का होतोय रणबीरला ‘सिंगल’ स्टेट्सचा त्रास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 14:21 IST2016-11-22T12:48:03+5:302016-11-22T14:21:01+5:30

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचं नातं काही ‘बी टाऊन’ पासून लपून राहिलेलं नाहीये. अनेक वर्षांपासून यांची रिलेशनशिप चाहत्यांच्या ...

Why Ranbir is suffering from 'Single' States? | का होतोय रणबीरला ‘सिंगल’ स्टेट्सचा त्रास?

का होतोय रणबीरला ‘सिंगल’ स्टेट्सचा त्रास?

बीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचं नातं काही ‘बी टाऊन’ पासून लपून राहिलेलं नाहीये. अनेक वर्षांपासून यांची रिलेशनशिप चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. मध्यंतरी त्यांच्या ‘ब्रेकअप’नंतर चर्चा थंडावली. पण, आता रणबीरला कॅटरिनासाठी ‘सिंगल’ राहण्याचा कंटाळा आलाय म्हणे. विश्वास बसत नसला तरी हे अगदी खरंय.. नुकतेच त्याने हे करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या सेलिब्रिटी टॉक शोमध्ये बोलताना चाहत्यांसमोर सांगितले. 

करण जोहरचा टीव्ही शो ‘कॉफी विथ करण’ चे नवे सीजन सध्या प्रचंड चर्चेत आहे. टीव्ही शोमध्ये येणारे सेलिब्रिटी हे खुप मनसोक्त गप्पा मारताना दिसत आहेत. रणबीरही यात बिल्कुल मागे नाहीये. ‘डिअर जिंदगी’ च्या प्रमोशनसाठी नुकतेच शाहरूख खान आणि आलिया भट्ट हे शोवर आले होते. तसेच टिवंकल खन्ना आणि अक्षयकुमार, वरूण धवन- अर्जुन कपूर यांसारख्या जोड्याही आलेल्या दिसून आल्या. त्यानंतर रणबीर कपूरने टीव्ही शोवर एन्ट्री केली आणि कॅटरिना कैफसोबतचं त्याचं नातं, सिंगल स्टेटसचा त्याला होणारा त्रास सर्वकाही चाहत्यांसोबत शेअर केले. यावेळी बोलताना तो म्हणाला,‘सिंगल असणं खरंच खुप बोअरिंग काम आहे. ‘स्पेस’ नावाची काही गोष्टच नाहीये. तुम्हाला जर नात्यांमध्ये स्पेस हवी असेल तर तुम्हाला ‘नासा’ मध्ये जावे लागेल.’ 

रणबीर कपूर हा  कॅटरिना कैफसोबतच दीपिका पादुकोणसोबतही रिलेशनशिपमध्ये होता. मात्र,‘जग्गा जासूस’ मुळे ते पुन्हा एकत्र आले आणि त्यांच्यात जुने प्रेमसंबंध पुन्हा बहरले. पण, टीव्ही शोवर केलेल्या या वक्तव्यामुळे  तो पुन्हा एकदा नात्यांच्या गुंत्यात अडकलेला दिसतोय. पाहूयात, रणबीर अजून किती दिवस कॅटच्या विरहात त्याचा स्टेटस ‘सिंगल’ ठेवतोय ते!!!

Web Title: Why Ranbir is suffering from 'Single' States?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.