चौर्य चित्रपटाची रहस्यमयकथा ५ आॅगस्टला उलगडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 12:28 IST2016-08-02T06:58:19+5:302016-08-02T12:28:19+5:30
चौथºयावर महिलांना प्रवेश न देण्यावरून शनि शिंगणापूर हे देवस्थान चर्चेत आलं होत. आता पुन्हा या गावाची चर्चा चौर्य या ...

चौर्य चित्रपटाची रहस्यमयकथा ५ आॅगस्टला उलगडणार
च थºयावर महिलांना प्रवेश न देण्यावरून शनि शिंगणापूर हे देवस्थान चर्चेत आलं होत. आता पुन्हा या गावाची चर्चा चौर्य या चित्रपटामुळे रंगत आहे. कारण या चित्रपटामध्ये एक आगळं वेगळं गाव आहे. त्या गावात घरांना दरवाजे नसतात. तिथल्या लोकांची श्रद्धा असते की, चोरी करणाºयांना देव शिक्षा करतो. परंतु एक दिवस त्या मंदिरामध्ये दरोडा पडतो आणि लोकांच्या श्रद्धेला तडा पोहोचतो. अंगावर शहारे आणणाºया या रहस्यमय घटनेतून सुरू होतो. चोर आणि श्रद्धेचा शोध याविषयीभोवती चित्रपटाचे कथान गुंफण्यात आले आहे. नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या निलेश नवलखा , विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून राजन आमले हे सहनिमार्ते आहे. चित्रपटाची प्रस्तुती नवलाखा आर्ट्स व साधना सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमानाने केली आहे. या चित्रपटात किशोर कदम, मिलिंद शिंदे, गणेश यादव, दिग्विजय रोहिदास, प्रदीप वेलणकर, दिनेश लता शेट्टी जयेश सांघवी, तीर्था मुरबाडकर, आरजे श्रुती या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले असून हा चित्रपट ५ आॅग्सट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.