बॉक्स आॅफिसवर यंदा यांची झाली ‘चलती’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 22:12 IST2016-12-27T20:15:17+5:302016-12-27T22:12:39+5:30
२०१६ हे वर्ष सरत आले आहे. अवघे काही दिवस शिल्लक असताना पाठीमागे वळून पाहताना यावर्षीच्या बॉलिवूड सिनेमाचा पट आपल्या ...
.jpg)
बॉक्स आॅफिसवर यंदा यांची झाली ‘चलती’
पिंक : २०१६ या वर्षातील सर्वांत चांगला चित्रपट म्हणता येईल. ‘पिंक’ या चित्रपटातून समाजात गौण समजल्या जाणाºया विषयावर भाष्य करण्यात आले आहे. हा विषय होता महिलांचा ‘नकार’!. पुरुषप्रधान समाजात महिलांना दिली जाणारी वागणूक, त्यांच्या मनाविरुद्ध असलेल्या अपेक्षा व त्याची पूर्ती न झाल्यास केले जाणारे अत्याचार हे या चित्रपटातून दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी उत्कृष्टपणे मांडले. अमिताभ बच्चन, तापसी पन्नू, कीर्ती कुल्हारी यांनी आपल्या अभिनयाने चित्रपटाला समृद्ध केले आहे.
नीरजा : एअर होस्टेस्ट नीरजा भानोत हिच्या जीवनावर आधारित ‘नीरजा’ हा चित्रपट या वर्षातील उत्कृ ष्ट ठरतो. ‘नीरजा’चे कथानक भावनांच्या विश्वात घेऊन जाणारे आहे. या चित्रपटातून एका महिलेच्या हिमतीचे उदहारण पहायला मिळते. ‘नीरजा’मध्ये लोकेशन्स नाहीत, चित्रपटात मसाला नाही. मात्र उत्तम क थानक तुम्हाला खिळवून ठेवते. चित्रपटातील काही दृष्ये फ्लॅशबॅकमधील आहेत. मात्र, ते कथानकाचा भाग वाटावे असे सादरीकरण करण्यात दिग्दर्शक राम माधवानी यशस्वी झाले आहेत. सोनम कपूरने आपल्या अभिनयाने साकारलेली ‘नीरजा’ अद्वितीय आहे.
फोबिया : या वर्षातील सर्वोत्कृष्ट सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणून ‘फोबिया’चा उल्लेख करावा लागेल. चित्रपटातील अनेक गोष्टी नव्या आहेत, सिनेमॅटोग्रॉफी, पटकथा यामुळे ‘फोबिया’ आणखीच स्पर्श करणारा ठरतो. या चित्रपटामधून समाजात रुढ असलेल्या अनेक परंपरांवर प्रहार केले आहेत. या चित्रपटात अशा अनेक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यांना आपण वर्तमानपत्रात वाचून सोडून देतो. बलात्काराचे भय किती असू शकते याचे चित्रण पवन कृपलानी यांच्या दिग्दर्शनात अभिनेत्री राधिका आपटे हिने सादर केले.
एअरलिफ्ट : हे वर्ष सर्वार्थाने अक्षय कुमारचे असल्याचे मान्यच करावे लागेल. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन याची प्रशंसा करायला हवी. एअरलिफ्टचे कथानक असलेल्या विषयावर डॉक्युमेंट्री तयार करणे सोपे आहे. मात्र, एक कर्मशिअली सक्सेसफुल चित्रपटाची गुंफण करणे सर्वांना साध्य होणारे नाही. कथानकासोबत न्याय करणाºया अभिनेत्यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. काही ठिकाणी विरोधाभास असला तरी देखील सकारात्मक गोष्टींचा उहापोह करण्यात दिग्दर्शकाने कुठेच कसर सोडली नाही.
हॅप्पी भाग जायेंगी : भारत-पाकिस्तान या दोन देशात केवळ राजकारण, दहशतवाद किंवा देशभक्त ी याच विषयावर चित्रपट तयार केले जाऊ शकतात असा जर तुमचा समज असेल तर ‘हॅप्पी भाग जायेंगी’ हा चित्रपट या सर्व विषयांवर वरचढ ठरणारा आहे. हॅप्पीची कथा हसविणारी आहे. हा चित्रपट मास्टरपीस नाही पण तो फुल्ल एंटरटेनर आहे. डायना पेंटी, अली फजल, अभय देओल व जिमी शेरगिल व पियुष मिश्रा यांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांनी चित्रपटाला व्यवस्थित गुंफले आहे. संगीत व डायलॉग्स हे या चित्रपटाला सुंदरता प्रदान करणारे आहेत.
रुस्तम : एका नेव्हल आॅफिसरवर पत्नीच्या हत्येचा आरोप, त्यात सरकारी दखल व कोर्ट ड्रामा म्हणजे रुस्तम. मुंबईतील नानावटी केससारखी पार्श्वभूमी असलेला रुस्तम हा चित्रपटाला त्याची कथा व पटकथा उत्कृष्ट नमुना म्हणून सादर करतो. चित्रपटाच्या शेवटपर्यंत प्रेक्षकांना जागेवरून हलू न देणारी कथा विपुल रावली यांनी लिहली आहे. चित्रपटात अक्षय कुमारने साकारलेली प्रेमात दगा मिळालेल्या पतीची भूमिका उत्कृष्ट पद्धतीने रंगविली आहे. बहुतेक सर्व कलाकारांचा अभिनय चांगला आहे, मात्र पवन मल्होत्रा व कुमुद मिश्रा यांनी चित्रपटाला नवी उंची प्रदान के ली आहे.
दंगल : आमिर खानचा हा चित्रपट म्हणजे त्याच्या मिस्टर परफेक्शनिस्ट या बिरुदाला शोभणारा आहे. ‘दंगल’ या चित्रपटासाठी त्याने स्वत:वर घेतलेली मेहनत लक्षात येते. या चित्रपटाला तयार व्हायला दोन वर्षे लागली. दरम्यान याच अशाच कथानकाचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र दंगलची कथा व सादरीकरण या आधीच्या सर्व चित्रपटांपेक्षा श्रेष्ठ आहे हे वेगळे सांगायला नको. आमिर खान सोबतच चार नव्या अभिनेत्रींनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.
हे चित्रपटही होते चांगले
फॅन
साला खडूस
उडता पंजाब
धनक
मोहेंजोदारो
वझीर
चॉक अँड डस्टर
कपूर अॅण्ड सन्स
पार्च्श्ड
की अॅण्ड का