​शाहरुखच्या चित्रपटात रणबीरचा किमिओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 18:52 IST2016-11-30T18:50:41+5:302016-11-30T18:52:23+5:30

रणबीर कपूर व अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात शाहरुख खान याची एक ...

Ranbir Kapoos in Shahrukh's film! | ​शाहरुखच्या चित्रपटात रणबीरचा किमिओ!

​शाहरुखच्या चित्रपटात रणबीरचा किमिओ!

ong>रणबीर कपूर व अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात शाहरुख खान याची एक महत्त्वाची भूमिका होती. आता शाहरुख व अनुष्काच्या आगामी चित्रपटात रणबीर कपूर किमिओ करणार असल्याचे समजते. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूरची भूमिका असणार आहे. 

सलमान खान याने ट्विट करून इम्तियाज अली दिग्दर्शित शाहरुखच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली होती व नाव चाहत्यांनी ठरवावे असे सांगितले होते. सध्या या चित्रपटाला ‘द रिंग’ या नावाने ओळखले जाते. त्याने शेअर केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शाहरुख व अनुष्का शर्मा दिसत होते. आता या चित्रपटाबाबतची माहिती मिळत असून, या चित्रपटात रणबीर कपूरची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. यात तो अनुष्का शर्माच्या प्रियकराची भूमिका साकारणार असल्याचे कळतेय. मात्र याची अद्याप घोषणा शाहरुख खान व इम्तियाज अली किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांच्या वतीने अद्याप करण्यात आली नाही. 

Ranbeer kapoor cimio in shahrukh khan film

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये रणबीर सिंगची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटात शाहरुखने ऐश्वर्या राय हिच्या नवºयाची छोटीशी भूमिका केली होती. करण जोहरच्या आग्रहापोटी त्याने ही भूमिका करण्यास होकार दिला होता. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला आहे. आतापर्यंत ‘ऐ दिल है मुश्किल’ने ११५ कोटींची कमाई केली असल्याचे सांगण्यात येते. 

याच प्रमाणे यावेळी इम्तियाज अली दिग्दर्शित शाहरुखच्या चित्रपटात रणबीर कपूर भूमिका साकारणार आहे. रणबीर व इम्तियाज यांच्यात असलेल्या संबधामुळे त्याने ही भूमिका साकारणार असल्याचे कळते. रणबीरने इम्तियाज सोबत रॉकस्टार या चित्रपटात काम केले आहे. 

Web Title: Ranbir Kapoos in Shahrukh's film!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.