सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
By देवेंद्र जाधव | Updated: June 15, 2025 15:54 IST2025-06-15T15:51:39+5:302025-06-15T15:54:27+5:30
शालूने जब्यासोबत रिअल लाईफमध्ये खरंच लग्न केलंय का? याची अटकळ व्हायरल फोटोंवरुन बांधली जात होती. अखेर राजेश्वरीने याविषयी मौन सोडलं असून मोठा खुलासा केलाय

सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात एका गोष्टीची चर्चा आहे. ती म्हणजे 'फँड्री'तले जब्या आणि शालू यांनी खरंच लग्न केलंय का? याची. अभिनेता सोमनाथ अवघडे आणि अभिनेत्री राजेश्वरी खरात (rajeshwari kharat) यांनी एकमेकांशी खरंच लग्न केलंय का, अशी चर्चा होती. राजेश्वरीने अलीकडच्या काळात जब्यासोबतचे बरेचसे फोटोही पोस्ट केले होते. अखेर या फोटोंविषयी आणि सोमनाथसोबत खरंच लग्न केलं का? याविषयी राजेश्वरी खरातने मोठा खुलासा केला आहे. काय म्हणाली? जाणून घ्या
सोमनाथसोबत खरंच राजेश्वरीने लग्न केलं?
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी प्रश्न विचारला असता राजेश्वरी म्हणाली की, "मला असं वाटतं की, तो प्रश्न मी अजून जरा गुपितच ठेवते. लग्न झालंय की नाही झालंय, हे लोकांना ठरवू द्या. याविषयीची गुड न्यूज मी काही दिवसातच सर्वांना देईल. थोडंसं मला रहस्य ठेवायचंय. पण जसं शूटबद्दल सांगायचं की, सोमनाथसोबत बरेच शूट झालेत आता. लवकरच खूप सारे छान प्रोजेक्ट्स, स्टोरी, स्क्रिप्ट्स सर्वांना पाहायला मिळतील."
"सोमनाथ आणि माझी जी अधुरी कहाणी होती ती पूर्ण झालेली पाहायला मिळेल. याशिवाय काही प्रमाणात अधुरी कहाणी, मग प्रेम, मग ड्रामा हे सगळं सोमनाथ आणि माझ्यासोबत तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे थोटी वाट बघावी लागेल. मलाही सांगण्याची उत्सुकता आहे. पण मी थोडंसं असं धरुन ठेवलेलं आहे. म्हणून मला तुम्हा सर्वांची उत्सुकता धरुन ठेवावीशी वाटतेय." अशाप्रकारे राजेश्वरीने खुलासा केला. आता सोमनाथसोबत राजेश्वरीने खरंच लग्न केलंय की दोघांचे व्हायरल झालेले फोटो त्यांच्या आगामी शूटचा भाग आहे, हे त्यांच्या चाहत्यांना आगामी काळात कळून येईलच.