अमिताभ बच्चन यांच्यासह नातं टिकावं म्हणून जया बच्चन यांनी देखील केल्यात अशा गोष्टी,बसणार नाही तुमचाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 05:09 PM2021-06-03T17:09:50+5:302021-06-03T17:15:41+5:30

बिग बी व जया यांच्या सहजीवनाला आज 48 वर्षे पूर्ण झालीत. लग्नानंतर जया बच्चन यांच्यासाठी हे नाते टिकवून ठेवणे म्हणजे मोठे आव्हानच होते. कारण त्याचदरम्यान दोघांमध्ये तिस-याची एंट्री झाली होती. अमिताभ विवाहीत असतानाही रेखासह त्यांची जवळीक वाढली होती.

When Jaya Bachchan said she left Amitabh Bachchan alone to keep her marriage successful) | अमिताभ बच्चन यांच्यासह नातं टिकावं म्हणून जया बच्चन यांनी देखील केल्यात अशा गोष्टी,बसणार नाही तुमचाही विश्वास

अमिताभ बच्चन यांच्यासह नातं टिकावं म्हणून जया बच्चन यांनी देखील केल्यात अशा गोष्टी,बसणार नाही तुमचाही विश्वास

googlenewsNext

कितने अजीब रिश्ते हैं यहाँ…. या गाण्याच्या ओळी बॉलीवुडसाठी अगदी चपखल बसतात. कारण इथे कधी नवी नाती बनतात आणि कधी बनलेली नाती अगदी सहज तुटतात याचा काही नेम नाही. कधी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दुरावतात तर कधी एकमेकांची तोंडंही न पाहणारे बंधनात अडकतात.

 

असेच काहीसे अमिताभ आणि जया बच्चन यांच्यातही घडले. बिग बी व जया यांच्या सहजीवनाला आज 48 वर्षे पूर्ण झालीत. लग्नानंतर जया बच्चन यांच्यासाठी हे नाते टिकवून ठेवणे म्हणजे मोठे आव्हानच होते. कारण त्याचदरम्यान दोघांमध्ये तिस-याची एंट्री झाली होती. अमिताभ विवाहीत असतानाही रेखासह त्यांची जवळीक वाढली होती. 

रुपेरी पडद्यावर नायक-नायिका साकारणारे अमिताभ-रेखा रिअल लाइफमध्येही त्या काळात खूप जवळ आले होते. एकामागून एक हिट सिनेमांमध्ये दोघांची जोडी झळकत होती. सिनेमाच्या यशासह दोघांमधलं नातं आणि लव्हस्टोरीसुद्धा बहरु लागली. 'सुहाग', 'मिस्टर नटवरलाल', 'गंगा की सौंगध', 'नमक हराम', 'खून पसीना', 'सिलसिला' अशा एकाहून एक सुपरहिट सिनेमात ही जोडी झळकली. 

 

प्रत्येक सिनेमाच्या यशानंतर या दोघांमधलं प्रेमाचं नातं आणखी बहरत गेल्याचं त्यावेळी बोललं गेलं. सावन भादो सिनेमाच्या वेळी काहीशा जाडजूड दिसणा-या रेखा यांनी अमिताभसाठी स्वतःला बदलून घेतल्याच्याही चर्चा रंगल्या. अमिताभ यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या रेखा बोल्ड दिसू लागल्या. स्वतःमध्ये त्यांनी खूप बदल घडवून आणला. त्यामुळेच की काय अमिताभही स्वतःला रेखा यांच्यापासून दूर ठेवू शकले नाहीत. त्याच काळात सिलसिला सिनेमाही आला. अमिताभ-रेखा-जया यांच्या प्रेमाचा त्रिकोण दाखवलेला हा सिनेमा म्हणजे या तिघांची रिअल लाइफ स्टोरी आहे असंच बोललं जातं होतं. 

अमिताभ रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्या नात्यावरही त्या गोष्टी मोठा परिणाम झाला होता. अमिताभ यांचे रेखासह वाढणारी जवळीक बघून जया बच्चनही दुःखी होत्या. शेवटी जया यांनी अमिताभ यांच्यावर निर्बंध लावण्यापेक्षा स्वतःच दूर झाल्या. जया यांच्यासाठी कठिण काळ होता.

 

दोघांचे नाते टिकवण्यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले. म्हणून काही दिवसांसाठी त्यांनी अमिताभ यांना एकटं सोडणं पसंत केले. खुद्द जया यांनीच एका मुलाखतीत त्यांच्या नात्याविषयी खुलासा केला होता. जया बच्चन यांच्यामुळेच अमिताभसह त्यांचा सुखी संसार सुरु राहिला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Web Title: When Jaya Bachchan said she left Amitabh Bachchan alone to keep her marriage successful)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.