सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. ऊन वाढलं की अनेकांना उष्णतेचा त्रास होतो. अंगातली उष्णता वाढते. पोटात आग उठल्यासारखं होतं. पित्त, ॲसिडीटी असे त्रास वारंवार होऊ लागतात. तसेच लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे म्हणजेच उन्हाळी लागण्याचाही त्रास होतो. काही जणांच्या तळहाताची, तळपायाची सालं निघू लागतात. उष्णतेमुळे होणारे हे सगळे त्रास टाळायचे असतील तर एक अगदी सोपा उपाय पाहा. हा उपाय म्हणजे शीतली प्राणायाम. शरीर थंड ठेवण्यास मदत करणारं हे प्राणायाम कधी आणि कसं करायचं ते पाहुया..(benefits of shitali pranayama)
शीतली प्राणायाम कधी आणि कसं करावं?
शीतली प्राणायाम करण्यास अतिशय सोपं आहे. हे प्राणायाम तुम्ही दिवसातून कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला थोडा वेळ असेल तेव्हा एका जागी शांत बसा.
जीभ बाहेर काढून ती थोडीशी दुमडल्यासारखी करा. आता जिभेला जो थोडा नळीसारखा आकार येईल त्यातून हवा शरीरात घ्या.
यानंतर तोंड बंद करा आणि नाकातून श्वास बाहेर सोडा. असं साधारण १० वेळा करा. यासाठी तुम्हाला जास्तीतजास्त एक ते दिड मिनिट एवढाच वेळ लागेल. पण अंगातली उष्णता मात्र बरीच कमी होईल.
शीतली प्राणायाम करण्याचे फायदे
शरीरातली आग, उष्णता शांत होण्यास मदत होते.
ज्या लोकांना ॲसिडीटी, पित्त असा त्रास होतो त्या लोकांनीही शितली प्राणायाम रोज करावे. शरीरातले पित्त कमी होते.
आठवड्यातून २ वेळा चेहऱ्याला लावा 'हा' लेप, सुरकुत्या न येता पन्नाशीतही त्वचा राहील टाईट, सुंदर
शीतली प्राणायाम करण्याचे त्वचेलाही खूप फायदे होतात. जर शरीरात उष्णता असेल तर त्याचा परिणाम त्वचेवर होतोच. पिंपल्स, ॲक्ने वाढतात. अंगातली उष्णता कमी झाल्याने हे कित्येक त्रास टाळले जातात.
शीतली प्राणायाम नियमितपणे केल्यास मनावरचा ताण कमी होऊन मन शांत होण्यास मदत होते.
