गलती से मिस्टेक...! गीतकार-लेखक मनोज मुंतशीर चुकले, नेटकर्‍यांनी टोकले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 12:21 PM2021-05-03T12:21:17+5:302021-05-03T12:28:40+5:30

Indian Idol 12 : शम्मी कपूर यांच्या लग्नाचा किस्सा ऐकवताना झाली चूक, सोशल मीडियावर मागितली माफी

manoj muntashir made a big mistake on indian idol 12 gave wrong fact about veteran actor shammi kapoor had to apologize | गलती से मिस्टेक...! गीतकार-लेखक मनोज मुंतशीर चुकले, नेटकर्‍यांनी टोकले

गलती से मिस्टेक...! गीतकार-लेखक मनोज मुंतशीर चुकले, नेटकर्‍यांनी टोकले

googlenewsNext
ठळक मुद्देम्मी कपूर यांच्या ‘शम्मी कपूर- द गेम चेंजर’ या आॅटोबायोग्राफीत शम्मी व गीता बाली यांच्या लग्नाचा किस्सा लिहिलेला आहे. 

इंडियन आयडल 12 चे (Indian Idol 12) शूटींग सध्या मुंबईत नाही तर दीव दमणला सुरू आहे. शोचे तिन्ही जज म्हणजे, नेहा कक्कर, विशाल ददलानी शिवाय हिमेश रेशमिया शोमधून गायब आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीत गीतकार व पटकथा लेखक मनोज मुंतशीर ( Manoj Muntashir ) आणि  गायक-संगीतकार अन्नू मलिक  जजच्या खुर्चीवर दिसत आहेत. यादरम्यान मनोज मुंतशीर अशी काही चूक करून बसले की, सोशल मीडियावर त्यांना माफी मागावी लागली.

मनोज यांनी या शोमध्ये शम्मी कपूर व त्यांची पत्नी अभिनेत्री गीता बाली यांच्याशी संबंधित एक किस्सा शेअर केला.  शम्मी यांनी गीता बाली यांच्या भांगात कुंकू नाही तर लिपस्टिक भरून त्यांच्याशी लग्न केले होते, हा किस्सा त्यांनी आपल्या सुंदर शब्दांत ऐकवला. गीता बाली यांच्या निधनानंतर शम्मी कपूर यांनी दुसरे लग्न केले नाही, असा एक संदर्भही त्यांनी सांगितला. हा संदर्भ चूक होता. लोकांनी लगेच ही चूक मनोज यांच्या लक्षात आणून दिली. गीता बाली यांच्या निधनानंतर चार वर्षांनी शम्मी कपूर यांनी नीलादेवींशी लग्न केले होते, हे तथ्य सांगणारे अनेक मॅसेज मनोज यांना मिळाले. यानंतर मनोज यांनी ट्विट करत माफी मागितली.


‘तुम्हा सर्वांसारखाच मी सुद्धा भारतीय सिनेमाचा खूप मोठा चाहता आहे. अनेकदा चाहते अजानतेपणी काही चुका करून बसतात. इंडियन आयडलच्या एपिसोडमध्ये माझ्याकडूनही अशी चूक झाली. या तथ्यात्मक चूकीसाठी मी माफी मागतो़ शम्मीजींनी गीता बाली यांच्यानंतर नीला देवींशी लग्न केले होते,’ असे ट्विट त्यांनी केले.

असे झाले होते शम्मी-गीता बालींचे लग्न...

शम्मी कपूर यांच्या ‘शम्मी कपूर- द गेम चेंजर’ या आॅटोबायोग्राफीत शम्मी व गीता बाली यांच्या लग्नाचा किस्सा लिहिलेला आहे. यात शम्मी कपूर लिहितात, ‘आम्ही पहाटे मंदिरात पोहोचलो. गीता सलवार कमीजमध्ये होती तर मी कुर्ता पायजाम्यात. केवळ कुत्र्यामांजरांचा आवाज येत होता. हरी वालिया एकमेव साक्षीदार होते. पुजा-याने लग्नाचे विधी सुरू केले. आम्ही सात फेरे घेतले आणि पतीपत्नी बनलो. गीताने तिच्या पर्समधील लिपस्टिक काढली व त्याने तिची भांग भरायला सांगितले...’

Web Title: manoj muntashir made a big mistake on indian idol 12 gave wrong fact about veteran actor shammi kapoor had to apologize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.