'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 12:07 IST2017-12-21T06:37:31+5:302017-12-21T12:07:31+5:30
नवीन वर्षाच्या विशेष भागाचे शूटिंग करताना मगळवारी प्रसिद्ध शो द 'व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर शॉट सर्किट मुळे आग लागली.या ...
'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग
न ीन वर्षाच्या विशेष भागाचे शूटिंग करताना मगळवारी प्रसिद्ध शो द 'व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर शॉट सर्किट मुळे आग लागली.या वर्षाचा शेवट करताना विशेष भागात नेहा कक्कर आणि बादशाह हे देखील परीक्षक म्हणनू आले होते. यावेळी आपल्या 'काला चष्मा' या गाण्यावर नेहा कक्करचा परफॉमन्स चालू असतानाच अचानक सेटवर आगीने पेट घेतला. पीसीआर आणि स्टेजजवळ असणारे वेटिंग क्षेत्रात ही आग लागली होती.शूटिंग चालू होते मात्र नशिबाने कोणालाही दुखापत झाली नाही.आगीने पेट घेतल्यानंतर काही मिनटांतच परीक्षक आणि स्पर्धकांना तिथून बाहेर काढण्यात आले. साधारण २ तासांसाठी शूट थांबिवण्यात आले होते.नशिबाने अग्निशमन उपकरणांनी 'द व्हॉईस इंडिया किड्स'चा सेट सज्ज असल्यामुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली.आगीमुळे सेटवर कितपत हानी झाली याचे मुल्यांकन करणा-या टीमजवळ मार्गदर्शक सेलिब्रेटी पाहुणे यांनी भावना व्यक्त केल्या. सेलिब्रेटी पाहुणी नेहा कक्करला याविषयी विचारले असता तिने सांगितले, “आम्ही काला चंमा गाणे म्हणत होतो आिण गाण्यात ‘आग लगा दे बेबी फायर’ अशी एक ओळ आहे ती म्हणत असतानाच आगीने पेट घेतला. त्यामुळे शूट थांबिवण्यात आले.पण, मला आशा आहे की आता सगळे सरिक्षत आणि व्यवस्थित आहे. सगळ्यांची नीट काळजी घेण्यात येत असल्याची मला आशा आहे.” तर, मार्गदर्शक पापॉन म्हणाला, “मुलांनी इतके चांगले गायले की, खरोखरच सेटवर आग लागली.पण गंभीरिरत्या बिघतले तर, आता सगळे नियंत्रणाखाली आहे . प्रोडक्शनने खूपच चांगली काळजी घेतली आहे.” सगळ्यांच्या काळजीसंबधी पलक मुछाल म्हणाली, “सेटवर सरिक्षत उपकरणे होती हे नशीब, त्यामुळे आग पसरली नाही आणि वेळेवर सगळ्यांची नीट काळजी घेण्यात आली.”
'व्हॉइस इंडिया किड्स'चे दुसरे पर्व ११ नोव्हेंबर पासून सुरू झाले आहे.दिव्यांग मुलांमधील प्रतिभेला संधी देण्यापासून ते भारताच्या दुर्गम भागांतील मुलांच्या आजवर कधीही ऐकिवात न आलेल्या संघर्षाचे कौतुक करण्यापर्यंतच्या कित्येक कहाण्या व्हाइस इंडिया किड्सच्या दुस-या पर्वातून उलगडणार असून भारतील प्रतिभावान युवा गायकांनी जपलेले त्यांची कला पाहणे रंजक ठरत आहे.तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सामान्य माणूस, या स्टेजवर केवळ उत्तम आवाज असणा-यांनाच संधी मिळते.
'व्हॉइस इंडिया किड्स'चे दुसरे पर्व ११ नोव्हेंबर पासून सुरू झाले आहे.दिव्यांग मुलांमधील प्रतिभेला संधी देण्यापासून ते भारताच्या दुर्गम भागांतील मुलांच्या आजवर कधीही ऐकिवात न आलेल्या संघर्षाचे कौतुक करण्यापर्यंतच्या कित्येक कहाण्या व्हाइस इंडिया किड्सच्या दुस-या पर्वातून उलगडणार असून भारतील प्रतिभावान युवा गायकांनी जपलेले त्यांची कला पाहणे रंजक ठरत आहे.तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सामान्य माणूस, या स्टेजवर केवळ उत्तम आवाज असणा-यांनाच संधी मिळते.