Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 10:31 IST2025-06-19T10:30:19+5:302025-06-19T10:31:34+5:30

Karisma Kapoor And Sunjay Kapur: करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे लग्न खूप मोठ्या थाटामाटात पार पडले. परंतु, त्यांचे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि ते विभक्त झाले.

Why didn't Karisma Kapoor get married after her divorce with Sunjay Kapur? Know about it | Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल

Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल

अभिनेत्री करिश्मा कपूर(Karisma Kapoor)चा एक्स पती संजय कपूर(Sunjay Kapur)चे १२ जून रोजी निधन झाले. पोलो खेळत असताना संजय कपूरला हृदयविकाराचा झटका आला. संजय आणि करिश्माचे लग्न सप्टेंबर २००३ मध्ये झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. करिश्मा आणि संजय यांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. करिश्माने संजयवर अनेक आरोपही केले होते. दोघांच्या घटस्फोटाची खूप चर्चा झाली. करिश्मापासून वेगळे झाल्यानंतर संजय त्याच्या आयुष्यात पुढे निघून गेला आणि त्याने प्रिया सचदेवाशी लग्न केले. मात्र, करिश्माने दुसरे लग्न केले नाही. करिश्माला संजयपासून दोन मुले आहेत, मुलगी समायरा आणि मुलगा कियान. करिश्माने दोन्ही मुलांचे संगोपन करण्यात तिचा वेळ घालवला. 

२०१७ मध्ये डीएनएला दिलेल्या मुलाखतीत, करिश्मा कपूरचे वडील आणि अभिनेते रणधीर कपूर यांनी करिश्माच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितले होते. करिश्माच्या दुसऱ्या लग्नाबद्दल रणधीर कपूर म्हणाले होते की, ''मला वाटतं करिश्मा चांगलीच स्थिरावलेली आणि आनंदी आहे. मी तिच्याशी लग्नाच्या विषयावर कधीही चर्चा केलेली नाही, पण जर ती असं करणार असेल तर तिला नेहमीच माझे आशीर्वाद असतील. मला वाटत नाही की तिला पुन्हा लग्न करायचं आहे. ती एक आनंदी आई आहे पण जर तिला हवं असेल तर ती कधीही पुन्हा लग्न करू शकते. पण सध्या तिला लग्न करायचं नाहीये. ती जशी आहे तशीच आनंदी आहे.''

रणधीर कपूर यांनी करिश्माला एक अप्रतिम आई म्हणून संबोधले होते. ते म्हणाले होते की, ''करिश्मा ही एक उत्तम आई आहे जी तिच्या मुलांची काळजी घेते आणि तिला आता पुन्हा लग्न करायचं नाहीये.''

संजय कपूरवर आज होणार अंत्यसंस्कार
संजय कपूरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज १९ जून २०२५ रोजी दिल्लीत होणार आहेत. संजय कपूरचे निधन युकेमध्ये झाले आणि त्याच्या अमेरिकन नागरिकत्वामुळे त्याचे पार्थिव भारतात आणण्यास विलंब झाला. गुरुवार, १९ जून रोजी संजय कपूरवर अंत्यसंस्कार सायंकाळी ५ वाजता नवी दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत होतील. करिश्मा कपूर तिच्या मुलांसह उपस्थित राहू शकते. याशिवाय, त्याची प्रार्थना सभा २२ जून २०२५ रोजी दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये सायंकाळी ४ ते ५ दरम्यान होणार आहे.

Web Title: Why didn't Karisma Kapoor get married after her divorce with Sunjay Kapur? Know about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.