धर्म-जातीच्या आगी भडकवून पोळ्या भाजणे व खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी, नितीन बानुगडे पाटील यांची टीका

By धीरज परब | Published: May 10, 2024 12:06 PM2024-05-10T12:06:43+5:302024-05-10T12:13:42+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: सत्ता आणि मत्ते साठी धर्म - जातीच्या आगी भडकवून भाजपा स्वतःची पोलीस भाजत आहे . गेल्या १० वर्षात काय केले ? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सांगत नाही . खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीका शिवसेना नेते प्रा .  नितीन बानुगडे पाटील यांनी भाईंदर येथील सभेत केले.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Nitin Banugade Patil criticizes Modi's guarantee of burning hives and lying | धर्म-जातीच्या आगी भडकवून पोळ्या भाजणे व खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी, नितीन बानुगडे पाटील यांची टीका

धर्म-जातीच्या आगी भडकवून पोळ्या भाजणे व खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी, नितीन बानुगडे पाटील यांची टीका

मीरारोड - सत्ता आणि मत्ते साठी धर्म - जातीच्या आगी भडकवून भाजपा स्वतःची पोलीस भाजत आहे . गेल्या १० वर्षात काय केले ? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सांगत नाही . खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीका शिवसेना नेते प्रा .  नितीन बानुगडे पाटील यांनी भाईंदर येथील सभेत केले.

उद्धव सेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी रात्री भाईंदरच्या नवघर शाळा मैदानात जाहीरसभा झाली . यावेळी बानुगडे पाटील म्हणाले कि , चीन ने भारताचा भाग बळकावला . राज्यात  १० महिन्यात २ हजार ३६६ शेतकरी आत्महत्या झाल्या . मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढली . ४५० चा गॅस सिलेंडर ११००वर तर पेट्रोल ११० वर गेले .  महागाई मुळे जनतेला जगणे मुश्किल झाले पण ह्यावर मोदी आणि भाजप बोलत नाही . भ्रष्टाचारी , बलात्कारी यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत.

काळा पैसे देशात आणणार , प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख टाकणार , २ कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार , महागाई रोखणार, प्रत्येकाला घर देणार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार, शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात तर बाबासाहेबांचे इंदू मिल मध्ये स्मारक उभारणार अश्या आता पर्यंतच्या दिलेल्या अनेक गॅरंटीचे काय झाले ? असा सवाल करत खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीका बानुगडे पाटील यांनी केली.

खासदार विनायक राऊत म्हणाले कि , उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे नकली पुत्र म्हणून मोदींनी निर्भत्सना केली , शिवसेना तोडली याला महाराष्टाची जनता माफ करणार नाही .  काश्मिरी पंडित आजही बेघर आहेत पण स्वतःच्या मित्र उद्योगपतीला १ हजार एकर जमिन घेता यावी म्हणून कलम ३७० हटवले . जाती धर्मात भांडणे लावून एकमेकांची डोकी फोडायला लावण्याचे काम भाजपा करतेय असा आरोप राऊत यांनी केला.

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले कि , डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपवण्यासाठी भाजपाला ४०० पार जागा हव्या आहेत . महिला व शेतकऱ्यांवर अत्याचार , जनतेला महागाईचा मार तर बेरोजगार ना आणखी बेरोजगार मोदी आणि भाजपने केले आहे.

काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी भाजपा आणि मोदींवर टीका केली कि , ज्यांनी इंग्रजांना साथ दिली तेच आज राज्यातील गद्दारांचे सरदार आहेत . महागाई , भ्रष्टाचार , बेरोजगारी वाढवून देशातील जनतेला मूर्ख बनवले आहे .  मोदी सांगतात कि आम्ही जगातील ५ वी अर्थसत्ता सांगतात आणि दुसरीकडे ८० कोटी जनतेला दारिद्र्य रेषेखाली म्हणून मोफत धान्य देतो सांगतात . यावेळी उद्धवसेना , राष्ट्रवादी पवार गट , काँग्रेस , आम आदमी पार्टी आदी पक्षांचे पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते . 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Nitin Banugade Patil criticizes Modi's guarantee of burning hives and lying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.