विद्या बालनला 'या' गोष्टी करण्यात वाटतो खरा आनंद?जाणून घ्या कोणती गोष्टी आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 12:56 IST2016-11-22T12:55:47+5:302016-11-22T12:56:22+5:30

साडेचार वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या कहानी या सिनेमाने रसिकांवर जादू केली. या सिनेमातील विद्या बागची आणि त्यातील अन्य व्यक्तीरेखासुद्धा ...

Vidya Balan seems to be doing 'these' things in real happiness? Know what is she? | विद्या बालनला 'या' गोष्टी करण्यात वाटतो खरा आनंद?जाणून घ्या कोणती गोष्टी आहे ती?

विद्या बालनला 'या' गोष्टी करण्यात वाटतो खरा आनंद?जाणून घ्या कोणती गोष्टी आहे ती?

ong>साडेचार वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या कहानी या सिनेमाने रसिकांवर जादू केली. या सिनेमातील विद्या बागची आणि त्यातील अन्य व्यक्तीरेखासुद्धा आजही रसिकांच्या मनात घर करुन आहेत. त्यावेळी अभिनेत्री विद्या बालन आणि सुजॉय घोष या अभिनेत्री-दिग्दर्शकाच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. याचनिमित्ताने अभिनेत्री विद्या बालनशी साधलेला हा दिलखुलास संवाद. 
 

 
'कहानी' सिनेमातील विद्या बागची ते 'कहानी-2' सिनेमातील दुर्गारानी सिंह या दोन वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. विद्या बागची ते दुर्गारानी काय काय बदल जाणवले ?

 
नक्कीच विद्या बागची आणि दुर्गारानी सिंह या दोघीही वेगळ्या आहेत. दोघी वेगळ्या दिसतात, दोघींचं व्यक्तीमत्त्व वेगळे आहे.दोघींचं जग वेगळे आहे. दोघींच्या जीवनात जे काही घडते ते सगळे काही वेगळे आहे. कहानीच्या रिलीजला साडेचार वर्ष झाली आहे. या काळात बरेच काही बदलले आहे. या दरम्यान माझे लग्न झाले, माझे रिलीज झालेले चारही सिनेमा आपटले. मात्र ज्यारितीने रसिकांचा कहानी-2 सिनेमाच्या ट्रेलरला प्रतिसाद मिळतोय. तो पाहून असे वाटत आहे की कहानी सिनेमा त्यांनी कालच पाहिला आहे. अजूनही कहानीची कथा रसिकांच्या मनात डोक्यात फिट्ट आहे. त्यांना प्रत्येक सीन माहित आहे. कहानी सिनेमाला रसिकांचे जे प्रेम मिळाले तेच प्रेम आजही कहानी-2 या सिनेमालाही मिळत आहे असे वाटत आहे. त्यामुळे वाटते की साडेचार वर्षात बरेच काही बदलले आहे तरीही वाटते की एवढा काळ मध्ये गेलाच नाही.

 

या सिनेमात सुजॉयने असा कोणता आव्हानात्मक सीन दिला होता का ?
 
कहानी-2 सिनेमात एक सीन होता तो वाचताना पाहूनच मी सुजॉयला म्हटले की अरे हे काय लिहलं आहेस. माझ्याकडून तू काय काय करुन घेशील. या सीनमध्ये मला एका मुलीचा कान चावायचा होता. ही मुलगी ट्रेलरमध्येसुद्धा आहे. सिनेमातील सगळे स्टंट आणि एक्शन मी केले खरे... मात्र मला त्या सीनपेक्षा त्या मुलीची जास्त काळजी वाटत होती. मात्र खरंच तो सीन खूप खूप आव्हानात्मक असाच होता.
 

 
गेल्या दिवसांमध्ये तुला थिएटरशी संबधित ठिकाणी हजेरी लावताना कॅमे-यांनी टिपले आहे. त्यामुळे येत्या काळात थिएटर करण्याचा काही विचार?

