अस्वस्थ करणाऱ्या घटना स्वस्थ बसू देत नाहीत : ईशा गुप्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 17:23 IST2017-02-12T11:21:58+5:302017-02-12T17:23:48+5:30
संस्कृतीने नटलेल्या अन् इतिहास संपन्न भारतात जेव्हा एखाद्या स्त्रीची अब्रू दिवसाढवळ्या लूटली जातेय तेव्हा मन सून्न होते. त्याहीपलीकडे जेव्हा या अस्वस्थ करणाºया घटनेचे काही मंडळी समर्थन करतात, तेव्हा मात्र मन स्वस्थ बसू देत नाही.

अस्वस्थ करणाऱ्या घटना स्वस्थ बसू देत नाहीत : ईशा गुप्ता
सतीश डोंगरे
संस्कृतीने नटलेल्या अन् इतिहास संपन्न भारतात जेव्हा एखाद्या स्त्रीची अब्रू दिवसाढवळ्या लूटली जातेय तेव्हा मन सून्न होते. त्याहीपलीकडे जेव्हा या अस्वस्थ करणाºया घटनेचे काही मंडळी समर्थन करतात, तेव्हा मात्र मन स्वस्थ बसू देत नाही. आपण एक सेलिब्रेटी आहोत; आपला आवाज ऐकला जाऊ शकतो अशी भावना मनात निर्माण होतेय अन् त्यावर आपसूकच प्रतिक्रिया उमटते. अशी भावना अभिनेत्री ईशा गुप्ता हिने व्यक्त केली. देशात घडणाºया अन्याय-अत्याचाराच्या घटनांविरोधात नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज बुलंद करणाºया ईशाबरोबर तिच्या आगामी ‘कमांडो-२’ या सिनेमाविषयी संवाद साधला असता, तिने मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रश्न : अन्याय-अत्याचाराच्या घटनांविरोधात तू नेहमीच तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करीत असते. यामुळे तुला काही मंडळींशी थेट दुश्मनीही घ्यावी लागली आहे, काय सांगशील?
- जेव्हा एखाद्या व्यक्तीला सेलिब्रेटीचा दर्जा प्राप्त होतो, तेव्हा त्या व्यक्तीने केलेल्या प्रत्येक विधानाचा प्रभाव जनमानसावर होत असतो. मला असे वाटतेय की, असा मान जगात मोजक्याच लोकांना प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याभोवती चौकटी निर्माण न करता व्यापक दृष्टिकोनातून अन्याय-अत्याचारांच्या घटनांविरोधात आवाज उठवायला हवा. बºयाचदा इंडस्ट्रीमधील मंडळी अशा घटनांवर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करतात. परंतु मला असे वाटतेय की, सेलिब्रेटींनी यावर बोलायला हवे. कारण त्यांचा आवाज ऐकला जाऊ शकतो. माझ्याबाबतीत बोलायचे झाल्यास मला अशा घटना अजिबात स्वस्थ बसू देत नाहीत. कदाचित हा माझ्या कुटुंबाचा माझ्यावर परिणाम असू शकतो. माझे वडील एयरफोर्समध्ये होते. माझे आजोबाही प्रिन्सिपल होते. त्यांचा माझ्यावर नेहमीच प्रभाव राहिला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना मी अशा घटनांचा नेहमीच तीव्र शब्दात निषेध करीत असते. जर मी चुकीच्या गोष्टींविरोधात आवाजच उठविला नाही तर माझ्या अभिनेत्री होण्यास काहीच अर्थ उरणार नाही, असे मला वाटतेय.
प्रश्न : तुला बॉलिवूडची अॅँजेलिना जोली असे म्हटले जाते, परंतु अद्यापही प्रेक्षकांना तुझा अॅँजेलिना जोली अवतार बघावयास मिळालेला नाही, आगामी काळात प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होऊ शकेल?
- आतापर्यंत माझ्या वाट्याला रोमॅण्टिक भूमिका आलेल्या आहेत. परंतु मला नेहमीच अॅक्शनपटांविषयीचे आकर्षण राहिले आहे. त्यामुळे मीही अशाच एखाद्या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या मी ‘बादशाहो’ची शूटिंग करीत आहे. या सिनेमातील माझ्या भूमिकेविषयी मला फारसे सांगता येणार नसले तरी एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटेल, ती म्हणजे या सिनेमात मी अॅक्शन करताना प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. परंतु मी अजूनही अॅँजेलिना जोली स्टाइल त्या एका सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे, ज्यात मला फुलआॅन अॅक्शन करता येईल.
प्रश्न : अक्षय कुमारबरोबर तुला रोमॅण्टिक सिनेमा करायची इच्छा असल्याचे तू बोलली होतीस, तुझी ही इच्छा आगामी काळात पूर्ण होऊ शकेल का?
