अक्षय कुमारने दिलेल्या दग्याने बिथरली होती शिल्पा शेट्टी, सोबत काम न करण्याची घेतली होती शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 03:48 PM2020-09-09T15:48:51+5:302020-09-09T16:08:24+5:30

मैं खिलाड़ी तू अनाड़ी' सिनेमाच्या शूटींगवेळी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांची भेट झाली होती. इथूनच दोघांच्या नात्याला सुरूवात झाली होती.

बॉलिवूडमध्ये अफेअरची चर्चा होणं फार सामान्य बाब झाली आहे. जरा इतिहास पडताळून पाहिला तर असे किस्से समोर येतील की, धक्का बसेल. वेगवेगळ्या अफेअरप्रमाणे अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीच्या अफेअरी सुद्धा खूप चर्चा झाली होती. पण त्यांची लव्हस्टोरी सक्सेस होऊ शकली नाही. शिल्पाने अक्षयवर दगा दिल्याचा आरोप लावला होता. अक्षयने दिलेल्या दग्यामुळे शिल्पा पूर्णपणे बिथरली होती.

'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' सिनेमाच्या शूटींगवेळी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांची भेट झाली होती. इथूनच दोघांच्या नात्याला सुरूवात झाली होती.

अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी या जोडीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. यात 'इंसाफ', 'जानवर' आणि 'धड़कन'सारख्या सिनेमांचाही समावेश आहे.

शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारचं अफेअर सर्वांनाच माहीत झालं होतं. कुणीही या दोघांचीच चर्चा करत होते.

एक काळ होता जेव्हा शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार एकमेकांवर जीव ओवाळत होते आणि एकमेकांच्या आनंदासाठी काहीही करण्यासाठी तयार होते.

जेव्हा शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेणार होते, अचानक तेव्हा त्याच्या आयुष्यात ट्विंकल खन्नाची एन्ट्री झाली. शिल्पा हा धक्का सहन करू शकली नव्हती.

शिल्पाने २००० मध्ये दिलेल्या एका मुलाखती दरम्यान अक्षय कुमारवरचा राग व्यक्त केला होता. या मुलाखतीत शिल्पा म्हणाली होती की, अक्षयने तिला अंधारात ठेवलं होतं.

या मुलाखतीत शिल्पा इतक्या रागात होती की, स्पष्टपणे दिसत होतं की, ती आतून किती बिथरली आहे. त्यानंतर शिल्पा शेट्टीने शपथ घेतली होती की, पुन्हा अक्षय कुमारसोबत कधीही काम करणार नाही.

जेव्हा ट्विंकल खन्नाबाबत शिल्पाला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले होते की, ट्विंकल खन्नाकडून तिला काहीही तक्रार नाही. कारण दगा तिला अक्षयने दिला होता.