मल्टीटॅलेंटेड सेलेब्रिटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 18:08 IST2016-06-19T12:38:49+5:302016-06-19T18:08:49+5:30
बॉलीवुडमध्ये सलमान खान, आलिया भट, श्रद्धा कपूर अशा अनेक कलाकरांनी आपल्या अभिनयाप्रमाणेच आपल्या सुरेख आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले ...
.jpg)
मल्टीटॅलेंटेड सेलेब्रिटी
ॉलीवुडमध्ये सलमान खान, आलिया भट, श्रद्धा कपूर अशा अनेक कलाकरांनी आपल्या अभिनयाप्रमाणेच आपल्या सुरेख आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सलमानचा मै हूँ हिरो तेरा तर आलियाचे मै तेनू संग जावा की तसेच श्रद्धा कपूरच्या आशिकी या गाण्यांनी देखील डायरेक्ट तरूणांच्या मोबाईलमध्येच जागा तयार केली आहे. आता हीच क्रेझ मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील दिसून येत आहे. केतकीच्या मला वेड लागले या गाण्याने तरूणाईला वेड लावले होते. तर तेजस्विनी व सईच्या तोला तोला या गाण्याने देखील प्रेक्षक मोहीत झाले होते. सध्या या ट्रेडच्या माध्यमातून प्रेक्षकांना अभिनय आणि गायन या दोन्ही कलेच्या माध्यमातून सेलिब्रेटींचे मल्टीटॅलेंटेड सेलेब्रिटी पाहायला मिळत आहे.अशाच काही कलाकारांशी लोकमत सीएनएक्सने साधलेला संवाद
क्रांती रेडेकर: गाणं गाणे हे खूप अवघड आहे. पण तरी ही मला गाणं गायला फार आवडतं. मी सिंगीग रियालिटी शोमध्ये देखील सहभागी झाले होते. मला खूप छान गाता येत नाही हे माहित आहे. त्याचबरोबर गाण्याचे देखील लिमिटेशन असतात याची जाणीव देखील आहे. तसेच मी नुकतेच एका चित्रपटासाठी गाणं गायले आहे. ही माझ्यासाठी चालून आलेली संधी आहे. त्यामुळे हा जो हा अनुभव मिळाला तो खरचं अविस्मरणीय होता. विशेष म्हणजे या गाण्याचे संगीत वैशाली सावंतने दिल्यामुळे हे एक माझ्यासाठी विशेष म्हणावं लागेल. तसेच मी गायलेल्या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकदेखील मला लाईव्ह गायला सांगतात याचा मला खूप आनंद होतो.
![]()
केतकी माटेगावकर: संगीत नाटकमधून काम करायचे त्यामुळे अभिनय करणे ही गोष्ट शक्य झाली. तसेच अभिनयासोबत गाणं गाणे हा माझ्यासाठी वेगळा अनुभव आहे. एक गायिका व अभिनेत्री म्हणून मी प्रेक्षकांना माहिती होते. पण या माझ्या दोन्ही कला एकत्रित प्रेक्षकांपर्यत टाईमपास या चित्रपटाच्या माध्यमातून पोहचल्या आहेत. आणि आनंद या गोष्टीचा आहे की, थोडक्यात मला वेड लागले प्रेमाचे हे गाणं गाताना प्राजूची भूमिका माहित होती. त्यामुळे गाणं गाण्यास देखील मदत झाली. तसेच गाणं गायल्यामुळे शुटिंगवेळी अभिनय करण्यास एक स्पेशल एक्सप्रेशन देण्यास देखील वाव मिळाला. आता, हिंदी काकस्पर्श या चित्रपटादेखील अभिनयासहित दोन गाणी मी स्वत: गायली आहेत.
![]()
स्वप्नील जोशी: लाल इश्क या चित्रपटातील चिमणी चिमणी गाणे मी फक्त दिग्दर्शकाच्या डिमांडमुळे गायलो. पण मी पुन्हा गाणार नाही. कारण रसिकमायबाप प्रेक्षक हे तिकीट काढून चित्रपट पाहायला येतात. त्यामुळे त्यांना चांगली क्वालिटी ही दिली पाहिजे. तसेच गायक देखील हे त्यांच्या आवाजासाठी खूप मेहनत घेत असतात. पण मी ठरवलं आहे पुन्हा गाणं गाणार नाही. जर चित्रपट तयार करताना तशी गरज असेल तर नक्कीच मी ते गाणं गाईन. पण चिमणी चिमणी या गाण्याच्या माध्यमातून जो अनुभव मिळाला तो खरचं खूप छान होता.
