घटस्फोटीत आहेत टीव्हीच्या या ‘बेफिक्रे’ बाला... जगतात बिनधास्त आयुष्य!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 04:48 PM2020-05-21T16:48:47+5:302020-05-21T16:57:49+5:30

आपल्या अटींवर जगणा-या अनेक जणी ग्लॅमर इंडस्ट्रीत आहेत, अशाच काही टेलिव्हिजन अभिनेत्रींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वैवाहिक आयुष्यात आलेल्या समस्यांचा खंबीरपणे सामना करून आज त्या आपले आयुष्य जगत आहेत.

वाहबीज दोराबजी- छोट्या पडद्यावरील रसिकांची आवडती जोडी म्हणजे विवियन सेना आणि वाहबिज दोराबजी. ‘प्यार की ये एक कहानी’ या मालिकेतून ही जोडी घराघरात पोहचली. अल्पावधीतच हे दोघेही रसिकांचे लाडके बनले. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानच विवियन आणि वाहबिज यांच्यात जवळीक वाढली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 2013मध्ये विवियनने वाहबिजसह लग्न करत आपल्या आयुष्याची नवी सरूवात केली. मात्र रसिकांचा हा आनंद फार काळ टिकून राहिला नाही. 2017 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

चाहत खन्ना- चाहत खन्नाने 2006 मध्ये भरत नरसिंघानीसोबत लग्न केले होते. पण हा संसार काही वर्षांतच मोडला. यानंतर 2015 मध्ये तिने फरहान मिर्झासोबत दुसरा संसार थाटला. पाचच वर्षांत हे लग्नही मोडले.

दलजीत कौर- दलजीतने अभिनेता शालीन भनोटसोबत लग्नगाठ बांधली होती, पण पाचच वर्षांत दोघांचा घटस्फोट झाला. दोघांचा एक मुलगा आहे.

रश्मी देसाई - रश्मी देसाईने 2012 साली अभिनेता नंदीश संधूसोबत लग्न केले. पण चारच वर्षांत दोघांचे लग्न मोडले.

वैष्णवी धनराज- ना आना इस देश मेरी लाडो या मालिकेत झळकलेल्या वैष्णवीने 2012 मध्ये नितीन सहरावतसोबत लग्न केले होते. पण लवकरच दोघांचा घटस्फोट झाला. वैष्णवीने नव-यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.

जेनिफर विंगेट- जेनिफरने करणसिंग ग्रोव्हरसोबत लग्न केले होते. पण काही वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.

सिमरन खन्ना - ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील सिमरन खन्नाने नुकतीच तिचा घटस्फोट झाल्याची माहिती दिली होती.

स्रेहा वाघ- वीरा या मालिकेतील स्रेहा वाघ हिने उण्यापु-या 19 व्या वर्षी पहिले लग्न केले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. यानंतर 2015 साली तिने अनुराग सोलंकीसोबत दुसरा संसार थाटला. पण आठ महिन्यांत तिचा हा संसारही मोडला.