 
काही दिवसांपूर्वी पृथ्वी फेस्टिव्हला जाण्याचा योग आला. ब-याच वर्षांपासून या फेस्टिव्हलला यावं असे वाटत होते. मात्र शक्य होत नव्हते. माझ्या करियरमध्ये कुठे ना कुठे पृथ्वी थिएटरचंही योगदान आहे. कारण त्यावेळी रामनाथ सर पृथ्वीमध्ये बालनाट्य कार्यशाळा चालवायचे. मी 15 वर्षांची असताना मी या कार्यशाळेत गेले होते. कार्यशाळा संपल्यानंतर छोटं नाटकही सादर केले होते. त्यानंतर माझा आणि थिएटरचा काही संबंध आला नाही. दरम्यानच्या काळात पृथ्वीमध्ये जाऊन नाटक पाहायची. मात्र यावेळी सिनेमाचं शुटिंग नव्हतं. मुंबईतच होते. त्यामुळे पृथ्वी फेस्टिवलला जाता आलं. ब-याच वर्षानंतर नसिरसाहेब, रत्ना पाठक यांना थिएटरवर काम करताना पाहाण्याची संधी मिळाली. 'चलती का नाम गाडी' हे नाटकही पाहण्याची संधी मिळाली. सलाम ब़ॉम्बे या सामाजिक संस्थेने गरीब आणि गरजू 40 मुलांना एकत्र करुन हे नाटक बसवले होते. ही संस्था या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलते. या नाटकात या मुलांचा जोश, उत्साह आणि सारं काही सलाम करावा असंच होतं.  
 
आगामी काळात काही बायोपिक सिनेमातही काम करतेय. त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल ?
 

येत्या काळात मी मल्याळी सिनेमात काम करत आहे. हा एक बायोपिक सिनेमा आहे. प्रसिद्ध मल्याळी साहित्यिका कमलादास यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. कमलादास यांचं व्यक्तीमत्त्व वादग्रस्त होते असे सांगितले जाते. त्यांचे लिखाण, त्यांची लिहण्याची स्टाईल, त्या ज्यारितीने आपले जीवन जगल्या त्या सगळ्या गोष्टींची आजही चर्चा होते. त्यामुळेच हा मल्याळी सिनेमा बनत आहे. कमलादास यांना जाणून घेण्याची मलाही प्रचंड उत्कंठा आहे. म्हणूनच मी या सिनेमात काम करत आहे.अलबेला सिनेमानंतर मराठीत एखादी चांगली स्क्रीप्ट आल्यास पुन्हा मराठीत काम करायलाही आवडेल.
 
जॉय ऑफ गिविंग म्हटले जाते.तुझा यावर किती विश्वास आहे ? तुझ्याबाबतीत असा काही किस्सा घडला आहे का ?
 
आपल्याकडे काही जास्त असेल तर ते ज्यांच्याकडे काही नाही त्यांना ते वाटले पाहिजे. त्यांना आपल्याकडील गोष्टी दिल्यानंतर त्यांच्या चेह-यावरील आनंद आणि समाधान विशेष असते. एकदा मी हातगाडी हाकणा-या वृद्ध व्यक्तीला पाहिले. हातगाडी चालवताना त्यांना खूप त्रास होत होता हे त्यांच्याकडे पाहून जाणवत होते. त्यांच्याकडे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी त्यांना थांबवले. त्यांना चहा, बिस्कीट आणि ब्रेड खायला दिले. ते खाऊन त्यांच्यात थोडी ताकद आली. त्यांच्यासाठी काही तरी करु शकलो याचा मला आनंद त्यावेळी झाला. ब-याचदा आपण आपल्या जगात धुंद आणि व्यस्त असतो. मात्र जेव्हा दुस-या विषयी विचार करतो आणि आपल्याकडील गोष्टी त्यांना देतो त्याचे समाधान काही वेगळेच असते.

Suvarna.jain@lokmat.com

Web Title: Vidya Balan seems to be doing 'these' things in real happiness? Know what is she?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.