Naga Chaitanya : कमल हसनच्या मुलीवर प्रेम, समंथाशी लग्न; जाणून घ्या नागा चैतन्यची लव लाईफ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 12:32 PM2023-01-25T12:32:41+5:302023-01-25T16:49:05+5:30

Naga chaitanya Affairs And Breakup: लग्नाआधी त्याने श्रुती हसनला(Shruti Haasan) डेट केले, त्यानंतर ब्रेकअप झाले आणि जेव्हा त्याने सामंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu)शी लग्न केले तेव्हा चार वर्षांतच हे नाते तुटले. चला जाणून घेऊया अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल...

नागा चैतन्य सिने जगतातील एक प्रसिद्ध स्टार आहे, ज्याने एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. सामंथाच्या आधी चैतन्य अभिनेत्री श्रुती हसनच्या प्रेमात पडला होता. पण त्यांचे नातेही यशस्वी झाले नाही. एक काळ असा होता जेव्हा अभिनेता कमल हसन(Kamal Haasan) च्या मुलीवर प्रेम करत होता.

रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य (Naga chaitanya Breakup) 2013 मध्ये श्रुती हासनच्या प्रेमात होता. दोघांमधील प्रेम अनेकदा बघायला मिळाले. 2013 मध्येच झालेल्या साऊथ इंडियन फिल्मफेअर अवॉर्ड नाईटमध्येही दोघांमधील जवळीक पाहायला मिळाली होती. बातमी तर अशी होती की दोघांना लग्न करायचे आहे.

अक्षरा हसनमुळेच श्रुतीसोबत त्याचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जाते. तिच्यामुळे दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाले, त्यानंतर त्यांनी एकमेकांशी बोलणेही बंद केले. अक्षराला घरी सोडायचे होतो आणि नागा चैतन्य घाईत होता, त्यामुळे वाद सुरू झाला.

यानंतर नागा चैतन्यचा जीव सामंथा(Naga chaitanya-Samantha)वर जडला. समंथा आणि नागा यांची पहिली भेट 2016 मध्ये 'प्रेमम' या चित्रपटात झाली होती. दोघांची मैत्री झाली. मात्र, याचदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात कधी पडले. हे त्यांना ही कळलं नाही.

समंथा आणि नागा चैतन्य(Naga chaitanya-Samantha Wedding) जवळजवळ दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते आणि नंतर 2017 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. जानेवारीमध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि ऑक्टोबरमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली होती.

अभिनेत्री समंथा (Naga chaitanya-Samantha Divorce)सोबतचे नागा चैतन्यचे नातेही फार काळ टिकले नाही. दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला. त्यांनी 4 वर्षांनंतर त्यांचे नातं संपवलं आणि वेगळे झाले. घटस्फोटाची बातमी त्याने स्वतः सोशल मीडियावर शेअर केली होती.

यादरम्यान लोकांनी समंथावर अनेक आरोप केले. तिला गविष्ठ आहे इथं पासून ते अनेक गोष्टी तिच्याबद्दल सोशल मीडियावर लिहिल्या गेल्या, जे क्वचितच कोणी सहन करू शकले. तिला आई व्हायचं नसल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र अभिनेत्रीने या सर्व गोष्टी चुकीच्या सांगितल्या होत्या.

समंथा आणि नागा चैतन्य यांच्या नात्यात दुरावा येण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. बरं, आता दोघेही त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत आणि पुढे गेले आहेत. (फाइल फोटो)