'ते' सहा शब्द आणि अमिताभ-रेखा यांचं नातं कायमचं तुटलं! नेमकं काय म्हणाल्या होत्या जया बच्चन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 10:41 AM2024-04-10T10:41:40+5:302024-04-10T10:42:18+5:30

Jaya Bachchan, Amitabh Bachchan And Rekha : हा तो काळ होता जेव्हा अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांचे लग्न झाले होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांचे रेखा यांच्यासोबतचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आणि हिटही झाले. दरम्यान, त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनीही वेग घेतला.

'This' six words and Amitabh-Rekha's relationship broke forever! What exactly did Jaya Bachchan say? | 'ते' सहा शब्द आणि अमिताभ-रेखा यांचं नातं कायमचं तुटलं! नेमकं काय म्हणाल्या होत्या जया बच्चन

'ते' सहा शब्द आणि अमिताभ-रेखा यांचं नातं कायमचं तुटलं! नेमकं काय म्हणाल्या होत्या जया बच्चन

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त त्या मीडियासोबतच्या वागणुकीमुळे चर्चेत असतात तर कधी त्यांची रागीट शैली हेडलाईन बनते. व्हायरल व्हिडीओने तयार केलेल्या प्रतिमेच्या पलीकडे पाहिल्यास जया बच्चन एक मजबूत इच्छाशक्ती असलेल्या स्त्रीच्या रूपात दिसतील. ज्यांनी स्वतःच्या बळावर चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आणि जेव्हा त्यांच्या कुटुंबावर संकट आले तेव्हा त्या ढाल बनून त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. आपले घर वाचवण्यासाठी त्यांनी अमिताभ आणि रेखा (Rekha) यांचे नातेही याच हेतूने संपवले.

हा तो काळ होता जेव्हा अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांचे लग्न झाले होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांचे रेखा यांच्यासोबतचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आणि हिटही झाले. दरम्यान, त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनीही वेग घेतला. आणि हे दोघे कधीही एकत्र येऊ शकतात, अशी अटकळ जोर धरू लागली. या काळातील एक कथा अशीही सांगितली जाते की जया बच्चन यांनी रेखा यांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले होते.

पार्टी संपल्यानंतर जया बच्चन रेखा यांना म्हणाल्या...

रेखा या निमंत्रणाला नक्कीच गेल्या होत्या. पण जया बच्चन आपल्याबद्दल वाईट बोलतील या भीतीने. याउलट जया बच्चन यांनी त्यांची खूप काळजी घेतली. जेव्हा पार्टी संपली आणि रेखा निघून जात होत्या, तेव्हा जया बच्चन म्हणाल्या की त्या अमित यांना कधीही सोडणार नाहीत. जया बच्चन यांच्या या भक्कम हेतूसमोर रेखा आणि अमिताभ यांच्यातील संबंध कमकुवत होऊ लागले. 

अशाप्रकारे निभावली साथ
यानंतर जेव्हा-जेव्हा कुटुंबाला अडचणीचा सामना करावा लागला तेव्हा जया बच्चन यांनी ताकदीने साथ दिली. अमिताभ बच्चन अडचणीत होते तेव्हा जया बच्चन त्यांना प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत असल्याची जाणीव करून देत राहिले. यानंतर अमिताभ बच्चन यांनी ‘मोहब्बतें’ चित्रपटाने आपली दुसरी इनिंग सुरू केली आणि हळुहळु सगळं सुरळीत व्हायला लागलं.

Web Title: 'This' six words and Amitabh-Rekha's relationship broke forever! What exactly did Jaya Bachchan say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.