सलमानने केले वॉकआउट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 21:39 IST2016-11-26T20:04:00+5:302016-11-26T21:39:16+5:30
बिग बॉसच्या घरात आता खºया अर्थाने रंगत निर्माण झाली आहे. कारण गेल्या संपूर्ण आठवड्यात सर्वाधिक नाव कोणाचे आघाडीवर असेल ...

सलमानने केले वॉकआउट
ब ग बॉसच्या घरात आता खºया अर्थाने रंगत निर्माण झाली आहे. कारण गेल्या संपूर्ण आठवड्यात सर्वाधिक नाव कोणाचे आघाडीवर असेल तर ते स्वामी ओम आहेत. घरातील सर्वच सदस्यांना हैराण करून सोडणाºया स्वामी ओम यांनी सलमानलादेखील सोडले नाही. विकेण्डला जेव्हा सलमानने स्वामी ओमला त्यांच्या वर्तणुकीबाबत जाब विचारला तेव्हा त्यांनी सलमानलाच खरी-खोटी सुनावली. अखेर घरवाल्यांसमोरून सलमानला वॉकआउट करावे लागले.
लक्झरी बजेटसाठी दिलेल्या टास्कमध्ये स्वामी ओम यांनी मनमानी स्वभावाचा उच्चांक गाठला. आतापर्यंत संयम ठेवून असलेल्या राहुल देवलादेखील डिवचण्यात स्वामी ओम मागे सरले नाही. त्यातच स्वामी ओम यांच्यावर टास्कमध्ये सर्वाधिक खराब कामगिरी केल्याचा कप्तान रोहन मेहरा याने ठपका ठेवल्याने ते आणखी भडकले. घरातील सर्वच सदस्यांना सळोकी पळो करून सोडणाºया स्वामींनी बिग बॉसच्या आदेशांनादेखील धुडकावून लावले. त्यामुळे विकेण्डमध्ये ते सलमानच्या निशाण्यावर असतील असा अंदाज अगोदरच वर्तविला जात होता. अंदाज वर्तविल्याप्रमाणे तसे घडलेही, परंतु सलमानच्या विरोधालाही त्यांनी झुगारून लावल्याने सलमानला शोमधून वॉकआउट करावे लागले.
सलमानच्या या पावित्र्यामुळे घरातील सर्वच सदस्य अवॉक् झाले असून, त्यांनी स्वामी ओम यांनाच यासाठी जबाबदार धरले. मोनासह काहींनी त्यांना याचा जाबही विचारला.
लक्झरी बजेटसाठी दिलेल्या टास्कमध्ये स्वामी ओम यांनी मनमानी स्वभावाचा उच्चांक गाठला. आतापर्यंत संयम ठेवून असलेल्या राहुल देवलादेखील डिवचण्यात स्वामी ओम मागे सरले नाही. त्यातच स्वामी ओम यांच्यावर टास्कमध्ये सर्वाधिक खराब कामगिरी केल्याचा कप्तान रोहन मेहरा याने ठपका ठेवल्याने ते आणखी भडकले. घरातील सर्वच सदस्यांना सळोकी पळो करून सोडणाºया स्वामींनी बिग बॉसच्या आदेशांनादेखील धुडकावून लावले. त्यामुळे विकेण्डमध्ये ते सलमानच्या निशाण्यावर असतील असा अंदाज अगोदरच वर्तविला जात होता. अंदाज वर्तविल्याप्रमाणे तसे घडलेही, परंतु सलमानच्या विरोधालाही त्यांनी झुगारून लावल्याने सलमानला शोमधून वॉकआउट करावे लागले.
सलमानच्या या पावित्र्यामुळे घरातील सर्वच सदस्य अवॉक् झाले असून, त्यांनी स्वामी ओम यांनाच यासाठी जबाबदार धरले. मोनासह काहींनी त्यांना याचा जाबही विचारला.