'अग्गबाई सुनबाई' मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंगही संपले, बबड्याने शेअर केली भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 03:20 PM2021-08-07T15:20:46+5:302021-08-07T15:29:00+5:30

'अग्गंबाई सूनबाई' मालिका आता काहीच दिवस रसिकांना पाहता येणार आहे. मालिका रसिकांचा निरोप घेत आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंगही संपले आहे.

Adwait Dadarkar's Emotional Note on completion of last episode of Agbai Sunbai, check what he said | 'अग्गबाई सुनबाई' मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंगही संपले, बबड्याने शेअर केली भावनिक पोस्ट

'अग्गबाई सुनबाई' मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंगही संपले, बबड्याने शेअर केली भावनिक पोस्ट

googlenewsNext

'अग्गबाई सासूबाई' मालिकेला रसिकांच्या भरघोस प्रतिसाद मिळाला. रसिकांची मिळालेली पंसती बघून मेकर्सने याच मालिकेचा दुसरा भाग रसिकांच्या भेटीला आणला. अग्गबाई सुनबाई नावाने मालिका सुरु झाली.‘अग्गबाई सासुबाई’ मालिकेचा दुसरा भाग ‘अग्गबाई सूनबाई’ नावाने सुरु करण्यात आली. खरंतर मालिका सुरु झाली तेव्हापासून रसिकांनी फार काही पसंती दिली नव्हती. नव्या ढंगात मालिका असली तरी मालिकेतल्या कथेत नाविन्य काहीच जाणवले नाही. त्यामुळे मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला तेव्हाच विविध प्रतिक्रीया देत मालिकेवर नापसंती दिल्याचे दिसले होते.

मालिकेतल्या काही कलाकारांना वगळता नवीन कलाकारांची एंट्री झाली. पण मालिकेला सुरुवातीपासूनच रसिकांची हवी तशी पसंती मिळाली नाही. मालिकेतल्या कलाकारांचा दमदार अभिनय असला तरी कथानकात मात्र दन नसल्याचे नेटीझन्स मालिकेला ट्रोलही करताना दिसायचे. मालिका आता काहीच दिवस रसिकांना पाहता येणार आहे.

मालिका रसिकांचा निरोप घेत आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंगही संपले आहे. मालिकेत कलाकारही यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. मालिकते आसावरीचा बबड्या म्हणजे सोहम या भूमिकेत झळकणारा अभिनेता अव्दैत दादरकरही भावूक झाला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

सोहमचा शेवटचा सीन शूट करतानाचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.व्हिडीओ शेअर करत त्याने लिहीले की, आयुष्यात पहिल्यांदा निगेटीव्ह रोल. सगळेच अनुभव आले..प्रचंड ट्रोलिंग, नेगिटीव्ह रिएक्शन्स बरोबर खूप कौतुक आणि प्रेम सुद्धा...दुष्ट माणूस स्वतः साठी कधीच दुष्ट नसतो..लोकांसाठी असतो..त्यामुळे मुद्दाम दुष्ट पणा प्ले न करता..समाजाच्या दृष्टीने चुकीची मतं..तत्व आणि वागणं असलेला 'माणूस' करण्यावर भर दिला. I like being a villain. Villains are more exciting. 

जुन्या मालिका संपत नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहेत. 'मन झालं बाजिंद', 'ती परत आलीये' ,'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं', तुझी माझी रेशीमगाठ,मन उडू उडू झालं या सारख्या नवीन मालिका रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी दाखल होणार आहेत.

Web Title: Adwait Dadarkar's Emotional Note on completion of last episode of Agbai Sunbai, check what he said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.