नायकांनीही गमावले अनेक हिट चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:29 IST2016-01-16T01:12:20+5:302016-02-08T05:29:22+5:30

कुठल्या नायिकांनी चित्रपटाला नकार दिला आणि पुढे तोच चित्रपट कसा सुपर हिट झाला यांची रंजक कथा काल आपण वाचली. ...

Nayaks also lost many hit movies | नायकांनीही गमावले अनेक हिट चित्रपट

नायकांनीही गमावले अनेक हिट चित्रपट

ठल्या नायिकांनी चित्रपटाला नकार दिला आणि पुढे तोच चित्रपट कसा सुपर हिट झाला यांची रंजक कथा काल आपण वाचली. परंतु असा प्रकार केवळ नायिकांसोबतच घडला असे नव्हे तर काही नायकांनीही ही घोडचूक केली आणि आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. कोणकोण आहे या यादीत बघा जरा..

राजश्रीचा चित्रपट प्रेम रतन धन पायो मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसलेल्या अरमान कोहलीला या चित्रपटापासून किती यश मिळ कुठल्या नायिकांनी चित्रपटाला नकार दिला आणि पुढे तोच चित्रपट कसा सुपर हिट झाला यांची रंजक कथा काल आपण वाचली. परंतु असा प्रकार केवळ नायिकांसोबतच घडला असे नव्हे तर काही नायकांनीही ही घोडचूक केली आणि आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. कोणकोण आहे या यादीत बघा जरा..

राजश्रीचा चित्रपट प्रेम रतन धन पायोमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसलेल्या अरमान कोहलीला या चित्रपटापासून किती यश मिळाले किंवा मिळेल, हे येणारा काळच सांगेल. मात्र तो आपल्या त्या काळाला विसरु शकत नाही, ज्यावेळी त्याने एका अशा चित्रपटाची ऑफर नाकारली होती, ज्याच्या यशाने बॉलिवूडला किंग खान सारखा सुपर स्टार दिला. ही गोष्ट अनेकांना हैराण करेल की, शाहरुख खानच्या पहिल्या प्रदर्शित दिवाना चित्रपटाची ऑफर सर्वप्रथम अरमान कोहलीला दिली गेली होती. मात्र अरमान कोहलीचे नशीब पहा त्याला चित्रपटाची कथा कमकुवत वाटली आणि त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. नंतर याच चित्रपटामुळे शाहरुख खानने आपली सुरुवात केली आणि धमाकेदार सुरुवात झाली. अरमान कोहली आजही आपल्या या निर्णयाबाबत नक्की पश्‍चाताप करीत असेल.

अरमानसारखे निर्णय घेणार्‍या स्टारमध्ये आणखी दुसरे दिग्गज स्टारदेखील आहेत. इतकेच नव्हे शाहरुख खाननेदेखील अशी चूक केली आहे. राजकुमार हिरानींचा पहिला चित्रपट मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये मुन्नाच्या भूमिकेसाठी हिरानींची प्रथम पसंती शाहरुख खान होती आणि जिमी शेरगिलच्या भूमिकेसाठी संजय दत्त पाहुणा कलाकाराची भूमिका करणार होता. शाहरुखला काय सुचले देवजाणे त्याने चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आणि संजय दत्तला मुख्य भूमिकेत घेतले गेले. मुन्नाभाईने संजय दत्तच्या करिअरची दिशाच बदलून टाकली. शाहरुख खानने अशी चूक एकदाच केलेली नाही. आमीर खानच्या लगानची पहिली ऑफर त्याला मिळाली होती, मात्र त्याला कथा आवडली नाही. आमीर खानने अशा प्रकारच्या चुका तीन चित्रपटांच्या वेळी केल्या आहेत.

साजन (संजय दत्तची भूमिका) आणि डर (शाहरुखची भूमिका) ला आमिर खानने यामुळे नकार दिला की, त्याला या चित्रपटाचा क्लाइमॅक्स आवडलेला नव्हता. स्वदेस चित्रपटाची पहिली ऑफर त्याला मिळाली होती. त्याच्या नकारानंतर हृतिक रोशन आणि अखेर शाहरुख खानला मिळाली. आजही स्वदेसला शाहरुख खानच्या परफॉर्मसाठी उत्कृष्ट चित्रपटात गणले जाते. फरहान अख्तरने हृतिकला दिल चाहता हैमध्ये आकाशच्या (आमीर खान) भूमिकेसाठी सर्वप्रथम निवडले होते.

मात्र हृतिकजवळ या चित्रपटासाठी तारखा नव्हत्या. फरहान अख्तरने भाग मिल्खा भागमध्ये बिंधास परफॉर्मसाठी जगभरातून प्रशंसा मिळविली. ही प्रशंसा अक्षय कुमारला मिळाली असती जर त्यांने मिल्खा बनण्यास नकार दिला नसता तर. सलमान खानचे नावदेखील या यादीत येते. त्याने बाजीगर आणि चक दे इंडियाच्या ऑफरला नकार दिला आणि हे दोन्ही चित्रपट शाहरुख खानला मिळाले. 

Web Title: Nayaks also lost many hit movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.