पंखुडी अवस्थीने चुकीच्या ठिकाणी स्पर्श करणाऱ्या व्यक्तीच्या वाजविली कानाखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 20:47 IST2017-03-19T15:15:16+5:302017-03-19T20:47:29+5:30
अभिनेत्री पंखुडी अवस्थीने केलेल्या एका धाडसी पराक्रमामुळे ती चर्चेत आली आहे. होय, पंखुडीने याबाबत स्वत:च खुलासा केला असून, ती ...

पंखुडी अवस्थीने चुकीच्या ठिकाणी स्पर्श करणाऱ्या व्यक्तीच्या वाजविली कानाखाली
अ िनेत्री पंखुडी अवस्थीने केलेल्या एका धाडसी पराक्रमामुळे ती चर्चेत आली आहे. होय, पंखुडीने याबाबत स्वत:च खुलासा केला असून, ती म्हणाली की, तिने चुकीचा स्पर्श करणाºया एका व्यक्तीच्या कानाखाली जोरदार वाजविली आहे. शिवाय तिने केलेले हे धाडस तिला गौरवास्पद वाटत असून, अशा लोकांना धडा शिकवायलाच हवा, असे तिने म्हटले आहे.
लवकरच ‘क्या कसूर है अमला का?’ या मालिकेत झळकणाºया पंखुडीने गेल्या शनिवारी याच मालिकेच्या सेटवर याबाबतचा खुलासा केला. ती म्हणाली की, माझ्या अनुभवावरून आपल्या देशातील महिलांसाठी सुरक्षित असलेल्या शहरांपैकी मुंबई हे एक शहर आहे. मी दिल्ली, चंडीगड, नोएडा आणि बंगळुरू या शहरांत जाऊन आली आहे, परंतु ही शहरे महिलांसाठी सुरक्षित आहेत, असे ठामपणे सांगू शकत नाही.
पंखुडीने म्हटले की, जेव्हा मी दिल्लीत राहात होती तेव्हा कॉलेजमध्ये जाण्यासाठी दररोज मला मेट्रोने प्रवास करावा लागत असे. तेव्हा अशाप्रकारच्या घटना सातत्याने माझ्यासोबत घडत असत. तेव्हा फारशी समज नसल्याने मी याकडे दुर्लक्ष करायची. मात्र नंतर मला याची जाणीव होत गेली. त्यामुळे रात्री घराबाहेर पडण्याची हिंमत होत नव्हती.
![]()
मात्र आता तिने याविषयी पुकारलेल्या एल्गारचे समाधान वाढते. छेडछाड तसेच लैंगिक अत्याचाराबाबत महिलांनी आवाज उठवायलाच हवा, असे तिचे म्हणणे आहे. तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगताना पंखुडी म्हणाली की, काही दिवसांपूर्वी मी बंगळुरू येथे माझ्या मित्रांसोबत गेली होती. त्यावेळी मी स्कर्ट घातला होता. तेव्हा एक व्यक्ती माझ्याजवळ आला अन् त्याने माझ्या मांडीला हात लावण्याचा प्रयत्न केला. ही बाब मला खूपच खटकली. मी क्षणाचाही विचार न करता त्या व्यक्तीच्या कानाखाली वाजविली.
या घटनेमुळे मी खूपच अस्वस्थ झाली होती. परंतु अशा वृत्तीविरोधात आवाज उठविल्याचे समाधानही वाटले. माझ्या मते, महिलांनी अशा प्रसंगाचा धैर्याने सामना करायला हवा. जर तुमच्यासोबत अशी घटना घडत असेल तर तुम्ही शांत बसू नका, असेही पंखुडीने सांगितले.
लवकरच ‘क्या कसूर है अमला का?’ या मालिकेत झळकणाºया पंखुडीने गेल्या शनिवारी याच मालिकेच्या सेटवर याबाबतचा खुलासा केला. ती म्हणाली की, माझ्या अनुभवावरून आपल्या देशातील महिलांसाठी सुरक्षित असलेल्या शहरांपैकी मुंबई हे एक शहर आहे. मी दिल्ली, चंडीगड, नोएडा आणि बंगळुरू या शहरांत जाऊन आली आहे, परंतु ही शहरे महिलांसाठी सुरक्षित आहेत, असे ठामपणे सांगू शकत नाही.
पंखुडीने म्हटले की, जेव्हा मी दिल्लीत राहात होती तेव्हा कॉलेजमध्ये जाण्यासाठी दररोज मला मेट्रोने प्रवास करावा लागत असे. तेव्हा अशाप्रकारच्या घटना सातत्याने माझ्यासोबत घडत असत. तेव्हा फारशी समज नसल्याने मी याकडे दुर्लक्ष करायची. मात्र नंतर मला याची जाणीव होत गेली. त्यामुळे रात्री घराबाहेर पडण्याची हिंमत होत नव्हती.
मात्र आता तिने याविषयी पुकारलेल्या एल्गारचे समाधान वाढते. छेडछाड तसेच लैंगिक अत्याचाराबाबत महिलांनी आवाज उठवायलाच हवा, असे तिचे म्हणणे आहे. तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगताना पंखुडी म्हणाली की, काही दिवसांपूर्वी मी बंगळुरू येथे माझ्या मित्रांसोबत गेली होती. त्यावेळी मी स्कर्ट घातला होता. तेव्हा एक व्यक्ती माझ्याजवळ आला अन् त्याने माझ्या मांडीला हात लावण्याचा प्रयत्न केला. ही बाब मला खूपच खटकली. मी क्षणाचाही विचार न करता त्या व्यक्तीच्या कानाखाली वाजविली.
या घटनेमुळे मी खूपच अस्वस्थ झाली होती. परंतु अशा वृत्तीविरोधात आवाज उठविल्याचे समाधानही वाटले. माझ्या मते, महिलांनी अशा प्रसंगाचा धैर्याने सामना करायला हवा. जर तुमच्यासोबत अशी घटना घडत असेल तर तुम्ही शांत बसू नका, असेही पंखुडीने सांगितले.