Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर अनुष्काचं हृदय तुटलं, पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दुःख
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 10:23 IST2025-06-05T10:23:21+5:302025-06-05T10:23:33+5:30
Anushka Sharma on Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर अनुष्का शर्मानं व्यक्त केलं दुःख

Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर अनुष्काचं हृदय तुटलं, पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दुःख
Bengaluru Stampede: IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण बंगळुरु शहर जल्लोष झाला. मात्र, अवघ्या २४ तासांत हा जल्लोष दु:खात बदलला . चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ७-८ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३० हून अधिक जखमी झालेत. या दुर्घटनेवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma Bengaluru Stampede) सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपलं दुःख व्यक्त केलं आहे.
अनुष्कानं तिच्या इंस्टाग्रामवर आयपीएल संघ आरसीबीच्या अधिकृत निवेदनाची पोस्ट शेअर करून दुःख व्यक्त केलं. या पोस्टसोबत अनुष्कानं हार्ट ब्रेक इमोजी शेअर केले आहेत. या निवेदनामध्ये म्हटलं की, "आज दुपारी संघाच्या आगमनानंतर बेंगळुरूमध्ये झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमावेळी झालेल्या दुर्दैवी घटनांची माहिती माध्यमांच्या वृत्तांतातून समोर आल्यानंतर आम्हाला खूप दुःख झालं आहे. सर्वांच्या सुरक्षिततेला आणि आरोग्याला आम्ही सर्वाधिक महत्त्व देतो. या दु:खद घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही मन:पूर्वक संवेदना व्यक्त करतो. परिस्थितीची जाणीव होताच आम्ही आमच्या कार्यक्रमात तातडीने बदल केले आहेत. तसेच स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे पालन करत आहोत. सर्व समर्थकांना विनंती करतो की, कृपया सुरक्षित राहा", असं आरसीबीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.ॉ
चेंगराचेंगरी कशी घडली?
आरसीबीच्या विजयी परेडच्यादरम्यान बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. स्टेडियमच्या बाहेर देखील मोठी गर्दी झाली होती. यावेळी गर्दी कमी व्हावी म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जातं. मात्र, यावेळी चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही १० लाखांची मदत जाहीर करत आहोत, अशीही घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. स्टेडियमची क्षमता ३५ हजार लोकांची होती परंतु या कार्यक्रमासाठी २-३ लाख लोक आले होते असं मुख्यमंत्री सिद्धराम्मैया यांनी म्हटलं.