या कलाकारांचा पहिला चित्रपट झाला होता फ्लॉप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 17:33 IST2016-10-20T14:59:25+5:302016-10-21T17:33:52+5:30

          चित्रपटसृष्टीत पदापर्ण करण्यासाठी कितीतरी कलाकार अपार मेहनत घेत असतात. आपला पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर ...

The first of these actors was the flop ... | या कलाकारांचा पहिला चित्रपट झाला होता फ्लॉप...

या कलाकारांचा पहिला चित्रपट झाला होता फ्लॉप...

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> 
        चित्रपटसृष्टीत पदापर्ण करण्यासाठी कितीतरी कलाकार अपार मेहनत घेत असतात. आपला पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट व्हावा आणि प्रेक्षकांनी आपल्या कामाचे कौतुक करावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. परंतु बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे पदार्पणच निराशजनक झाले. मग यामध्ये स्टारपुत्रांचा देखील समावेश आहे. पाहुयात अशाच काही कलाकारांचे बॉलिवूडमधील प्लॉप पदार्पण....
 
हर्षवर्धन - सैयमी (मिर्झ्रिया) : अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत असल्याने त्याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कपूर घराण्यालाच बॉलिवूडची पार्श्वभूमी असल्याने हर्षवर्धन नक्कीच पहिला चित्रपट गाजविणार अशा सर्वांच्याच अपेक्षा होत्या. परंतु हर्षवर्धन कपूर आणि सैयमी खेर यांच्या मिर्झिया या पहिल्याच चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपयश मिळाले. या जोडीचा पहिलाच चित्रपट जरी आपटला तरी नक्कीच भविष्यात आपल्याला हे दोघे दमदार चित्रपटांमध्ये दिसु शकतात.

 
 
सुरज पांचोली - आथिया शेट्टी (हिरो): आदित्या पांचोलीचा मुलगा आणि सुनिल शेट्टीची मुलगी एकत्र चित्रपटात झळकणार. अशा चर्चा बॉलिवूडमध्ये रंगु लागल्या होत्या. खबर पक्की होती आणि या फ्रेश जोडीला लाँच करणार होता बॉलिवूडचा भाईजान सलमान खान. सलमानने त्याच्या हिरो या चित्रपटातून आथिया-सुरजच्या जोडीला मोठ्या पडद्यावर आणले. परंतु या प्रयत्न फारच अयशस्वी ठरला. सलमानने हा चित्रपट यशस्वी व्हावा म्हणून प्रचंड मेहनत घेतली होती. एवढेच काय पण, मै हु हिरो तेरा हे गाणे देखील त्याने या चित्रपटासाठी गायले होते. पण सल्लुची मेहनत काही कामी आली नाही. सलमानच्या काही चाहत्यांनी हा चित्रपट केवळ त्याचा गाण्यासाठीच थिएटरमध्ये जाऊन पाहिला असावा. 

 
सोनम कपूर - रणबीर कपूर (सावरीया) : सोनम आणि रणबीरचा सावरीया हा चित्रपट कधी आला आणि गेला हे कळले सुद्धा नाही. अनिल कपुरची मुलगी आणि ऋषी कपूरचा मुलगा असे दाघेही चित्रपटसृष्टीतल्या नावाजलेल्या घराण्यातील मुले त्यांच्या पहिल्याच चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. त्याच दिवशी शाहरुख खानचा ओम शांती ओम हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी या नवीन जोडीकडे पाठ फिरवून किंग खानचा चित्रपट पाहणे पसंत केले.

  
 
करीना कपूर - अभिषेक बच्चन ( रेफ्युजी) : अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि कपूर घराण्याची बेबो चित्रपटात एकत्र झळकणार ही बातमी समजताच सिनेवर्तळात अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. त्याला कारणही तसेच होते, करीना कपूर  आधी ऋतिक रोशन सोबत कहोना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. या चित्रपटातील काही सीनचे शूटिंग देखील करीनाने केले होते. परंतु अचानक बेबोने या सिनेमातून एक्झिट घेतली. आणि ती रेफ्युजी या सिनेमातून अभिषेक बच्चन सोबत सिने इंडस्ट्रीत आली. मात्र रेफ्युजी बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. 

  
 
राणी मुखर्जी - शदाब खान ( राजा कि आयेगी बारात ) : राणी आणि शदाबने राजा कि आयेगी बारात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट चांगलाच सुपरफ्लॉप झाला. परंतु या चित्रपटानंतर राणीचे ग्रह अचानक बदलले आणि तिला अनेच चांगल्या चित्रपटाच्या ऑफर्स आल्या. आज राणी मुखर्जी हे नाव बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. तर शदाब खानने हे राम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आणि सध्या तो काय करतोय, कुठे आहे हे कोणालाच ठाऊक नाही.

Web Title: The first of these actors was the flop ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.