SEE Wedding Pics:अक्षया गुरव अडकली रेशीमगाठीत !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 11:52 IST2017-05-25T06:14:01+5:302017-05-25T11:52:04+5:30
छोट्या पडद्यावरील लव-लग्न-लोचा या मालिकेत सौम्या ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री अक्षया गुरव हिनं आपल्या अभिनयानं तरुणांच्या मनात अढळ स्थान ...

SEE Wedding Pics:अक्षया गुरव अडकली रेशीमगाठीत !
छ ट्या पडद्यावरील लव-लग्न-लोचा या मालिकेत सौम्या ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री अक्षया गुरव हिनं आपल्या अभिनयानं तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. मात्र आपल्या फॅन्सना अक्षयानं मोठा धक्का दिलाय. अक्षया नुकतीच रेशीमगाठीत अडकली.लग्नाचा जास्त गाजावाजा न करता जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.भूषण वाणीसह ती लग्नगाठीत अडकलीय.भूषण वाणी हा सिनेमॅटोग्राफर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अक्षया आणि भूषण एकमेंकांना डेट करत होते. अखेर दोघांनीही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. लव-लग्न-लोचा या मालिकेमुळे अक्षया घराघरात पोहचली आहे. ती साकारत असलेली सौम्या ही भूमिका रसिकांना चांगलीच भावते आहे. या भूमिकेनं तिला नवी ओळख मिळवून दिली आहे.या मालिकेआधी अक्षयाने मेंहदीच्या पानावर, मानसीचा चित्रकार तो या मालिकेत काम केलं आहे. याशिवाय फेकमफाक या सिनेमातही अक्षयानं काम केलं आहे. तर भूषण हासुद्धा लग्न मुबारक या सिनेमासाठी काम करतो आहे. लव-लग्न-लोचा करत करत अक्षया रिअल लाइफमध्ये आधी लव आणि लग्नाच्या बेडीत अडकली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.अक्षया आणि भूषण यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा.
![]()
![]()
![]()
'लव लग्न लोचा' या मालिकेतील सुमीत म्हणजेच ओंकार गोवर्धन हा अक्षया म्हणजेच सौम्याच्या प्रेमात पडल्याचे रसिकांनी पाहिलंय.मालिकेत अक्षयाने साकारलेली सौम्या ही दिसायला अतिशय सुंदर, डॅशिंग अशी आहे. तिला तिच्यावर लादलेली बंधने कधीच आवडत नाहीत. तिला हवे तसे ती आयुष्य जगते.आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगला पाहिजे अशी तिची विचारसरणी असते. त्यामुळेच सौम्या आणि सुमीत दोघांची प्रेमकथा रसिकांच्या पसंती पात्र ठरली होती.
'लव लग्न लोचा' या मालिकेतील सुमीत म्हणजेच ओंकार गोवर्धन हा अक्षया म्हणजेच सौम्याच्या प्रेमात पडल्याचे रसिकांनी पाहिलंय.मालिकेत अक्षयाने साकारलेली सौम्या ही दिसायला अतिशय सुंदर, डॅशिंग अशी आहे. तिला तिच्यावर लादलेली बंधने कधीच आवडत नाहीत. तिला हवे तसे ती आयुष्य जगते.आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगला पाहिजे अशी तिची विचारसरणी असते. त्यामुळेच सौम्या आणि सुमीत दोघांची प्रेमकथा रसिकांच्या पसंती पात्र ठरली होती.