकी’ या गाण्यांनीदेखील डायरेक्ट तरुणांच्या मोबाइलमध्येच जागा तयार केली आहे. आता हीच क्रेझ मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील दिसून येत आहे. केतकीच्या ‘मला वेड लागले’ गाण्याने तरुणाईला वेड लावले होते, तर तेजस्विनी व सईच्या ‘तोला तोला’ गाण्यानेदेखील प्रेक्षक मोहीत झाले होते. सध्या या ट्रेडच्या माध्यमातून प्रेक्षकांना अभिनय आणि गायन या दोन्ही कलांच्या माध्यमातून सेलिब्रिटींचे मल्टिटॅलेंट पाहायला मिळत आहे. अशाच काही कलाकारांशी ‘लोकमत सीएनएक्स’ने साधलेला संवाद.

क्रांती रेडेकर : गाणं गाणे हे खूप अवघड आहे; पण तरीही मला गाणं गायला फार आवडतं. मी सिंगिंग रियालिटी शोमध्येदेखील सहभागी झाले होते. मला खूप छान गाता येत नाही, हे माहीत आहे. त्याचबरोबर, गाण्याचेदेखील लिमिटेशन असतात, याची जाणीवदेखील आहे. तसेच, मी नुकतेच एका चित्रपटासाठी गाणं गायले आहे. ही माझ्यासाठी चालून आलेली संधी आहे. त्यामुळे हा जो अनुभव मिळाला तो खरंच अविस्मरणीय होता. विशेष म्हणजे, या गाण्याचे संगीत वैशाली सावंतने दिल्यामुळे हे एक माझ्यासाठी विशेष म्हणावे लागेल. तसेच, मी गायलेल्या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकदेखील मला लाईव्ह गायला सांगतात, याचा मला खूप आनंद होतो.

स्वप्निल जोशी : लाल इश्क या चित्रपटातील चिमणी चिमणी गाणे मी फक्त दिग्दर्शकाच्या डिमांडमुळे गायलो. पण मी पुन्हा गाणार नाही. कारण रसिकमायबाप प्रेक्षक हे तिकीट काढून चित्रपट पाहायला येतात. त्यामुळे त्यांना चांगली क्वालिटी ही दिली पाहिजे. तसेच गायक देखील हे त्यांच्या आवाजासाठी खूप मेहनत घेत असतात. पण मी ठरवलं आहे पुन्हा गाणं गाणार नाही. जर चित्रपट तयार करताना तशी गरज असेल तर नक्कीच मी ते गाणं गाईन. पण चिमणी चिमणी या गाण्याच्या माध्यमातून जो अनुभव मिळाला तो खरचं खूप छान होता.

केतकी माटेगावकर : संगीत नाटकामधून काम करायचे; त्यामुळे अभिनय करणे ही गोष्ट शक्य झाली. तसेच, अभिनयासोबत गाणं गाणे हा माझ्यासाठी वेगळा अनुभव आहे. एक गायिका व अभिनेत्री म्हणून मी प्रेक्षकांना माहिती होते; पण या माझ्या दोन्ही कला एकत्रित प्रेक्षकांपर्यंत ‘टाइमपास’ चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचल्या आहेत आणि आनंद या गोष्टीचा आहे, की थोडक्यात ‘मला वेड लागले प्रेमाचे’ गाणं गाताना प्राजूची भूमिका माहीत होती. त्यामुळे गाणं गाण्यासदेखील मदत झाली. तसेच, गाणं गायल्यामुळे शूटिंगच्या वेळी अभिनय करण्यास एक स्पेशल एक्स्प्रेशन देण्यासदेखील वाव मिळाला. आता, हिंदी काकस्पर्श या चित्रपटांतदेखील अभिनयासहित दोन गाणी मी स्वत: गायली आहेत.

भारत गणेशपुरे : संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदी शैलीने खळखळून हसविणारे भारत गणेशपुरे आता गायक बनणार आहेत. त्यांनी नुकतेच ‘बरड’ या चित्रपटासाठी ‘माती खाल्ली’ हे गाणे गायले आहे. समाजजागृती करणारे हे गाणे आहे. याविषयी भारत म्हणाले, ‘‘हा अनुभव खूप अप्रतिम होता. नाशिकच्या स्टुडिओमध्ये हे गाणे गायले आहे. खरे तर दिग्दर्शकांच्या फोर्समुळे हे गाणे गायले आहे. त्यांना मी त्या वेळी म्हणालो, जर तुम्ही स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणार असाल, तर गातो मी. शेवटी डान्स स्टेपप्रमाणे एक, दोन, तीन करीत हे गाणे पूर्ण केले. पूर्वी गाणी गाण्याची भीती वाटत होती; पण आता गाऊ शकतो, असा कॉन्फिडन्स तरी नक्कीच मिळाला आहे.’’

- - benzeerjamadar@lokmat.com

Web Title: Multitelent celebrity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.