Vivek Oberoi : "सगळं संपलंय पण आजही...", ऐश्वर्याबाबतच्या प्रश्नावर विवेक ओबेरॉयनं केलं मन मोकळं!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:27 PM2022-12-15T12:27:18+5:302022-12-15T12:28:17+5:30

Vivek Oberoi, Aishwarya Rai : एकेकाळी विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या राय दोघंही प्रेमात होते. या दोघांचं अफेअर जितकं गाजलं, त्याहीपेक्षा जास्त त्यांचं ब्रेकअप गाजलं.

vivek oberoi refuses to talk about ex-girlfriend aishwarya rai affair | Vivek Oberoi : "सगळं संपलंय पण आजही...", ऐश्वर्याबाबतच्या प्रश्नावर विवेक ओबेरॉयनं केलं मन मोकळं!

Vivek Oberoi : "सगळं संपलंय पण आजही...", ऐश्वर्याबाबतच्या प्रश्नावर विवेक ओबेरॉयनं केलं मन मोकळं!

एकेकाळी विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) व ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) दोघंही प्रेमात होते. दोघांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली. पण या दोघांचं अफेअर जितकं गाजलं, त्याहीपेक्षा जास्त त्यांचं ब्रेकअप गाजलं. होय, विवेकच्या आयुष्यातला तो टप्पा बराच कठीण होता. ऐश्वर्यासोबतच्या लव्हलाईफमुळे विवेकच्या करिअरवरही परिणाम झाला. कदाचित त्याचमुळे विवेकला त्या आठवणी आता नको आहेत.  ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत विवेक त्याच्या पर्सनल लाईफबद्दल  बोलला.

करिअरच्या सुरूवातीला ऐश्वर्यासोबतचं नातं पब्लिक केलं नसतं तर? करिअरच्या सुरूवातीला लव्ह लाईफ उघडं करणं चुकीचं ठरलं का? असा प्रश्न विवेकला या मुलाखतीत विचारला गेला. यावर बोलणं विवेकने टाळलं. कारण विवेकच्या आयुष्याचा तो चॅप्टर आता बंद झाला आहे.  तो सर्व भूतकाळ आहे, सगळं संपलं आहे, असं तो म्हणाला.

 

‘मी या प्रश्नाचं उत्तर देणार नाही, कारण ते सर्व संपलंय आणि धुळीत मिळालंय. पण जे प्रतिभावान तरुण ही मुलाखत पाहत असतील, त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आयुष्यात तुमच्या कामावर लक्ष द्या. कोणत्याही मुद्द्यावरून तुमच्यावर हल्ला करण्याची संधी कोणालाही देऊ नका. करिअरप्रती तुमची जी कमिटमेंट आहे, त्यावरच लक्ष केंद्रीत करा,’असं तो म्हणाला.

ऐश्वर्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर लग्न होईपर्यंत तू कधीच तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल का व्यक्त झाला नाहीस? असा आणखी एक प्रश्न त्याला विचारला गेला. यावर तो म्हणाला, ‘ जर लोकांनी तुमच्या खासगी आयुष्याबद्दल बोलू नये असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही त्याबद्दल संवेदनशील असाल तर तुम्ही स्वत: तुमचं खासगी आयुष्य इतरांसमोर उघड करू नये, असं माझं मत आहे.’

विवेक आणि ऐश्वर्या यांचं 2003 मध्ये ब्रेकअप झालं होतं. ऐश्वर्याचा एक्स-बॉयफ्रेंड अर्थात सलमान खान याने धमकावल्याचाखुलासा त्याने नंतर केला होता. इतकंच नव्हे तर सलमानने माझं करिअर उद्ध्वस्त केलं, असाही आरोप विवेकने केला होता. ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवर सलमानचे ऐश्वर्यासोबत अफेयर सुरु होतं. जवळपास दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. त्यावेळी ऐश्वर्याने सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यांनतर ऐश आणि विवेक यांच्यातील जवळीक वाढली. पण सलमानला ते सहन झालं नाही. याचमुळे त्याने विवेकला फोन करून शिवीगाळ केली होती. 

2010 मध्ये विवेकने प्रियांका अलवा हिच्याशी लग्न केलं. कर्नाटकचे मंत्री जीवाराज अलवा यांची ती कन्या आहे. या दोघांना दोन मुलं आहेत.  

Web Title: vivek oberoi refuses to talk about ex-girlfriend aishwarya rai affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.