चित्रपटांनी दाखवले दहशतवाद्यांचे क्रौर्य
By Admin | Updated: November 20, 2015 02:34 IST2015-11-20T02:34:48+5:302015-11-20T02:34:48+5:30
पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा माथेफिरूंच्या क्रौर्याची चर्चा सुरू झाली आहे. जनसामान्यांना त्रस्त करणाऱ्या या समस्येचे गंभीर चित्रण

चित्रपटांनी दाखवले दहशतवाद्यांचे क्रौर्य
पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा माथेफिरूंच्या क्रौर्याची चर्चा सुरू झाली आहे. जनसामान्यांना त्रस्त करणाऱ्या या समस्येचे गंभीर चित्रण बॉलिवूडच्या चित्रपटात करण्यात आले आहे.
८०च्या दशकात देशात जेव्हा दहशतवादाने जलदगतीने पाय पसरायला सुरुवात केली तेव्हा बॉलिवूडच्या दिग्दर्शकांनी त्याची गंभीरतेने दखल घेतली. ८०च्या दशकात सुभाष घई यांनी ‘कर्मा’ व शेखर कपूर यांनी ‘मि. इंडिया’मध्ये दहशतवादाला चित्रित केले. ९०च्या दशकात जशा घटना वाढत गेल्या तशा त्या विषयांवरील चित्रपटांचीदेखील निर्मिती होत गेली. दक्षिण भारताचे दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम् यांनी जेव्हा ‘रोजा’ बनविला तेव्हा या चित्रपटाने संपूर्ण देशात चांगला व्यवसाय केला. काश्मिरी दहशतवादावर आधारित या चित्रपटात प्रथमच काश्मिरी दहशतवाद्यांच्या तमाम घटनांना एकत्रित मांडण्याचा एक गंभीर प्रयत्न के ला गेला होता; आणि देशातल्या सामान्य जनतेने या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद दिला होता. गुलजार यांच्या ‘माचिस’ चित्रपटालाही खूप प्रशंसा मिळाली. गोविंद निहलानींचा ‘द्रोहकाल’ही याच क्रमातला चित्रपट. आशिष विद्यार्थीसारख्या नव्या चेहऱ्यांसोबत बनलेल्या या चित्रपटाने जनमानसात कुतूहल निर्माण केले होते. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी चांगली कमाई केली नाही, पण या चित्रपटाने काश्मिरी आंतकवादाचे दु:ख पुन्हा एकदा जगासमोर आणले. यानंतर काश्मिरी दहशतवादावर आधारित अनेक चित्रपट बनले ज्यात राजकुमार संतोषींचा पुकार (अनिल कपूर-माधुरी दीक्षित) आणि विधू विनोद चोपडाचा ‘मिशन काश्मीर’ यांची नावे प्रामुख्याने घेता येतील.
- anuj.alankar@lokmat.com