या कारणामुळे दिलनवाज शेख बनली मान्यता दत्त...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 07:16 PM2018-08-10T19:16:47+5:302018-08-10T19:19:54+5:30

संजयच्या आयुष्यात मान्यताचे काय महत्त्व आहे, हे तुम्ही ‘संजू’मध्ये बघितले असेलच. संजयच्या पडत्या काळात मान्यता अगदी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली.

this is why dilnawaz sheikh changed her name to manyata dutt | या कारणामुळे दिलनवाज शेख बनली मान्यता दत्त...!!

या कारणामुळे दिलनवाज शेख बनली मान्यता दत्त...!!

googlenewsNext

संजय दत्तचा ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’ हा चित्रपट रिलीज झाला आणि दणकून आपटलाही. या चित्रपटापेक्षा संजय दत्त त्याच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘संजू’मुळे अधिक चर्चेत राहिला. पण आज आम्ही संजय दत्तबद्दल नाही तर त्याची पत्नी मान्यता दत्तबद्दल बोलणार आहोत. संजयच्या आयुष्यात मान्यताचे काय महत्त्व आहे, हे तुम्ही ‘संजू’मध्ये बघितले असेलच. संजयच्या पडत्या काळात मान्यता अगदी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली. २००८ मध्ये तिने संजयसोबत लग्न केले. तुम्हाला कदाचित माहित असेलही की, मान्यताचे खरे नाव दिलनवाज शेख आहे. लग्नानंतर तिने आपले नाव बदलवून मान्यता हे नवे नाव धारण केले. नाव बदलण्याचा निर्णय मान्यताचा स्वत:चा होता. अलीकडे एका मुलाखतीत तिने याबाबत सांगितले.

 

संजयने तुला तुझे माहेरचे नाव बदलण्यास भाग पाडले का? असा थेट प्रश्न तिला विचारला गेला. यावर मान्यताने नकारार्थी उत्तर दिले. नाव बदलण्याचा निर्णय माझा होता, असे ती म्हणाली. शिवाय यामागचे कारणही तिने सांगितले. लग्नानंतरही मी माझ्या वडिलांनी दिलेले नाव कायम ठेवले असते तर ते संजयसाठी अडचणीचे ठरले असते. माझ्या जुन्या नावामुळे कदाचित त्याला अपमान व अनादर सहन करावा लागला असता. मला ते नको होते. म्हणून मी नाव बदलण्याचा निर्णय घेतला. काही महिला लग्नानंतर आपल्या वडिलांचे नाव लावणे पसंत करतात, तो त्यांचा निर्णय आहे. आता ही फॅशन झालीय, असे मान्यता म्हणाली. संजय दत्त व मान्यताने २००८ मध्ये गोव्यात लग्न केले होते. संजय मान्यतापेक्षा सुमारे २० वर्षांनी मोठा आहे. मान्यताचे हे दुसरे लग्न आहे. संजयआधी मिराज उल रहमानसोबत तिचे लग्न झाले होते. मान्यताला धमकीचे फोन केल्याबद्दल मिराजला तुरुंगाची हवाही खावी लागली होती.

सध्या मान्यता संजय दत्तच्या प्रॉडक्शन कंपनीची सीईओ आहे. संजय व मान्यता या दोघांना दोन मुले आहे. मुलगा शहरान व मुलगी इकरा. लग्नापूर्वी मान्यता सी ग्रेड चित्रपटांत काम करत होती. अजय देवगणच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात तिने एक आयटम साँग केले होते.मान्यता संजयची तिसरी पत्नी आहे.   संजयची पहिली पत्नी होती, ऋचा शर्मा. तिचे निधन झाल्यानंतर संजयने रिया पिल्लईसोबत दुसरा संसार थाटला होता. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. यानंतर संजयच्या आयुष्यात मान्यता आली. घरच्यांच्या विरोधात जात संजयने मान्यताशी लग्न केले.  

Web Title: this is why dilnawaz sheikh changed her name to manyata dutt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.