'बंटी और बबली' सिनेमासाठी अभिषेक बच्चनला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याची केलेली निवड, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:04 IST2025-05-29T14:04:22+5:302025-05-29T14:04:57+5:30
२००५ साली रिलीज झालेला 'बंटी और बबली' (Bunty Aur Bubbly Movie) हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यातील अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी या जोडीला खूप पसंती मिळाली होती. मात्र चित्रपटासाठी अभिषेक बच्चनला निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती.

'बंटी और बबली' सिनेमासाठी अभिषेक बच्चनला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याची केलेली निवड, पण...
२००५ साली राणी मुखर्जी (Rani Mukherjee), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 'बंटी और बबली' (Bunty Aur Bubbly Movie) हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील डायलॉग्स आणि गाणी सर्व हिट झाले होते. चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी या जोडीला खूप पसंती मिळाली होती. मात्र चित्रपटासाठी अभिषेक बच्चनला निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची निवड केली होती. पण त्याने सिनेमात काम करण्यास नकार दिला.
हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून आम्ही बोलत आहोत हृतिक रोशन(Hritik Roshan)बद्दल. सुरूवातीला बंटी और बबलीसाठी हृतिक रोशनची निवड करण्यात आली होती. पण त्यावेळी तो त्या छोट्या शहरातील मुलाची भूमिका साकारणे कंफर्टेबल वाटत नव्हते. आता कित्येक वर्षांनंतर हृतिक रोशनने खुलासा केला आहे की, त्याने हा चित्रपट नाकारला होता. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत बंटी और बबलीचे दिग्दर्शक शाद अलीने खुलासा केला की, हृतिक रोशन अभिषेकने साकारलेल्या भूमिकेसाठी पहिली पसंती होता. त्याचे वडील राकेश रोशन यांना या चित्रपटाची स्क्रीप्ट खूप आवडली होती आणि त्यांची इच्छा होती की, हृतिकने त्यात काम करावे.
हृतिकने चित्रपट का नाकारला?
शाद अली म्हणाला की, 'त्यावेळी हृतिकला एका छोट्या शहरातील मुलाची भूमिका साकारण्यास सोयीस्कर वाटत नव्हते. मात्र, त्याने सुपर ३० मध्ये उत्तम काम केले.' शादने सांगितले की हृतिक रोशनने चित्रपटाच्या कल्पनेबद्दल देखील सांगितले आणि शेवटच्या दृश्यात या जोडप्याने पुन्हा फसवणूक करावी असा त्याचा विचार होता. याबद्दल बोलताना हृतिकने सांगितले की तो 'सुपरमॅनसारखा' आहे. त्यामुळे जर तो त्याच्या आयुष्यात परतला तर ते योग्य होणार नाही आणि त्याला फसवणूकीच्या जगात परतणे आवश्यक होते.
'बंटी और बबली' सीक्वलबद्दल
'बंटी और बबली' मध्ये ऐश्वर्या रायचे एक आयटम सॉंग होते जे खूप लोकप्रिय झाले. लोकांना अजूनही हे गाणे ऐकायला आवडते. 'बंटी और बबली'चा दुसरा भाग देखील आला आहे. ज्यामध्ये सैफ अली खान राणी मुखर्जीसोबत दिसला होता. त्यांच्याशिवाय सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत दिसले होते.