एक्स बॉयफ्रेंडचे 'हे' वक्तव्य ऐकताच दीपिका पादुकोणचा होऊ शकतो राग अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 08:00 PM2019-01-20T20:00:00+5:302019-01-20T20:00:00+5:30

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे लग्न हे बी-टाऊनमधील सगळ्यात हॉट कपल आहे. लग्नाला दोन महिने उलटून गेली तरी कोणत्याना कोणत्या कारणामुळे दीपवीर चर्चेत असतात.

If Deepika Padukone heard the of her x bf she might be got angry | एक्स बॉयफ्रेंडचे 'हे' वक्तव्य ऐकताच दीपिका पादुकोणचा होऊ शकतो राग अनावर

एक्स बॉयफ्रेंडचे 'हे' वक्तव्य ऐकताच दीपिका पादुकोणचा होऊ शकतो राग अनावर

googlenewsNext
ठळक मुद्देआणखी एक अभिनेता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे लग्न हे बी-टाऊनमधील सगळ्यात हॉट कपल आहे. लग्नाला दोन महिने उलटून गेली तरी कोणत्याना कोणत्या कारणामुळे दीपवीर चर्चेत असतात. दीपिकानंतर अनेक सेलिब्रेटी विवाह बंधनात अडकल्या. आणखी एक अभिनेता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड  निहार पांड्या आहे. निहार लवकरच कंगना राणौतच्या 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. 


लग्नाच्या आधी निहारने दीपिकाशी असलेल्या नात्याबाबत भाष्य केले, निहार म्हणाला की, ''मला माझ्या लग्नाच्या दिवशी दीपिकाच्या एक्सबायॉफ्रेंडचे लग्न होतेयं ही हेडलाईन बनायचे नाहीय. मला माझी स्वत:ची ओळख निर्माण करायची आहे. पुढे तो म्हणाला, दीपिकाबाबत माझ्या मनात कोणातीच कटूता नाहीय. '' दीपिका निहारसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होती, अशीही चर्चा होती. दोघांची भेट एका अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये झाली होती आणि तेथूनच दोघांमध्ये प्रेम बहरले. यादरम्यान दीपिका व निहार तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. पण तीन वर्षांच्या अफेअरनंतर दोघांचे ब्रेकअप झाले.


निहार लवकरच सिंगर नीति मोहनसोबत लग्नगाठ बांधणार आहे.  निहार व नीति दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत येत्या फेब्रुवारीत हे कपल लग्नबंधनात अडकणार, असल्याची माहिती आहे.      
 

Web Title: If Deepika Padukone heard the of her x bf she might be got angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.