‘पद्मावत’ वादाला हिंसक वळण, अहमदाबादेत जाळपोळ : राजपूत संघटनांची वटहुकुम आणण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 11:06 IST2018-01-24T05:36:50+5:302018-01-24T11:06:50+5:30
‘पद्मावत’ रिलीज होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना या चित्रपटाच्या विरोधातील वातावरण तापू लागले आहे. काल मंगळवारी ‘पद्मावत’ला विरोध ...

‘पद्मावत’ वादाला हिंसक वळण, अहमदाबादेत जाळपोळ : राजपूत संघटनांची वटहुकुम आणण्याची मागणी
‘ द्मावत’ रिलीज होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना या चित्रपटाच्या विरोधातील वातावरण तापू लागले आहे. काल मंगळवारी ‘पद्मावत’ला विरोध करणाºया करणी सेनेच्या समर्थकांनी अहमादाबादेतील अल्फा आणि हिमालया मॉलमध्ये तोडफोड करत,जाळपोळ केली. हिमालया मॉलबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचीही नासधूस करण्यात आली. आता राजपूत संघटनांनी एक वेगळीच मागणी पुढे केली आहे. केंद्र सरकारने वटहुकूम काढून ‘पद्मावत’चे प्रदर्शन थांबवावे, असे राजपूत संघटनांनी म्हटले आहे.
आता हा मुद्दा केवळ चित्रपटापुरता मर्यादीत राहिलेला नसून संपूर्ण हिंदूंचा मुद्दा बनला असल्याचा दावा करत, सर्व समाज संघर्ष समितीने यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. हिंदू धर्माची सभ्यता आणि राणी पद्मावतीची मान कायम राखण्यासाठी केंद्राने वटहुकूम काढत ‘पद्मावत’चे रिलीज रोखण्याची मागणी या पत्रात केली आहे. २४ तासांत वटहुकुम न आल्यास स्थिती आणखी चिघळण्याचा इशाराही या पत्रात दिल्या गेला आहे. राज्य सरकारला आता सुप्रीम कोर्टात जाण्याची गरज नाही. आम्ही कधीही कुठल्याही क्षणी ‘पद्मावत’चे प्रदर्शन थांबवू शकतो, अशी धमकीही या पत्रात दिली गेली आहे.
हिंसक वळण
![]()
गुजरातच्या अहमदाबादेत ‘पद्मावत’ला विरोध करणाºयांनी दोन मॉलमध्ये तोडफोड व ४०वाहनांना आगी लावल्या. प्राप्त माहितीनुसार, स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला. गुजरात मल्टिप्लेक्स असोसिएशनने आधीच ‘पद्मावत’ रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. याऊपर येथे हिंसाचार सुुरू आहे. मध्यप्रदेशात राजपूत समाजाने संजय लीला भन्साळींचा पुतळा जाळत या चित्रपटाला विरोध नोंदवलर. कानपूर व गुडगाव येथेही या चित्रपटाविरोधात निदर्शने करण्यात आलीत.
शूटींगच्या पहिल्या दिवसापासून भन्साळींचा ‘पद्मावत’ वादात सापडला आहे. अनेक वादानंतर काही दुरूस्त्यांसह सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या रिलीजला परवानगी दिली. पण यानंतरही करणी सेनेने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी लावून धरलीय. करणी सेनेचा विरोध बघता राजस्थान सरकारने हा चित्रपट त्यांच्या राज्यात रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विरोध फक्त राजस्थान पुरता मर्यादित नाही आहे. तर देशातल्या अन्य राज्यांमध्ये समान स्थिती आहे.
आता हा मुद्दा केवळ चित्रपटापुरता मर्यादीत राहिलेला नसून संपूर्ण हिंदूंचा मुद्दा बनला असल्याचा दावा करत, सर्व समाज संघर्ष समितीने यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. हिंदू धर्माची सभ्यता आणि राणी पद्मावतीची मान कायम राखण्यासाठी केंद्राने वटहुकूम काढत ‘पद्मावत’चे रिलीज रोखण्याची मागणी या पत्रात केली आहे. २४ तासांत वटहुकुम न आल्यास स्थिती आणखी चिघळण्याचा इशाराही या पत्रात दिल्या गेला आहे. राज्य सरकारला आता सुप्रीम कोर्टात जाण्याची गरज नाही. आम्ही कधीही कुठल्याही क्षणी ‘पद्मावत’चे प्रदर्शन थांबवू शकतो, अशी धमकीही या पत्रात दिली गेली आहे.
हिंसक वळण
गुजरातच्या अहमदाबादेत ‘पद्मावत’ला विरोध करणाºयांनी दोन मॉलमध्ये तोडफोड व ४०वाहनांना आगी लावल्या. प्राप्त माहितीनुसार, स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला. गुजरात मल्टिप्लेक्स असोसिएशनने आधीच ‘पद्मावत’ रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. याऊपर येथे हिंसाचार सुुरू आहे. मध्यप्रदेशात राजपूत समाजाने संजय लीला भन्साळींचा पुतळा जाळत या चित्रपटाला विरोध नोंदवलर. कानपूर व गुडगाव येथेही या चित्रपटाविरोधात निदर्शने करण्यात आलीत.
शूटींगच्या पहिल्या दिवसापासून भन्साळींचा ‘पद्मावत’ वादात सापडला आहे. अनेक वादानंतर काही दुरूस्त्यांसह सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या रिलीजला परवानगी दिली. पण यानंतरही करणी सेनेने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी लावून धरलीय. करणी सेनेचा विरोध बघता राजस्थान सरकारने हा चित्रपट त्यांच्या राज्यात रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विरोध फक्त राजस्थान पुरता मर्यादित नाही आहे. तर देशातल्या अन्य राज्यांमध्ये समान स्थिती आहे.