अमृता सुभाषला इंटिमेट सीन्ससाठी पतीने दिलेला हा मोलाचा सल्ला येतो कामी, अनुभव सांगताना म्हणाली....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:11 IST2025-06-19T12:11:07+5:302025-06-19T12:11:33+5:30
Amruta Subhash : अमृता सुभाषचा 'जारण' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

अमृता सुभाषला इंटिमेट सीन्ससाठी पतीने दिलेला हा मोलाचा सल्ला येतो कामी, अनुभव सांगताना म्हणाली....
अमृता सुभाष (Amruta Subhash) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठी सिनेमात विविध भूमिका केल्या आहेत. तिने अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. गेल्या वर्षी तिने लस्ट स्टोरीज २मध्ये इंटिमेट सीन्स दिले होते. त्यावेळी ती खूप चर्चेत आली होती. दरम्यान आता एका मुलाखतीत तिने यावर भाष्य केले आहे.
अमृता सुभाषचा जारण हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाचं सध्या ती जोरदार प्रमोशन करते आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत. नुकतेच तिने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत इंटिमेट सीन्स करताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. ती म्हणाली की, ''पहिल्यांदा मला प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असते. इंटिमेट सीन्सची जशी भीती मला वाटते तशीच मला प्रत्येक भूमिकेची भीती वाटत असते. मी इंटिमेट सीन्सला बाजूला काढत नाही. ती एक भावना आहे. पण त्याच्यासाठी वेगवेगळ्या मागण्या असतील तर मला तेव्हा दिग्दर्शक खूप महत्त्वाचा असतो. कोण हे करतंय. त्यात सौंदर्यदृष्टी असणार आहे की नाही हे ठरणार असतं. आज कोंकणा शर्मा करतेय लस्ट स्टोरीज २मध्ये. किंवा आज मी पहिल्यांदा सुमित्रा भावेंच्या बाधा सिनेमात माझा पहिला इंटिमेट असा नाही पण आंघोळ करतानाचा सीन केला होता. तेवढ्या गोष्टीसाठी ते नव्हतं. त्यातून दिग्दर्शक किंवा मेकरला काहीतरी वेगळं सांगू पाहत होता. त्यामुळे ते काय दृष्टीने केलं जातं ते महत्त्वाचं आहे. मला हे संदेशनेच खूप चांगलं समजावून सांगितलं होतं.''
अभिनेत्रीने सांगितला मजेशीर किस्सा
ती पुढे म्हणाली की, ''एक मजेशीर प्रसंग आहे. साठेचं काय करायचं हे नाटक संदेशने दिग्दर्शित केलेलं होतं. मी आणि निखिल रत्नपारखी त्यात काम करायचो. साठे हा एका असूयाचं प्रतिक होतं. नवरा सतत साठेशी तुलना करत असतो. सतत तो साठे साठे करत असतो. त्यात एक सीन असा होता की ते दोघे मिठी मारतात आणि तिथे पण साठेचं बोलतो आणि तिचा मूड ऑफ होतो. बेडमध्येही तो साठे आलाय. असा तो सीन होता. त्याच्यामध्ये एकप्रकारची मिठी मारणे आणि हे स्टेजवर करायचं होतं. पुण्यातला प्रयोग होता. मी तो सीन केला. त्यानंतर एक आजोबा आले आणि आम्हाला म्हणाले की, तुम्ही लग्न करणार आहात का त्यांच्याशी? तुम्ही असं का विचारताय. त्यावर ते म्हणाले की, नाही तुम्ही त्याला अशी मिठी मारलीत, ते तुमच्या नवऱ्याला असं चालणार आहे का? त्यांना मी म्हटलं की, नवराच दिग्दर्शक आहे, तुम्ही त्यालाच विचारा. तर संदेशने मला नेहमीच सांगितलंय की, अमृता एकदा कन्विन्स हो त्या गोष्टीपाशी. कारण कुठलीच भावना हीच नाही तर दुःख, आनंद तू स्क्रीनवर लाजून केलंस तर ते वाईटच दिसणार. त्यामुळे त्याच्याभोवती कन्विन्स होऊन ती सुंदर भावना आहे ना त्यापद्धतीने ते कर. त्यामुळे त्या प्रेमानेच त्या गोष्टी घडल्या आहेत आणि दिग्दर्शकही असे लाभले आहेत आणि ते टेकिंगही तेवढेच महत्त्वाचे असते.''