सयाजीचे मनोगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 08:39 IST2016-02-24T15:39:13+5:302016-02-24T08:39:13+5:30
कलाकारांना विविध चित्रपटांतून अनेक भूमिका साकारण्याचे भाग्य मिळते. त्यातून बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतात. काही चित्रपटांची कलाकार आतूरतेने वाट ...

सयाजीचे मनोगत
क ाकारांना विविध चित्रपटांतून अनेक भूमिका साकारण्याचे भाग्य मिळते. त्यातून बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतात. काही चित्रपटांची कलाकार आतूरतेने वाट पाहत असतात. अशीच संधी सयाजी शिंदे या गुणवंत अभिनेत्याला ‘बाबांची शाळा’ चित्रपटातून मिळाली.
तो म्हणतो, 1957 मध्ये व्ही. शांताराम यांनी ‘दो आँखे बारा हाथ’ हा उत्कृष्ट सिनेमा तयार केला होता. कठीण परिस्थितीमध्ये केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेल्या चांगल्या मनाच्या कैद्याची जीवनावर तो आधारित आहे. आजही तो चित्रपट मला आकर्षित करतो. त्या प्रकारचे काम करण्याची संधी मला ‘बाबांची शाळा’ या चित्रपटातून मिळाली.
कधीकधी परिस्थितीवर आपले नियंत्रण नसते. अशावेळी आपल्या हातून गुन्हा घडतो. त्याची शिक्षा केवळ गुन्हेगारालाच नाही तर त्याच्या कुटुंबियांनादेखील भोगावी लागते. कैद्याचे नीटपणे पुनर्वसन केले तर त्यांच्या आयुष्यात फार मोठा सकारात्मक बदल होऊ शकतो असा संदेश बाबांची शाळा या चित्रपटातून देण्यात आला आहे.
![babanchi shaala]()
कोल्हापूर जेलमध्ये शूटिंग करण्याचा अनुभव शेअर करताना सयाजी म्हणाली की, मी अनेक कैद्याना भेटलो. त्यांनी मला भूमिका समजून घेण्यासाठी खूप माहिती दिली. त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांना आजही पश्चताप होतोय असे प्रामाणिकपणे कबुल करतात.
तो म्हणतो, 1957 मध्ये व्ही. शांताराम यांनी ‘दो आँखे बारा हाथ’ हा उत्कृष्ट सिनेमा तयार केला होता. कठीण परिस्थितीमध्ये केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेल्या चांगल्या मनाच्या कैद्याची जीवनावर तो आधारित आहे. आजही तो चित्रपट मला आकर्षित करतो. त्या प्रकारचे काम करण्याची संधी मला ‘बाबांची शाळा’ या चित्रपटातून मिळाली.
कधीकधी परिस्थितीवर आपले नियंत्रण नसते. अशावेळी आपल्या हातून गुन्हा घडतो. त्याची शिक्षा केवळ गुन्हेगारालाच नाही तर त्याच्या कुटुंबियांनादेखील भोगावी लागते. कैद्याचे नीटपणे पुनर्वसन केले तर त्यांच्या आयुष्यात फार मोठा सकारात्मक बदल होऊ शकतो असा संदेश बाबांची शाळा या चित्रपटातून देण्यात आला आहे.
कोल्हापूर जेलमध्ये शूटिंग करण्याचा अनुभव शेअर करताना सयाजी म्हणाली की, मी अनेक कैद्याना भेटलो. त्यांनी मला भूमिका समजून घेण्यासाठी खूप माहिती दिली. त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांना आजही पश्चताप होतोय असे प्रामाणिकपणे कबुल करतात.