"नवरा म्हणून माझ्यात काय कमी होतं?", घटस्फोटानंतर आमिर खाने Ex पत्नीला विचारलेला प्रश्न; किरण राव म्हणाली- तू खूप...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 09:45 AM2024-02-25T09:45:18+5:302024-02-25T09:45:53+5:30

किरण रावबरोबरच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला आमिर खान, म्हणतो, " त्यानंतर मी तिला..."

aamir khan asked kiran rao after divorce that what he lacked as husband ex wife answered | "नवरा म्हणून माझ्यात काय कमी होतं?", घटस्फोटानंतर आमिर खाने Ex पत्नीला विचारलेला प्रश्न; किरण राव म्हणाली- तू खूप...

"नवरा म्हणून माझ्यात काय कमी होतं?", घटस्फोटानंतर आमिर खाने Ex पत्नीला विचारलेला प्रश्न; किरण राव म्हणाली- तू खूप...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान अभिनयाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. रीना दत्ताबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर आमिरने किरण रावशी लग्न करत दुसऱ्यांदा संसार थाटला होता. पण, सगळं काही नीट सुरू असताना त्या दोघांनीही २०२१मध्ये अचानक घटस्फोट घेत असल्याचं सांगितल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेत वेगळं झाल्याचं किरण रावने सांगितलं होतं. त्यानंतर आता घटस्फोटाच्या ३ वर्षांनी यावर पहिल्यांदाच आमिरने भाष्य केलं आहे. 

आमिरने एबीपीच्या आयडिया ऑफ इंडिया समिटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीत आमिरने त्याच्या घटस्फोटाबाबत भाष्य केलं. घटस्फोटानंतर आमिरने किरण रावला काही प्रश्न विचारल्याचं त्याने मुलाखतीत सांगितलं. आमिर म्हणाला, "आमचा घटस्फोट झाला आहे, हे तर तुम्हाला माहितच आहे. एक दिवस संध्याकाळी मी किरणला बोललो की एक पती म्हणून माझ्यात काय कमी आहे? मी माझ्यात काय सुधारणा करू शकतो? आयुष्यात मी पुढे चाललो आहे तर यावर नक्कीच विचार करेन." 

आमिरच्या या प्रश्नावर किरणने लिस्टच वाचून दाखवली. "किरण मला म्हणाली की लिहून घे आणि तिने मला खूप सारे पॉइंट्स सांगितले. तू खूप बोलतोस...तू कोणालाच बोलून देत नाहीस. तुला तुझंच खरं करायचं असतं...असे १५-२० पॉइंट्स मी लिहिले. ती म्हणाली की तू विचारलं म्हणून मी सांगितलं," असं पुढे आमिरने सांगितलं. सध्या आमिर किरण रावचं दिग्दर्शन असलेल्या लापता लेडीजचं प्रमोशन करत आहे. या सिनेमाची निर्मिती बाजू त्याने सांभाळली आहे. 

आमिर खानने  १९८६ साली रीना दत्ताशी लग्न केलं होतं. पण, काही कारणांमुळे २००२मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यांना आयरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत. रीनाशी घटस्फोट घेतल्यानंतर आमिरने २००५मध्ये किरण रावशी विवाह करत दुसऱ्यांदा संसार थाटला होता. २०२१मध्ये त्यांनी घटस्फोट घेतल्याचं समोर आलं होतं. घटस्फोटानंतरही आमिरच्या दोन्ही Ex पत्नी त्याच्याच बिल्डिंगमध्ये राहतात. 

Web Title: aamir khan asked kiran rao after divorce that what he lacked as husband ex wife answered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.