- मला नेहमीच चांगल्या, रफ अॅण्ड टफ आणि फुल आॅन अॅक्शन भूमिका करण्याची इच्छा आहे. परंतु जेव्हा सलमान आणि अक्षयकुमार यांच्याबाबत विचार करतेय तेव्हा मला त्यांच्यासोबत केवळ रोमॅण्टिक भूमिका करण्याची इच्छा होते. मला असे वाटतेय की त्यांनी माझ्यासाठी एखादं गाणं गावं. त्यांच्यासोबत डान्स करावा. माझी ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी नेहमीच देवाकडे प्रार्थना करत असते.
प्रश्न : ‘बादशाहो’मध्ये तू अजय देवगणबरोबर दिसणार आहेस. अजयसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
- अजय देवगणचा स्वभाव अॅग्रेसिव्ह असल्याचे मी ऐकूण होते. परंतु मला याची अद्यापपर्यंत जाणीव झालेली नाही. खरं तर त्यांचा बघण्याचा अंदाज तसा आहे. मात्र एक व्यक्ती म्हणून त्याच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. आम्ही जेव्हा सेटवर असतो तेव्हा भरपूर धमाल करतो. या सिनेमात इमरान हाशमीची महत्त्वाची भूमिका असून, त्याच्याबरोबर माझा हा तिसरा सिनेमा आहे. थोडक्यात अजय, इमरान यांच्याबरोबर काम करण्याच्या या संधीकडे मी लाइफटाइम अॅचिव्हमेंट या दृष्टिकोनातून बघते.
प्रश्न : ‘रुस्तम’ सिनेमात तू निगेटीव्ह भूमिकेत होतीस, अशा भूमिकांकडे तू कशी बघतेस?
- ‘रुस्तम’ हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला. कारण सिनेमातील सर्वच पात्र दमदार होते. मी या सिनेमात निगेटीव्ह भूमिकेत जरी झळकली असली तरी, सिनेमातील माझी प्रीती मखिजाची भूमिका अधोरेखित करणारी आहे. त्यामुळे भविष्यात मला पुन्हा अशाप्रकारची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यास त्यास माझा होकार असेल. आतापर्यंतच्या करिअरमध्ये प्रत्येक भूमिकेचे महत्त्व ओळखून ती साकारली आहे. खरं तर निगेटीव्ह भूमिका साकारणे हे खºया अर्थाने आव्हान असते, असे मला वाटते.
प्रश्न : ‘कमांडो-२’ लवकरच रिलिज होणार आहे, या सिनेमाविषयी काय सांगशील?
- पहिल्या ‘कमांडो’ या सिनेमाच्या तुलनेत ‘कमांडो-२’ ची कथा खूपच दमदार आणि वेगळ्या धाटणीची आहे. रोमांस, अॅक्शनने भरपूर असलेल्या या सिनेमातील गाणीही सुपरहिट ठरत आहेत. विद्युत जामवाल याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच अविस्मरणीय आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे मी अद्यापपर्यंत हा सिनेमा बघू शकले नाही, परंतु विद्युत माझ्यासोबत नेहमीच फोनवर सिनेमाविषयी बोलत असतो. त्यामुळे प्रेक्षकांना हा सिनेमा आवडणार, यात काहीही शंका नाही.
संस्कृतीने नटलेल्या अन् इतिहास संपन्न भारतात जेव्हा एखाद्या स्त्रीची अब्रू दिवसाढवळ्या लूटली जातेय तेव्हा मन सून्न होते. त्याहीपलीकडे जेव्हा या अस्वस्थ करणाºया घटनेचे काही मंडळी समर्थन करतात, तेव्हा मात्र मन स्वस्थ बसू देत नाही. आपण एक सेलिब्रेटी आहोत; आपला आवाज ऐकला जाऊ शकतो अशी भावना मनात निर्माण होतेय अन् त्यावर आपसूकच प्रतिक्रिया उमटते. अशी भावना अभिनेत्री ईशा गुप्ता हिने व्यक्त केली. देशात घडणाºया अन्याय-अत्याचाराच्या घटनांविरोधात नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज बुलंद करणाºया ईशाबरोबर तिच्या आगामी ‘कमांडो-२’ या सिनेमाविषयी संवाद साधला असता, तिने मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रश्न : अन्याय-अत्याचाराच्या घटनांविरोधात तू नेहमीच तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करीत असते. यामुळे तुला काही मंडळींशी थेट दुश्मनीही घ्यावी लागली आहे, काय सांगशील?
- जेव्हा एखाद्या व्यक्तीला सेलिब्रेटीचा दर्जा प्राप्त होतो, तेव्हा त्या व्यक्तीने केलेल्या प्रत्येक विधानाचा प्रभाव जनमानसावर होत असतो. मला असे वाटतेय की, असा मान जगात मोजक्याच लोकांना प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याभोवती चौकटी निर्माण न करता व्यापक दृष्टिकोनातून अन्याय-अत्याचारांच्या घटनांविरोधात आवाज उठवायला हवा. बºयाचदा इंडस्ट्रीमधील मंडळी अशा घटनांवर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करतात. परंतु मला असे वाटतेय की, सेलिब्रेटींनी यावर बोलायला हवे. कारण त्यांचा आवाज ऐकला जाऊ शकतो. माझ्याबाबतीत बोलायचे झाल्यास मला अशा घटना अजिबात स्वस्थ बसू देत नाहीत. कदाचित हा माझ्या कुटुंबाचा माझ्यावर परिणाम असू शकतो. माझे वडील एयरफोर्समध्ये होते. माझे आजोबाही प्रिन्सिपल होते. त्यांचा माझ्यावर नेहमीच प्रभाव राहिला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना मी अशा घटनांचा नेहमीच तीव्र शब्दात निषेध करीत असते. जर मी चुकीच्या गोष्टींविरोधात आवाजच उठविला नाही तर माझ्या अभिनेत्री होण्यास काहीच अर्थ उरणार नाही, असे मला वाटतेय.
