सुनितासोबत 37 वर्ष संसार केल्यानंतर गोविंदाने पुन्हा बांधली लग्नगाठ; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 01:10 PM2024-03-22T13:10:38+5:302024-03-22T13:11:03+5:30

Govinda: गोविंदाच्या दुसऱ्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तसंच त्याने नेमकं कोणासोबत लग्न केलं हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

dance-deewane-season-4-govinda-sunita-varmala-ceremony-with-madhuri-dixit-and-suniel-shetty | सुनितासोबत 37 वर्ष संसार केल्यानंतर गोविंदाने पुन्हा बांधली लग्नगाठ; व्हिडीओ व्हायरल

सुनितासोबत 37 वर्ष संसार केल्यानंतर गोविंदाने पुन्हा बांधली लग्नगाठ; व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे गोविंदा (govind). उत्तम अभिनयशैली आणि हटके डान्स स्टाइल यांच्या जोरावर गोविंदाने तुफान लोकप्रियता मिळवली. आजवरच्या कारकिर्दीत या अभिनेत्याने अनेक लोकप्रिय अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे त्याच्या गाजलेल्या सिनेमांची कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते. यामध्येच सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

गोविंदाने सुनिता आहुजासोबत लग्न गाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाला जवळपास ३७ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. मात्र, लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतरही गोविंदाने पुन्हा लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याने नेमकं कोणाशी दुसरं लग्न केलं? हा प्रश्न पडला आहे.

गोविंदाने कोणाशी केलं दुसरं लग्न?

गोविंदाने कोणत्याही परस्त्री बरोबर लग्न केलं नसून त्याच्याच पत्नीसोबत सुनितासोबत दुसरं लग्न केलं आहे. अलिकडेच त्याने आणि सुनिताने डान्स दिवाने ४ च्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी या कार्यक्रमाच्या सेटवर गोविंदा आणि सुनिता यांचं दुसऱ्यांदा लग्न लावण्यात आलं.

गोविंदा आणि सुनिता यांच्या लग्नातील एकही फोटो त्यांच्याकडे नाही. त्यामुळे या मंचावर त्या दोघांनी वरमाला घालत पुन्हा दुसऱ्यांदा लग्न केलं. गोविंदा आणि सुनिता यांचं लव्ह मॅरेज असून एका लग्नात त्यांची पहिली भेट झाली होती.

Web Title: dance-deewane-season-4-govinda-sunita-varmala-ceremony-with-madhuri-dixit-and-suniel-shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.