Birth Day Special : हेमा मालिनी व जितेन्द्र यांच्या ‘न झालेल्या’ लग्नाची गोष्ट...खास आपल्यासाठी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 11:16 IST2017-10-16T05:46:55+5:302017-10-16T11:16:55+5:30
‘ड्रिम गर्ल’ हेमामालिनी यांचा आज (१७ आॅक्टोबर) वाढदिवस. आज वाढदिवसाच्या मुहूर्तावर हेमा मालिनी यांचे ‘बियॉण्ड द ड्रीम गर्ल’ या ...
.jpg)
Birth Day Special : हेमा मालिनी व जितेन्द्र यांच्या ‘न झालेल्या’ लग्नाची गोष्ट...खास आपल्यासाठी!
‘ ्रिम गर्ल’ हेमामालिनी यांचा आज (१७ आॅक्टोबर) वाढदिवस. आज वाढदिवसाच्या मुहूर्तावर हेमा मालिनी यांचे ‘बियॉण्ड द ड्रीम गर्ल’ या त्यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन होत आहे. राम कमल मुखर्जी लिखित या जीवनचरित्रात हेमा मालिनी यांच्या आयुष्यातील अनेक किस्से आपल्याला वाचायला मिळणार आहेत. यातील असाच एक किस्सा म्हणजे, हेमा मालिनी आणि जितेंद्र यांच्या न झालेल्या लग्नाचा.
![]()
‘बियॉण्ड द ड्रीम गर्ल’मधील हा किस्सा ‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केला आहे. जितेन्द्र व हेमा मालिनी यांचे लग्न होणार होते. पण हे लग्न म्हणजे हेमा मालिनी यांच्यासाठी जबरदस्तीचा मामला होता. कारण हेमा मालिनी तेव्हा धर्मेन्द्र यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. जितेन्द्र यांना हेमा आवडायच्या. पण हेमा यांनी जितेन्द्र यांना कधीच प्रतिसाद दिला नाही. अखेर हेमा यांनी धर्मेन्द्र यांच्याबद्दल जितेन्द्र यांना सांगितले. यानंतर जितेन्द्र व हेमा यांनी मित्र बनून राहण्याचा निर्णय घेतला. हेमा यांना धर्मेन्द्र यांच्यासोबत लग्न करायचे होते. पण कुटुंबाचा विरोध होता. अखेर कुटुंबीयांनी लवकरात लवकर हेमांचे लग्न उरकून टाकण्याचा निर्णय घेतला. जितेन्द्रचे स्थळ यासाठी परफेक्ट होते. कुटुंबीयांचा निर्णय मानून हेमा या लग्नाला होकार दिला. हेमा यांच्याप्रमाणेच जितेन्द्र यांचे हेमावर प्रेम नव्हते. पण हेमांचा स्वभाव पाहून त्यांनीही या लग्नाला होकार कळवला. लग्नात कुठलेही विघ्न नको म्हणून हे लग्न मद्रासला करण्याचे ठरले.
![]()
ALSO READ: ‘बीयॉन्ड द ड्रीम गर्ल’ मधून उलगडणार हेमा मालिनी यांच्या आयुष्यातील अनेक रहस्ये !
हेमा, जितेन्द्र्र आणि त्यांचे कुटुंबीय मद्रासला पोहोचले होते. पण का कशी पण तिथल्या एका वृत्तपत्राला या लग्नाची कुणकुण लागली आणि त्यांनी हे वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताने अनेकांनाच धक्का बसला. धर्मेन्द्र यांच्यासाठी तर हे सर्व अनपेक्षित होते. ही बातमी धर्मेन्द्र यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी जितेन्द्र यांची तत्कालीन प्रेयसी शोभा सिप्पी यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर ते दोघेही मद्रासला रवाना झाले. हा सगळा एपिसोड कुठल्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हता.