प्रश्न : तुला बॉलिवूडची अॅँजेलिना जोली असे म्हटले जाते, परंतु अद्यापही प्रेक्षकांना तुझा अॅँजेलिना जोली अवतार बघावयास मिळालेला नाही, आगामी काळात प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होऊ शकेल?
- आतापर्यंत माझ्या वाट्याला रोमॅण्टिक भूमिका आलेल्या आहेत. परंतु मला नेहमीच अॅक्शनपटांविषयीचे आकर्षण राहिले आहे. त्यामुळे मीही अशाच एखाद्या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या मी ‘बादशाहो’ची शूटिंग करीत आहे. या सिनेमातील माझ्या भूमिकेविषयी मला फारसे सांगता येणार नसले तरी एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटेल, ती म्हणजे या सिनेमात मी अॅक्शन करताना प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. परंतु मी अजूनही अॅँजेलिना जोली स्टाइल त्या एका सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे, ज्यात मला फुलआॅन अॅक्शन करता येईल.
प्रश्न : अक्षय कुमारबरोबर तुला रोमॅण्टिक सिनेमा करायची इच्छा असल्याचे तू बोलली होतीस, तुझी ही इच्छा आगामी काळात पूर्ण होऊ शकेल का?
- मला नेहमीच चांगल्या, रफ अॅण्ड टफ आणि फुल आॅन अॅक्शन भूमिका करण्याची इच्छा आहे. परंतु जेव्हा सलमान आणि अक्षयकुमार यांच्याबाबत विचार करतेय तेव्हा मला त्यांच्यासोबत केवळ रोमॅण्टिक भूमिका करण्याची इच्छा होते. मला असे वाटतेय की त्यांनी माझ्यासाठी एखादं गाणं गावं. त्यांच्यासोबत डान्स करावा. माझी ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी नेहमीच देवाकडे प्रार्थना करत असते.
प्रश्न : ‘बादशाहो’मध्ये तू अजय देवगणबरोबर दिसणार आहेस. अजयसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
- अजय देवगणचा स्वभाव अॅग्रेसिव्ह असल्याचे मी ऐकूण होते. परंतु मला याची अद्यापपर्यंत जाणीव झालेली नाही. खरं तर त्यांचा बघण्याचा अंदाज तसा आहे. मात्र एक व्यक्ती म्हणून त्याच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. आम्ही जेव्हा सेटवर असतो तेव्हा भरपूर धमाल करतो. या सिनेमात इमरान हाशमीची महत्त्वाची भूमिका असून, त्याच्याबरोबर माझा हा तिसरा सिनेमा आहे. थोडक्यात अजय, इमरान यांच्याबरोबर काम करण्याच्या या संधीकडे मी लाइफटाइम अॅचिव्हमेंट या दृष्टिकोनातून बघते.
प्रश्न : ‘रुस्तम’ सिनेमात तू निगेटीव्ह भूमिकेत होतीस, अशा भूमिकांकडे तू कशी बघतेस?
- ‘रुस्तम’ हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला. कारण सिनेमातील सर्वच पात्र दमदार होते. मी या सिनेमात निगेटीव्ह भूमिकेत जरी झळकली असली तरी, सिनेमातील माझी प्रीती मखिजाची भूमिका अधोरेखित करणारी आहे. त्यामुळे भविष्यात मला पुन्हा अशाप्रकारची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यास त्यास माझा होकार असेल. आतापर्यंतच्या करिअरमध्ये प्रत्येक भूमिकेचे महत्त्व ओळखून ती साकारली आहे. खरं तर निगेटीव्ह भूमिका साकारणे हे खºया अर्थाने आव्हान असते, असे मला वाटते.
प्रश्न : ‘कमांडो-२’ लवकरच रिलिज होणार आहे, या सिनेमाविषयी काय सांगशील?
- पहिल्या ‘कमांडो’ या सिनेमाच्या तुलनेत ‘कमांडो-२’ ची कथा खूपच दमदार आणि वेगळ्या धाटणीची आहे. रोमांस, अॅक्शनने भरपूर असलेल्या या सिनेमातील गाणीही सुपरहिट ठरत आहेत. विद्युत जामवाल याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच अविस्मरणीय आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे मी अद्यापपर्यंत हा सिनेमा बघू शकले नाही, परंतु विद्युत माझ्यासोबत नेहमीच फोनवर सिनेमाविषयी बोलत असतो. त्यामुळे प्रेक्षकांना हा सिनेमा आवडणार, यात काहीही शंका नाही.