अजरामर साहिर लुधियानवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 18:44 IST2016-10-25T18:44:06+5:302016-10-25T18:44:06+5:30
जुण्या काळातीलच नव्हे तर आजच्या तरुणाईमध्ये देखील त्यांच्या गीतांची क्रेझ कायम आहे.

अजरामर साहिर लुधियानवी
1. ‘कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है’ : यश चोपडा दिग्दर्शित ‘कभी-कभी’ हा चित्रपट साहिर लुधियानवी यांच्या जीवनावर आधारित होता असे मानले जाते. यश चोपडा यांचा साहिर लुधियानवी यांच्या प्रसंशकात समावेश होतो. हे गीत साहिर लुधियानवी यांच्या गझलांमधील सर्वोत्कृष्ठ मानले जाते. सोपी व काळजाचा वेध घेणारी शब्दरचना हे या गीताचे विशेष. खय्याम यांच्या संगीताने या गीताला अधिकच सुंदर केले आहे. अनेक प्रेमी युगुलांना हे गीत त्यांच्या जीवनाचा मंत्रच वाटतो.
2. ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’ : देवानंद यांच्या हम दोनो या चित्रपटातील हे गीत साहिर लुधियानवी यांच्या लेखनीतून अवतरले होते. जयदेव यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत त्यावेळच्या तरुणाईच्या ओठावर असायचे आजच्या पिढीमध्येही या क्लासिक गितांची आठवण कायम आहे. महोमंद रफी यांनी गायलेले हे गीत आजही युवकांच्या भावनांना व्यक्त करण्याचे सर्वांत चांगले माध्यम असल्याचे वाटते.
3. ‘ऐ मेरी जोहराजबी’ : यश चोपडा दिग्दर्शित ‘वक्त’ या चित्रपटातील या कव्वाली शिवाय लग्नसोहळा अपूराच मानला जातो. लग्णांच्या वाढदिवसाला हे गाणे हमखास वाजायलाच हवे अशीच या गाण्याची ख्याती म्हणालायल हवी. साहिर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीताला रवी यांनी सुरांचा साज चढविला. मन्ना डे यांनी आपल्या आवाजात या गीताला नव्या उंचीवर नेऊन ठवले.
4. ‘सर जो तेरा चकराये’ : गुरुदत्त व साहिर हे एकमेकांना पूरक होते असेच म्हणावे लागेल. बाजी, आर पार, प्यासा, कागझ के फूल, साहीब, बीबी और गुलाम या चित्रपटांच्या यशात साहिर यांनी लिहिलेल्या गीतांचाही मोठा वाटा आहे. आजच्या तरुणाईला साहिर यांनी ‘प्यासा’ या चित्रपटातील ‘सर जो तेरा चकराये’ हे गाणे आजही लक्षात आहे. जॉनी लिव्हर यांच्यावर चित्रीत केलेल्या हे गीत मोहमंद रफी यांनी गायले आहे.
5. ‘महोब्बत बडे काम की चिज है’ : यश चोपडा दिग्दर्शित त्रिशूल या चित्रपटातील हेमामालिनी व शशी कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गीताला आही पसंत केले जाते. हा चित्रपट मल्टी स्टारर मानला जातो. मात्र पडद्यामागे दिग्गज कलावंताची फळी होती. यश चोपडा, सलीम-जावेद, खय्याम व साहिर लुधियानवी यांनी या चित्रपटला नवी उंची प्रदान केली.
6. ‘देखू तुम्हे या चूप रहू’ : पहिल्यांदा प्रेमात पडलेल्या तरुणाला या गाण्याची आठवण होणार नाही असे क्वचितच घडेल. यश चोपडा दिग्दर्शित दीवार या चित्रपटात अमिताभ व शशी कपूर यांच्या भूमिका होत्या. दीवारच्या यशात सलीम जावेद यांच्या संवादसह साहिर लुधियानवी व आर.डी. बर्मन यांची गीतरचना व संगीत यानेही महत्त्वाची भूमिका होती.
7. जीवन के सफर मे राही : 1955 साली प्रदर्शित झालेल्या मुनमजी या चित्रपटातील हे गीत आजही तरुणांना मोहिनी घालणारे आहे. साहिर लुधियानवी यांच्या गीतांना आर.डी. बर्मन यांनी संगीत बद्ध केले असून किशोर कुमार यांनी आपला आवाज दिला आहे.
8. मै पल दो पल का शायर हो : कभी कभी या चित्रपटातील हे गीत साहिर लुधियानवी यांनी स्वत:वर लिहिले आहे. साहिर यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोणच या गीतातून व्यक्त होतो.
यश चोपडा - साहिरचे अतूट नाते
यश चोपडा व साहिर लुधियानवी यांचे अतूट नाते होते. यश चोपडा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात साहिर यांच्या गितांनी कमाल केली. यश चोपडा साहिर यांचे फॅन होते. कॉलेजमध्ये असताना यश साहिर यांच्या कवितांचे पॉकेट बुक आपल्या खिशात बळगत असे व त्यातील कविता वाचून प्रसंशा मिळवित होते. स्वत: यश चोपडा यांनी ही कबुली दिली.