हेमा यांच्या वडिलांनी धर्मेन्द्र यांना पाहून त्यांना अक्षरश: धक्के मारून घराबाहेर काढले. तुम्ही विवाहित आहात, त्यामुळे तुम्ही माझ्या मुलीसोबत लग्न करु शकत नाही, असे ते वारंवार म्हणत होते. खूप प्रयत्नांती धर्मेन्द्र यांनी हेमा यांच्याशी एकांतात बोलण्याची परवानगी मिळवली. धर्मेन्द्र आणि शोभा दोघंही त्यांचं प्रेम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. धर्मेन्द्र यांच्याशी बोलल्यानंतर हेमा आपल्या खोलीतून बाहेर आल्या आणि त्यांनी घरातल्या मंडळींकडे काही दिवसांचा अवधी मागितला. पण, लग्न होईल तर आत्ताच, नाहीतर कधीच नाही, अशी भूमिका जितेन्द्र आणि त्यांच्या आईवडिलांनी घेतली. सगळ्यांना हेमा यांच्या उत्तराची प्रतीक्षा होती. अखेर हेमामालिनी यांनी नकारार्थी मान हलवली आणि जितेन्द्रसोबतचं त्यांचे लग्न तुटले. जितेन्द्र यांना हा अपमान सहन झाला नाही. ते तडक त्या ठिकाणाहून निघून गेले होते.
‘बियॉण्ड द ड्रीम गर्ल’मधील हा किस्सा ‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केला आहे. जितेन्द्र व हेमा मालिनी यांचे लग्न होणार होते. पण हे लग्न म्हणजे हेमा मालिनी यांच्यासाठी जबरदस्तीचा मामला होता. कारण हेमा मालिनी तेव्हा धर्मेन्द्र यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. जितेन्द्र यांना हेमा आवडायच्या. पण हेमा यांनी जितेन्द्र यांना कधीच प्रतिसाद दिला नाही. अखेर हेमा यांनी धर्मेन्द्र यांच्याबद्दल जितेन्द्र यांना सांगितले. यानंतर जितेन्द्र व हेमा यांनी मित्र बनून राहण्याचा निर्णय घेतला. हेमा यांना धर्मेन्द्र यांच्यासोबत लग्न करायचे होते. पण कुटुंबाचा विरोध होता. अखेर कुटुंबीयांनी लवकरात लवकर हेमांचे लग्न उरकून टाकण्याचा निर्णय घेतला. जितेन्द्रचे स्थळ यासाठी परफेक्ट होते. कुटुंबीयांचा निर्णय मानून हेमा या लग्नाला होकार दिला. हेमा यांच्याप्रमाणेच जितेन्द्र यांचे हेमावर प्रेम नव्हते. पण हेमांचा स्वभाव पाहून त्यांनीही या लग्नाला होकार कळवला. लग्नात कुठलेही विघ्न नको म्हणून हे लग्न मद्रासला करण्याचे ठरले.
ALSO READ: ‘बीयॉन्ड द ड्रीम गर्ल’ मधून उलगडणार हेमा मालिनी यांच्या आयुष्यातील अनेक रहस्ये !
हेमा, जितेन्द्र्र आणि त्यांचे कुटुंबीय मद्रासला पोहोचले होते. पण का कशी पण तिथल्या एका वृत्तपत्राला या लग्नाची कुणकुण लागली आणि त्यांनी हे वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताने अनेकांनाच धक्का बसला. धर्मेन्द्र यांच्यासाठी तर हे सर्व अनपेक्षित होते. ही बातमी धर्मेन्द्र यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी जितेन्द्र यांची तत्कालीन प्रेयसी शोभा सिप्पी यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर ते दोघेही मद्रासला रवाना झाले. हा सगळा एपिसोड कुठल्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हता.
हेमा यांच्या वडिलांनी धर्मेन्द्र यांना पाहून त्यांना अक्षरश: धक्के मारून घराबाहेर काढले. तुम्ही विवाहित आहात, त्यामुळे तुम्ही माझ्या मुलीसोबत लग्न करु शकत नाही, असे ते वारंवार म्हणत होते. खूप प्रयत्नांती धर्मेन्द्र यांनी हेमा यांच्याशी एकांतात बोलण्याची परवानगी मिळवली. धर्मेन्द्र आणि शोभा दोघंही त्यांचं प्रेम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. धर्मेन्द्र यांच्याशी बोलल्यानंतर हेमा आपल्या खोलीतून बाहेर आल्या आणि त्यांनी घरातल्या मंडळींकडे काही दिवसांचा अवधी मागितला. पण, लग्न होईल तर आत्ताच, नाहीतर कधीच नाही, अशी भूमिका जितेन्द्र आणि त्यांच्या आईवडिलांनी घेतली. सगळ्यांना हेमा यांच्या उत्तराची प्रतीक्षा होती. अखेर हेमामालिनी यांनी नकारार्थी मान हलवली आणि जितेन्द्रसोबतचं त्यांचे लग्न तुटले. जितेन्द्र यांना हा अपमान सहन झाला नाही. ते तडक त्या ठिकाणाहून निघून गेले होते.