रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यात या गोष्टीमुळे आला होता कायमचा दुरावा?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 07:00 PM2019-08-04T19:00:00+5:302019-08-04T19:00:02+5:30

रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चा गाजत असताना ही गोष्ट जया बच्चन यांच्या कानापर्यंत पोहोचली होती.

Rekha And Amitabh bachchan got separated due to Jaya bachchan? | रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यात या गोष्टीमुळे आला होता कायमचा दुरावा?

रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यात या गोष्टीमुळे आला होता कायमचा दुरावा?

googlenewsNext
ठळक मुद्देरेखा यांना निरोप देत असताना जया म्हणाल्या, काहीही झाले तरी मी अमितला सोडणार नाही. ही गोष्ट ऐकून रेखा यांना चांगलाच धक्का बसला.

बॉलिवूडमधील काही प्रेमकथा कितीही वर्षं झाले तरी लोक विसरू शकणार नाहीत. याच प्रेमकथेपैकी एक प्रेमकथा ही अमिताभ बच्चन आणि रेखा यांची आहे. जया बच्चन आणि अमिताभ यांचे लग्न १९७३ मध्ये झाले होते. त्या दोघांच्या लग्नानंतर काहीच वर्षांत रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आले. १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या दो अनजाने या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली असे म्हटले जाते. 

रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चा गाजत असताना ही गोष्ट जया बच्चन यांच्या कानापर्यंत पोहोचली होती. रेखा आणि जया या एकेकाळी एकमेकांच्या खूप चांगल्या फ्रेंड्स होत्या. अमिताभ आणि जया यांच्या अफेअरची चर्चा सुरू असताना जया यांनी रेखा यांना जेवायला बोलावले होते. भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईच्या बाहेर गेले होते, तीच संधी साधत जया यांनी रेखा यांना जेवायला घरी बोलावले. जया यांचा फोन आला तेव्हा रेखा प्रचंड घाबरल्या होत्या, त्या त्यांना काहीतरी सुनावतील असे त्यांना वाटत होते. पण त्यांनी प्रेमाने बोलत रेखा यांना जेवायला बोलावले. 

रेखा घरी आल्यानंतर जया यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये कुठेच अमिताभ यांचा उल्लेख देखील जया यांनी केला नाही. जेवण झाल्यानंतर जया यांनी रेखा यांना आपले घर दाखवले. रेखा घरी परतत असताना जया त्यांना दरवाज्यापर्यंत सोडायला देखील गेल्या. त्यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सगळे काही बदलले. रेखा यांना निरोप देत असताना जया म्हणाल्या, काहीही झाले तरी मी अमितला सोडणार नाही. ही गोष्ट ऐकून रेखा यांना चांगलाच धक्का बसला.

जया यांनी रेखा यांना डिनरला बोलावले ही बातमी त्याकाळात प्रसारमाध्यमात छापून आली होती. पण त्या दोघांनी याबाबत न बोलणेच पसंत केले होते. जया यांना सगळे कळले आहे याची जाणीव या घटनेमुळे अमिताभ यांना झाली आणि त्याचमुळे यानंतर रेखा यांच्यापासून दूर होणेच अमिताभ यांनी पसंत केले असे म्हटले जाते. 

Web Title: Rekha And Amitabh bachchan got separated due to Jaya bachchan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.