​सिनेमा फ्लॉप झाला की लोक फोनही उचलत नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 18:07 IST2016-07-28T12:25:38+5:302016-07-28T18:07:40+5:30

मी जरी याच फिल्म इंडस्ट्रीचा भाग असलो तरी येथे रुजलेल्या अवास्तव व्यावसायिकतेकडे मला दुर्लक्ष करता येणार नाही. येथे सगळेच ...

People did not even call the cinema flop! | ​सिनेमा फ्लॉप झाला की लोक फोनही उचलत नाहीत!

​सिनेमा फ्लॉप झाला की लोक फोनही उचलत नाहीत!

जरी याच फिल्म इंडस्ट्रीचा भाग असलो तरी येथे रुजलेल्या अवास्तव व्यावसायिकतेकडे मला दुर्लक्ष करता येणार नाही. येथे सगळेच उगवत्या सूयार्ला नमस्कार करणारे आहेत. तुम्ही किती मोठ्या स्टारचे अपत्य आहात याच्याशी कुणाला काही घेणे-देणे नाही. सिनेमे हिट होत आहेत तोपर्यंत तुम्ही हिरो आहात. एकदा का चित्रपट पडला तर लोकं तुमचा फोनही उचलत नाहीत, अशा प्रखर शब्दात अभिषेक बच्चन याने फिल्म इंडस्ट्रीचे वास्तव मांडले. या क्षेत्रात १६ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिषेक बोलत होता. २००० साली ‘रिफ्यूजी’द्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले होते. परंतु अमिताभ बच्चन यांच्या मुलाकडून प्रेक्षकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्यावर त्यावेळी काही तो खरा उतरू शकला नाही. यावरही अभिषेकने खुलासा केला. मी निराश करणारे अपयश आणि चकाकणारे यश दोन्ही जवळून पाहिले आहे. खरं तर तुम्हाला व्यक्ती म्हणून समृद्ध करायला यश आणि अपयश दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चित्रपटसृष्टीतील माझा आतापर्यंतचा प्रवास खूपच शानदार होता. टीका किंवा कौतुक या दोन्ही गोष्टींनी मी कधी हुरळून वा घाबरून गेलो नाही. मी या इंडस्ट्रीचा एक भाग बनू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दात अभिषेकने फिल्म इंडस्ट्रीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. 

Web Title: People did not even call the cinema flop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.