![]()
भारत गणेशपुरे: संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदी शैलीने खळखळून हसविणारे भारत गणेशपुरे आता गायक बनणार आहे. त्यांनी नुकतेच बरड या चित्रपटासाठी माती खाल्ली हे गाणे गायलं आहे. समाजजागृत करणारे हे गाणे आहे. याविषयी बोलताना भारत म्हणाले, हा अनुभव खूप अप्रतिम होता. नाशिकच्या स्टुडिओमध्ये हे गाणे गायले आहे. खरं तर दिग्दर्शकांच्या फोर्समुळे हे गाणं गायलं आहे. त्यांना मी त्यावेळी म्हटलो जर तुम्ही स्वत:च्या पायावर धोडां मारून घेणार असेल तर गातो मी. शेवटी डान्स स्टेपप्रमाणे एक, दोन,तीन करत हे गाणे पूर्ण केले. पूर्वी गाणी गाण्याची भिती वाटत होती पण आता गाऊ शकतो असा कॉन्फिडन्स तरी नक्कीच मिळाला आहे.
क्रांती रेडेकर: गाणं गाणे हे खूप अवघड आहे. पण तरी ही मला गाणं गायला फार आवडतं. मी सिंगीग रियालिटी शोमध्ये देखील सहभागी झाले होते. मला खूप छान गाता येत नाही हे माहित आहे. त्याचबरोबर गाण्याचे देखील लिमिटेशन असतात याची जाणीव देखील आहे. तसेच मी नुकतेच एका चित्रपटासाठी गाणं गायले आहे. ही माझ्यासाठी चालून आलेली संधी आहे. त्यामुळे हा जो हा अनुभव मिळाला तो खरचं अविस्मरणीय होता. विशेष म्हणजे या गाण्याचे संगीत वैशाली सावंतने दिल्यामुळे हे एक माझ्यासाठी विशेष म्हणावं लागेल. तसेच मी गायलेल्या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकदेखील मला लाईव्ह गायला सांगतात याचा मला खूप आनंद होतो.
केतकी माटेगावकर: संगीत नाटकमधून काम करायचे त्यामुळे अभिनय करणे ही गोष्ट शक्य झाली. तसेच अभिनयासोबत गाणं गाणे हा माझ्यासाठी वेगळा अनुभव आहे. एक गायिका व अभिनेत्री म्हणून मी प्रेक्षकांना माहिती होते. पण या माझ्या दोन्ही कला एकत्रित प्रेक्षकांपर्यत टाईमपास या चित्रपटाच्या माध्यमातून पोहचल्या आहेत. आणि आनंद या गोष्टीचा आहे की, थोडक्यात मला वेड लागले प्रेमाचे हे गाणं गाताना प्राजूची भूमिका माहित होती. त्यामुळे गाणं गाण्यास देखील मदत झाली. तसेच गाणं गायल्यामुळे शुटिंगवेळी अभिनय करण्यास एक स्पेशल एक्सप्रेशन देण्यास देखील वाव मिळाला. आता, हिंदी काकस्पर्श या चित्रपटादेखील अभिनयासहित दोन गाणी मी स्वत: गायली आहेत.
स्वप्नील जोशी: लाल इश्क या चित्रपटातील चिमणी चिमणी गाणे मी फक्त दिग्दर्शकाच्या डिमांडमुळे गायलो. पण मी पुन्हा गाणार नाही. कारण रसिकमायबाप प्रेक्षक हे तिकीट काढून चित्रपट पाहायला येतात. त्यामुळे त्यांना चांगली क्वालिटी ही दिली पाहिजे. तसेच गायक देखील हे त्यांच्या आवाजासाठी खूप मेहनत घेत असतात. पण मी ठरवलं आहे पुन्हा गाणं गाणार नाही. जर चित्रपट तयार करताना तशी गरज असेल तर नक्कीच मी ते गाणं गाईन. पण चिमणी चिमणी या गाण्याच्या माध्यमातून जो अनुभव मिळाला तो खरचं खूप छान होता.
भारत गणेशपुरे: संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदी शैलीने खळखळून हसविणारे भारत गणेशपुरे आता गायक बनणार आहे. त्यांनी नुकतेच बरड या चित्रपटासाठी माती खाल्ली हे गाणे गायलं आहे. समाजजागृत करणारे हे गाणे आहे. याविषयी बोलताना भारत म्हणाले, हा अनुभव खूप अप्रतिम होता. नाशिकच्या स्टुडिओमध्ये हे गाणे गायले आहे. खरं तर दिग्दर्शकांच्या फोर्समुळे हे गाणं गायलं आहे. त्यांना मी त्यावेळी म्हटलो जर तुम्ही स्वत:च्या पायावर धोडां मारून घेणार असेल तर गातो मी. शेवटी डान्स स्टेपप्रमाणे एक, दोन,तीन करत हे गाणे पूर्ण केले. पूर्वी गाणी गाण्याची भिती वाटत होती पण आता गाऊ शकतो असा कॉन्फिडन्स तरी नक्कीच मिळाला आहे.